शिरूर तालुका

अष्टविनायक महामार्गावरील कवठे येमाई येथे उघड्या चेंबरमुळे अपघातांची मालिका

सार्वजनिक बांधकाम विभागाला अद्याप जाग येईना

शिरूर (अरुणकुमार मोटे): अष्टविनायक महामार्गावरील कवठे येमाई येथील उघड्या चेंबरमुळे अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. गेल्या सात दिवसांत येमाई मंदिर चौकाजवळ रामदेव बाबा स्टील दुकानाच्या समोरील याच उघड्या चेंबरमुळे दोन अपघात घडले आहेत. वारंवार ठेकेदार, सार्वजनिक बांधकाम विभागाला कळवूनही या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष केले जात असल्याने स्थानिक नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

शनिवारी (दि. १३) निलेश मिंडे हे दुचाकीवरून आपल्या संविदणे गावी निघाले असताना, रस्त्यावरील हा उघडा चेंबर त्यांना दिसला नाही. ते थेट दुचाकीसह चेंबरमध्ये पडले. या अपघातात त्यांना दुखापत झाली असून त्यांच्या वाहनाचेही मोठे नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच टाकळी हाजी गावचे सरपंच दामूअण्णा घोडे यांनी घटनास्थळी भेट देऊन जखमींची विचारपूस केली.

कवठे येथील सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब डांगे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले की, “कवठे येथे अष्टविनायक महामार्गावर चार चेंबर उघड्या अवस्थेत असून त्यांची झाकणे तुटलेली आहेत. यामुळे वारंवार अपघात होत आहेत.”

डांगे यांनी महामार्गाचे ठेकेदार व सार्वजनिक बांधकाम विभाग यांना तातडीने हे उघडे चेंबर दुरुस्त करण्याची मागणी केली आहे. जर यावर त्वरित उपाययोजना न झाल्यास तीव्र जनआंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. महामार्ग प्रशासनाच्या व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या या अक्षम्य दुर्लक्षामुळे रस्त्यावरील हे उघडे चेंबर प्रवाशांसाठी ‘मृत्यूचे सापळे’ ठरत आहेत. प्रशासनाने यावर त्वरित उपाययोजना करणे गरजेचे आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

कामगार दिन व महाराष्ट्र दिनानिमित्त कामगार प्रश्नांवर प्रकाश; नव्या कायद्यांमुळे संमिश्र चित्र

मुंबई: कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कामगारांच्या स्थितीवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली…

13 तास ago

महाविकास आघाडी एकसंघ; अंबादास दानवे यांना काँग्रेसचा ठाम पाठिंबा

मुंबई: आगामी राज्यसभा व विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी (मविआ) घटक पक्षांमध्ये सकारात्मक व…

14 तास ago

शिरुर तालुक्यात बैलगाडा शर्यतीदरम्यान अपघात; निष्काळजीपणामुळे एकाचा मृत्यू…?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील करंदी येथे आयोजित करण्यात आलेल्या बैलगाडा शर्यतीदरम्यान झालेल्या अपघातात प्रकाश…

18 तास ago

शरीराचे अवयव व त्याला निष्काळजीपणामुळे होणारे आजार

१) पोट: केव्हा बिघाडते, जेव्हा तुम्ही सकाळी नाष्टा करत नाही. २) मूत्रपिंड: केव्हा बिघडतात जेव्हा…

2 दिवस ago

मुंबईच्या पवई–चांदिवली उद्यानांना ‘सुरक्षा कवच’; गैरप्रवृत्तींवर विशेष मोहीम राबवण्याचे निर्देश

मुंबई: मुंबईतील पवई व चांदिवली परिसरातील महानगरपालिका उद्यानांमध्ये अंमली पदार्थ सेवन आणि इतर गैरप्रवृत्तींना आळा…

2 दिवस ago

व्यावसायिक चालकांसाठी ‘व्यवहारिक मराठी’ अनिवार्य; न शिकणाऱ्यांवर कारवाईचा इशारा

मुंबई: महाराष्ट्रात प्रवासी वाहन चालवणाऱ्या प्रत्येक व्यावसायिक चालकाला ‘व्यवहारिक मराठी’ येणे बंधनकारक करण्याबाबत राज्य सरकार…

2 दिवस ago