शिरुर (तेजस फडके) शिरुर शहर भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा शहराध्यक्षपदी तुषार चंद्रकांत भदाणे यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे. यापूर्वी भदाणे यांनी मयुरेश मित्र मंडळ चिंचवड गावचे कार्याध्यक्ष म्हणून काम केले आहे. त्याच माध्यमांतून शिरुर व रामलिंग या ठिकाणी त्यांनी युवक आणि ज्येष्ठ व्यक्तींना बरोबर घेऊन त्यांनी रामनवमी उत्सवाच्या माध्यमातून त्यांचे काम चालू होते. गेल्या 25 वर्षांपासुन त्यांना सामाजिक कार्याचा अनुभव असल्यामुळे त्यांच्यावर शिरुर शहर भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
शिरुर शहर भाजपाचे अध्यक्ष नितीन पाचर्णे यांनी तुषार भदाणे यांना नियुक्तीचे पत्र दिले. शिरुर-हवेली विधासभा निवडणुक प्रमुख प्रदीप कंद, जिल्हा नियोजन समिती सदस्य राहुल पाचर्णे, भाजपाचे शिरुर तालुकाध्यक्ष आबासाहेब सोनवणे, पुणे जिल्हा सरचिटणीस भगवान शेळके, दिनेश पडवळ, शरद पवार, शोभना पांचगे, कैलास सोनवणे, केशव लोखंडे, संजय काळे, अनिकेत थोरात, श्रीकांत घावटे, गणेश पाचर्णे, सनी जाधव, विजय नरके, सचिन मृत्याल, विवेक नझन, प्रविण काळे, केतन मल्लाव, अमोल लुनिया,साहील गुंजाळ, विकास वाळुंज, गणेश गवारे, सोनू काळे, अतुल गुप्ता, सुमित बागवे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना भदाणे म्हणाले, माझ्यावर शहराध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच मी पूर्णपणे पक्ष बांधणीसाठी प्रामाणिकपणे जबाबदारी पार पाडेल अशी त्यांनी भावना व्यक्त केली. भारतीय जनता पार्टी शिरुर शहरांमध्ये युवकांची मोठी बांधणी करणार असून येत्या काळात पक्षाला याचा फायदा होईल असे त्यांनी सांगितले. तसेच केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना समाजातील तळागाळातील सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी काम करणार असल्याचे तसेच लोकांची विविध कामे आणि प्रश्न पक्षाच्या माध्यमातून सोडविण्यासाठी यापुढील काळात काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात संघटनात्मक पातळीवर महत्त्वाचे फेरबदल करण्यात आले आहेत. पक्षाचे…
दिशा वाकानीच्या कमबॅकची व्यक्त केली इच्छा; 'तारक मेहता का उल्टा चष्मा'च्या 18 वर्षांच्या सेलिब्रेशनमध्ये कलाकारांच्या…
ऑगस्ट महिन्याच्या प्रारंभासोबतच धार्मिक आणि आध्यात्मिक वातावरणाला अधिक रंग चढला आहे. हिंदू पंचांगानुसार हा महिना…
मुंबई : झी मराठीवरील लोकप्रिय मालिका तारिणी मध्ये कथानकाने पुन्हा एकदा थरारक वळण घेतले आहे.…
मुंबई : राज्यातील जमिनीच्या आणि मालमत्तेच्या व्यवहारांमध्ये पारदर्शकता, सुरक्षितता आणि मालकी हक्क अधिक बळकट करण्यासाठी…
रात्रीचं जागरण, अवेळी झोपणं, उठणं, यामुळे पित्त होणं, पोट साफ न होणं, अपचन, बद्धकोष्ठता, उष्णता…