पाबळ (सुनिल जिते): कारेगाव -कान्हूर मेसाई पंचायत समिती गणातील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अक्षय नाणेकर सध्या संपूर्ण मतदारसंघात झंझावाती प्रचार करीत असून, त्यांचा प्रचार दिवसेंदिवस अधिकच वेग घेत आहे. गावोगाव, वाडी-वस्तीवर जाऊन थेट मतदारांशी संवाद साधत असल्याने त्यांच्या प्रचाराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. अनेक ठिकाणी ढोल-ताशांच्या गजरात त्यांचे स्वागत होत असून, कान्हूर -कारेगाव गणात त्यांच्या विजयाची चर्चा जोर धरू लागली आहे. प्रचारादरम्यान त्या स्थानिक नागरिकांच्या भेटीगाठी घराघरांत, शेतात, बांधावर जाऊन घेत आहेत.
पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य, शिक्षण, महिलांचे प्रश्न तसेच युवकांसाठी रोजगार, या मुद्द्द्यांवर त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधत निवडून आल्यानंतर प्राधान्याने काम करण्याचा विश्वास दिला.अक्षय नाणेकर सातत्यपूर्ण जनसंपर्कामुळे मतदारांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण झाले असून, त्यांना मिळणारा वाढता पाठिंबा त्यांच्या प्रचाराला अधिक बळ देत आहे. महिलांचा, युवकांचा तसेच ज्येष्ठ नागरिकांचा मोठा सहभाग या प्रचार दौऱ्यात दिसून येत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या धोरणांचा व आजवर केलेल्या समाजकार्याचा आढावा घेत भविष्यात कारेगाव -कान्हूर मेसाई गणाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी मी कटिबद्ध आहे. गावागावांचा समतोल विकास साधत शेतकरी, महिला व युवकांना केंद्रस्थानी ठेवून काम करणार आहे.
अक्षय नाणेकर
पुणे : पुणे शहरातील स्वारगेट एसटी स्थानकाच्या आवारात एका प्रवासी युवतीवर 25 फेब्रुवारी 2025 रोजी…
शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्यातील शिरूर-न्हावरे मार्गावरील करडे घाट परिसर आज (सोमवरा) सायंकाळी पाच…
मंगळवेढा: सातारा येथे झालेल्या ५२ व्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत मानाचा ‘हिंदकेसरी’ किताब पटकावून मंगळवेढा तालुक्यातील…
पुण्यश्लोक, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या चरणी सुनेत्रा अजित पवार नतमस्तक मुंबई: स्वराज्यजननी जिजाऊ माँसाहेब, पुण्यश्लोक…
अहिल्यानगर: लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 व्या जयंतीनिमित्त चौंडी येथे आयोजित भव्य जयंती सोहळ्यात…
मुंबई: कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलताना नवनाथ बन यांनी केलेल्या विधानांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने समाचार…