क्राईम

शिरुर तालुक्यात जमिनीच्या वादातून तिघांना मारहाण

शिक्रापूर: रांजणगाव सांडस (ता. शिरुर) येथील मनोज गवळी यांची जमीन राजाराम रणदिवे यांनी खंडाने केलेली असून सदर जमीन राजाराम हे ट्रॅक्टर चालक उमेश शितोळे याच्या मदतीने नांगरत असताना संतोष गवळी व शांताराम गवळी हे दोघे तेथे आले त्यांनी हि जमीन आमची आहे आमचा भाऊ मनोजचा काहीही संबंध नाही, असे म्हणून ट्रॅक्टर चालक व रणदिवे यांना शिवीगाळ, दमदाटी करत दगडाने मारहाण करुन जखमी केले. यावेळी राजाराम यांचा भाऊ राहुल रणदिवे हा भांडणे सोडविण्यासाठी आला असता त्याला देखील दोघांनी मारहाण केली.

याबाबत राजाराम रणदिवे (वय २६) रा. रांजणगाव सांडस (ता. शिरुर) जि. पुणे याने शिरुर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिरुर पोलिसांनी संतोष बाळू गवळी व शांताराम बाळू गवळी दोघे रा. रांजणगाव सांडस (ता. शिरुर)जि. पुणे यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली शिरुर पोलीस करत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

विधानसभा निवडणूक २०२४!  ‘परिशिष्ट ४४’च्या प्रती तातडीने द्या; काँग्रेसची मागणी

मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ मधील मतदान प्रक्रियेवर उपस्थित होत असलेल्या शंका आणि संशयाच्या पार्श्वभूमीवर,…

2 तास ago

‘खाकी’च्या बळावर विकासाला गती; महाराष्ट्र पोलीसांना ग्लोबल बनवण्याचा शिंदेंचा निर्धार

मुंबई: राज्यातील कायदा-सुव्यवस्था मजबूत असेल तरच विकासाला खरी गती मिळते, असा ठाम संदेश देत उपमुख्यमंत्री…

2 तास ago

पद्म पुरस्कार 2027 साठी राज्यस्तरीय समिती स्थापन

मुंबई: विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या नावांची पद्म पुरस्कार 2027 साठी शिफारस करण्यासाठी राज्य…

2 तास ago

पुण्यात महिलांच्या सुरक्षित प्रवासासाठी बस सुविधांमध्ये सुधारणा; लवकरच उच्चस्तरीय बैठक; डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई: सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत महिलांच्या सुरक्षेला अधिक प्राधान्य देत बस सुविधांमध्ये आवश्यक सुधारणा करण्यासाठी लवकरच…

2 तास ago

छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त वक्तव्य; धीरेंद्र शास्त्रीविरोधात संतापाची लाट

मुंबई: महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत कथित वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे धीरेंद्र शास्त्री यांच्या विरोधात तीव्र…

2 तास ago

आमदार संजय गायकवाडांचे विधान विकृत; कारवाईस सरकार का घाबरते? हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्या वक्तव्यावरून राज्यातील राजकारण तापले असून, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे…

4 तास ago