शिरूर (अरुणकुमार मोटे): शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज शिरूर तहसील कार्यालयासमोर आ. गोपीचंद पडळकर यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध करण्यासाठी तीव्र आंदोलन छेडण्यात आले. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्याविषयी आ. पडळकर यांनी केलेल्या वाचाळ वक्तव्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील शिवसैनिक आणि मराठी जनतेच्या भावना दुखावल्या आहेत.
या पार्श्वभूमीवर आज पुणे जिल्हा संपर्कप्रमुख आमदार सचिनभाऊ आहिर, ज्येष्ठ नेते रविंद्रजी मिर्लेकर व जिल्हाप्रमुख अशोकरावजी खांडेभराड यांच्या मार्गदर्शनाखाली हे तीव्र आंदोलन पार पडलं. आंदोलनादरम्यान संतप्त शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत आ. पडळकर यांच्या निषेधाचा झणझणीत आवाज शिरूर शहरात घुमवला.
आंदोलनात उपतालुकाप्रमुख अनिल पवार, शेतकरीसेना तालुकाप्रमुख योगेश ओव्हाळ पाटील, तालुका सल्लागार संतोष काळे, ज्येष्ठ शिवसैनिक खुशालबापू गाडे, महिला आघाडीच्या संगिताताई शिंदे, ग्राहक संरक्षणचे कैलास पवार, मा. चेअरमन तात्या धावडे, मा. सरपंच बंडूसेठ पवार, व्हा. चेअरमन साहेबराव कारंडे, तसेच अजित पवार, दौलत पवार, प्रताप चव्हाण, सुनिल चव्हाण, संतोष चौधरी, संदीप पवार, ग्राहक संरक्षणचे सुनिल खळदकर यांच्यासह शिवसेनेच्या अंगीकृत संघटनांचे आजी-माजी पदाधिकारी, महिला आघाडीच्या कार्यकर्त्या व मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.
या वेळी बोलताना नेत्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “शिवसेनेच्या आणि मराठी माणसाच्या अस्मितेला जो दुखावेल, त्याला महाराष्ट्रात कोठेही जागा नाही. पडळकर यांनी केलेली तुलना शिवरायांचा आणि तमाम मराठी जनतेचा अपमान आहे. अशा नालायक विधानांचा निषेध करणे हीच खरी शिवसेनेकरी जबाबदारी आहे. यावेळी शिस्तबद्ध आणि ठाम पद्धतीने झालेले आंदोलन हे इतर राजकीय पक्षांसाठीही एक संदेश देणारे ठरले. आंदोलनात सहभागी शिवसैनिकांच्या चेहऱ्यावर आक्रोश नव्हे तर स्वाभिमान होता.
शिक्रापुर (अक्षय टेमगिरे) पुणे-नगर महामार्गावर अपघातांची मालिका काही केल्या थांबत नसुन शिक्रापुर (ता. शिरुर) येथील…
शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील शिंदोडी गावात घोड नदीलगत असणाऱ्या शेतात काळी माती…
मुंबई: सहकार, पणन आणि कृषी व्यवसाय क्षेत्रासाठी प्रशिक्षित व सक्षम मनुष्यबळ तयार करण्याच्या दृष्टीने पुणे…
मुंबई: कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारने वाऱ्यावर सोडले असून त्यांना काहीही…
मुंबई: राज्यातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात येणाऱ्या निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय…
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहर व परिसरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर अखेर नागरिकांच्या सुरक्षिततेचा…