पाबळ (सुनिल जिते): कारेगाव -कान्हूर मेसाई पंचायत समिती गणातील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अक्षय नाणेकर सध्या संपूर्ण मतदारसंघात झंझावाती प्रचार करीत असून, त्यांचा प्रचार दिवसेंदिवस अधिकच वेग घेत आहे. गावोगाव, वाडी-वस्तीवर जाऊन थेट मतदारांशी संवाद साधत असल्याने त्यांच्या प्रचाराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. अनेक ठिकाणी ढोल-ताशांच्या गजरात त्यांचे स्वागत होत असून, कान्हूर -कारेगाव गणात त्यांच्या विजयाची चर्चा जोर धरू लागली आहे. प्रचारादरम्यान त्या स्थानिक नागरिकांच्या भेटीगाठी घराघरांत, शेतात, बांधावर जाऊन घेत आहेत.
पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य, शिक्षण, महिलांचे प्रश्न तसेच युवकांसाठी रोजगार, या मुद्द्द्यांवर त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधत निवडून आल्यानंतर प्राधान्याने काम करण्याचा विश्वास दिला.अक्षय नाणेकर सातत्यपूर्ण जनसंपर्कामुळे मतदारांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण झाले असून, त्यांना मिळणारा वाढता पाठिंबा त्यांच्या प्रचाराला अधिक बळ देत आहे. महिलांचा, युवकांचा तसेच ज्येष्ठ नागरिकांचा मोठा सहभाग या प्रचार दौऱ्यात दिसून येत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या धोरणांचा व आजवर केलेल्या समाजकार्याचा आढावा घेत भविष्यात कारेगाव -कान्हूर मेसाई गणाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी मी कटिबद्ध आहे. गावागावांचा समतोल विकास साधत शेतकरी, महिला व युवकांना केंद्रस्थानी ठेवून काम करणार आहे.
अक्षय नाणेकर
शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील शिंदोडी गावात घोड नदीलगत असणाऱ्या शेतात काळी माती…
मुंबई: सहकार, पणन आणि कृषी व्यवसाय क्षेत्रासाठी प्रशिक्षित व सक्षम मनुष्यबळ तयार करण्याच्या दृष्टीने पुणे…
मुंबई: कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारने वाऱ्यावर सोडले असून त्यांना काहीही…
मुंबई: राज्यातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात येणाऱ्या निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय…
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहर व परिसरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर अखेर नागरिकांच्या सुरक्षिततेचा…
मुंबई: (१५ एप्रिल) सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) आर्थिक…