शिरूर (अरुणकुमार मोटे): शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज शिरूर तहसील कार्यालयासमोर आ. गोपीचंद पडळकर यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध करण्यासाठी तीव्र आंदोलन छेडण्यात आले. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्याविषयी आ. पडळकर यांनी केलेल्या वाचाळ वक्तव्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील शिवसैनिक आणि मराठी जनतेच्या भावना दुखावल्या आहेत.
या पार्श्वभूमीवर आज पुणे जिल्हा संपर्कप्रमुख आमदार सचिनभाऊ आहिर, ज्येष्ठ नेते रविंद्रजी मिर्लेकर व जिल्हाप्रमुख अशोकरावजी खांडेभराड यांच्या मार्गदर्शनाखाली हे तीव्र आंदोलन पार पडलं. आंदोलनादरम्यान संतप्त शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत आ. पडळकर यांच्या निषेधाचा झणझणीत आवाज शिरूर शहरात घुमवला.
आंदोलनात उपतालुकाप्रमुख अनिल पवार, शेतकरीसेना तालुकाप्रमुख योगेश ओव्हाळ पाटील, तालुका सल्लागार संतोष काळे, ज्येष्ठ शिवसैनिक खुशालबापू गाडे, महिला आघाडीच्या संगिताताई शिंदे, ग्राहक संरक्षणचे कैलास पवार, मा. चेअरमन तात्या धावडे, मा. सरपंच बंडूसेठ पवार, व्हा. चेअरमन साहेबराव कारंडे, तसेच अजित पवार, दौलत पवार, प्रताप चव्हाण, सुनिल चव्हाण, संतोष चौधरी, संदीप पवार, ग्राहक संरक्षणचे सुनिल खळदकर यांच्यासह शिवसेनेच्या अंगीकृत संघटनांचे आजी-माजी पदाधिकारी, महिला आघाडीच्या कार्यकर्त्या व मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.
या वेळी बोलताना नेत्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “शिवसेनेच्या आणि मराठी माणसाच्या अस्मितेला जो दुखावेल, त्याला महाराष्ट्रात कोठेही जागा नाही. पडळकर यांनी केलेली तुलना शिवरायांचा आणि तमाम मराठी जनतेचा अपमान आहे. अशा नालायक विधानांचा निषेध करणे हीच खरी शिवसेनेकरी जबाबदारी आहे. यावेळी शिस्तबद्ध आणि ठाम पद्धतीने झालेले आंदोलन हे इतर राजकीय पक्षांसाठीही एक संदेश देणारे ठरले. आंदोलनात सहभागी शिवसैनिकांच्या चेहऱ्यावर आक्रोश नव्हे तर स्वाभिमान होता.
आजकाल लोक फिटनेस आणि स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी अनेकदा अंडी आणि चिकनचे सेवन करतात, परंतु त्याऐवजी…
जसजसं तापमान वाढत जातं आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या डोकं वर काढणं सुरू करतात. कमजोरी, थकवा, डिहायड्रेशन,…
जेवण करताना अनेकदा घरातील मोठी मंडळी ‘सावकाश जेव’ असे सांगतात. काही लोक अत्यंत हळू हळू…
पुणे: श्री क्षेत्र भीमाशंकरचा सर्वांगीण विकास करून हे तीर्थक्षेत्र पर्यटन, स्थानिक रोजगार आणि अर्थव्यवस्थेला चालना देणारे…
मुंबई: राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या ‘छात्रों की गुंज’ अभियानाची भाजप आणि देवेंद्र फडणवीस सरकारने…
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे एकदिवसीय राज्यव्यापी शिबिर येत्या २७ सप्टेंबर २०२६ रोजी नाशिक येथे आयोजित करण्यात येणार…