शिरुर (अरुणकुमार मोटे): दरवर्षी महाराष्ट्र शासनाच्या कृष्णा खोरे विकास महामंडळ अंतर्गत असणाऱ्या खडकवासला पाटबंधारे विभागाअंतर्गत भीमा नदीवरील तसेच कुकडी प्रकल्पातील डिंभे पाटबंधारे विभागाअंतर्गत उजव्या कॅनाल व घोडनदीवरील शेतकऱ्यांकडून दरवर्षी पाणी वापरापोटी या विभागाकडून पाणीपट्टी वसूल केली जाते.
सदरची पाणीपट्टी वसूल केली जात असताना शेतकऱ्यांकडून पैसे घेतल्यानंतर पाटबंधारे कर्मचाऱ्यांकडून शेतकऱ्यांना पैसे भरल्याची पावती दिली जात नाही. शेतकऱ्यांनी सबंधित कर्मचाऱ्याकडे पावतीची मागणी केल्यास उद्या देऊ, परवा देऊ असे ढकलत पावती देण्यास टाळाटाळ केली जाते.
नंतरच्या काळात शेतकरी आपल्या कामाच्या गडबडीत पावती घ्यायची विसरुन जातो. याचा गैरफायदा घेऊन हे कर्मचारी ती पाणीपट्टीची रक्कम स्वतःच्या खिशात घालतात व यामुळे शेतकरी आपोआपच थकबाकीत जातो. अशा प्रकारच्या तक्रारी शिरुर तालुक्यातून प्राप्त होत आहे. पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांनी हा विषय गांभीर्याने घेऊन यासाठी पारदर्शक पद्धतीने पाणीपट्टी भरणा सिस्टम राबवता येईल का हे पाहावे अशी शेतकरी वर्गाची मागणी आहे.
रांजणगाव गणपती (तेजस फडके) : ‘देवाच्या दारी सर्व भक्त समान’ असा संदेश समाजाला देणाऱ्या धार्मिक…
मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…
मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…
एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …