शिरुर: शिरुर तहसिल कार्यालय हे आधिकाऱ्यांमुळे चक्क रात्रीच्या वेळी सुरु होत असून आर्थिक मलिदा दिलेल्या अनेक फायलींवर तहसिलदारांच्या सह्या होत असल्याचे नागरीकांनी सांगितले आहे.
तहसिलदार यांची बदली होणार असल्याचे संकेत मिळत असल्याने गौणखणिज केसेस, रस्ता केसेस, १५५ च्या केसेस बंद होऊन जाता जाता फाईलवर सही घेण्यासाठी तहसिल कार्यालयात गर्दी वाढू लागली आहे. दोन दिवसात रात्रीच्या वेळेस अचानक सह्या केलेल्या फाईलची चौकशी लावणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते निलेश वाळुंज यांनी सांगितले. तसेच काही दाक्षिणा न दिलेल्या फाईल तश्याच धुळ खात पडल्या आहेत. शेतकऱ्यांच्या रस्ता खुला करण्याच्या फाईल तहसिलदार यांनी मुद्दामहून अडवून ठेवल्या असून शेतकरी आत्महत्या करण्याच्या विचारात असल्याचे केदारनाथ वाघोले यांनी सांगितले आहे.
तहसिल कार्यालयात तहसिलदार दिवसा उपस्थित नसतात. मात्र रात्रीच्या वेळी अचानक हजर होऊन संबधित आस्थापनेच्या कर्मचाऱ्यांना बोलवून घेत फाईलवर सहया होत असल्याने रात्रीस चांगलाच खेळ चालत असल्याचे एका जागरुक नागरीकाने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले आहे. शिरुर तालुक्यातील जनतेचे कामावाचून प्रचंड हाल होत असून जिल्हाधिकाऱ्यांनी प्रभारी तहसिलदांराऐवजी नवीन तहसिलदारांची लवकर नेमणुक करणे गरजेच असल्याची चर्चा शिरुर तालुक्यातील नागरीक करत आहे.
शिरूर : अवैध धंदे बंद करण्यासाठी व इतर मागण्यांसाठी शिरूरमध्ये निलेश वाळुंज यांचे सत्याग्रह आंदोलन…
मुंबई: वरळी परिसरात भाजप महायुतीच्या मोर्चामुळे निर्माण झालेल्या प्रचंड वाहतूक कोंडीदरम्यान राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश…
मुंबई: कुटुंबातील वडिलांचे निधन झाल्यानंतर मालमत्तेच्या वाटणीचा प्रश्न अनेकदा गुंतागुंतीचा ठरतो. विशेषतः आई आणि मुलांमध्ये…
मुंबई: राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत प्रवाशांशी अधिक प्रभावी संवाद साधण्यासाठी मराठी भाषेला प्राधान्य देण्याच्या दिशेने महाराष्ट्र…
नागपूर: काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधारी पक्षाचे आमदार संजय गायकवाड यांच्या कथित धमकीप्रकरणी…
मुंबई: महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्या दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळ उपक्रमांतर्गत…