रांजणगाव गणपती (तेजस फडके) मुंबई येथे संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणा संदर्भात असलेल्या सर्व मागण्या शासनाने मान्य केल्या नंतर संपुर्ण राज्यात मोठा जल्लोष साजरा करण्यात आला. शिरुर तालुक्यातील रांजणगाव गणपती येथील हॉटेल व्यावसायिक संदीप कुटे यांनी मराठा आरक्षणाचा आनंद साजरा करण्यासाठी आगळीवेगळी कल्पना राबवत स्वतःच्या हॉटेलमध्ये जेवायला येणाऱ्या व्यक्तींना बिलात 20 टक्के सुट देण्याचा निर्णय घेतला आहे.
शिरुर तालुक्यातील प्रत्येक गावात मराठा आरक्षण मिळाल्यानंतर सकल मराठा सामाजाने फटाके फोडत, गुलाल उधळत आनंद साजरा केला. त्यामुळे आपणही समाजाचं काहीतरी देण लागतो. या भावनेतून रांजणगाव येथील प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक संदीप कुटे यांनी अनोखी शक्कल लढवत त्यांच्या ‘हॉटेल संदीप’ मध्ये जेवायला येणाऱ्या व्यक्तीच्या बिलात 20 टक्के सुट दिली असुन दि 27 जानेवारी ते 31 जानेवारी पर्यंत हि सुट दिली जाणार आहे.
आपल्या मराठा सामाजाला आरक्षण मिळावे यासाठी संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटी ते मुंबई पर्यंत भव्य मोर्चा काढला. त्यामुळे अखेर 26 जानेवारी रोजी शासनाने त्यांच्या सगळ्या मागण्या मान्य करत मराठा समाजाला आरक्षण देण्याचं मान्य केल. त्यामुळे आपण समाजाचं काहीतरी देण लागतो. याचं उद्देशाने छत्रपती संभाजीनगर, विदर्भासह मराठवाड्यातुन या आंदोलनात सहभागी होण्यासाठी आलेल्या समाज बांधवाना परतीच्या प्रवासात आपण कमीत कमी पैशात जेवण द्यावं अशी संकल्पना माझ्या मनात आली. त्यामुळे मी हॉटेलच्या जेवणाच्या बिलात 20 टक्के सुट देण्याचा निर्णय घेतला. तसेच शिरुर तालुक्याच्या वेगवेगळ्या भागातून अनेकजण आमच्या हॉटेल मध्ये जेवायला येत असतात त्या सर्वांनाही दि 27 जानेवारी ते 31 जानेवारी पर्यंत जेवणाच्या बिलावर आम्ही 20 टक्के सुट देणार आहोत.
संदीप कुटे
प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक
रांजणगाव गणपती
मुंबई: मंत्रालयातील पिण्याच्या पाण्याच्या टाकीमध्ये मांजर पडल्याच्या माहितीत तथ्थ नाही. पाण्याच्या टाक्यांवर लोखंडी झाकणे बसवलेली…
ठाणे: राज्याच्या राजकारणात एकनाथ शिंदे यांच्या भोवती वाढणारा जनाधार पुन्हा एकदा स्पष्ट झाला आहे. “अपॉइंटमेंटशिवाय…
मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या के-ईस्ट वॉर्डचे सहायक आयुक्त नितीन शुक्ला यांना एका महिलेला लग्नाचे आमिष दाखवून…
मुंबई: Dr. Shrikant Eknath Shinde यांनी अमेरिकेतील Harvard Kennedy School येथे आयोजित अभ्यासदौऱ्यात सहभागी होत…
अमरावती: राज्यातील प्रगत विकासाच्या दाव्यांना छेद देणारी धक्कादायक बाब समोर आली आहे. अमरावती जिल्ह्यातील मेळघाट…
फोन आजकाल लोकांच्या जीवनाचा महत्वाचा भाग झाला आहे. फोन नसेल तर अनेकांची कामे रखडतात. सकाळी…