शिरूर (अरुणकुमार मोटे): काळूबाईनगर ही शिरूर तालुक्यातील कवठे केंद्रातील ३४ पट असलेली छोटी शाळा आणि छोट्या शाळेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात अडथळा येतो. हा गैरसमज दूर करण्याची कामगिरी या शाळेने करून दाखवली.
पालकांना आणि प्रेक्षकांना तब्बल साडेतीन तास एका जागेवर खिळवून ठेवण्याची किमया या शाळेतील विद्यार्थ्यांनी करून दाखवली. शिवराज्याभिषेक सोहळा,प्रतीकात्मक विवाह सोहळा, बळीराजाची व्यथा, महाराष्ट्राची लोकधारा असणारी लावणी, लोकगीते, विठुरायाचा गजर असे एकापेक्षा एक सरस सादरीकरणाने प्रेक्षकांचे मनोरंजन करताना हसवता हसवता कधी टचकन डोळ्यातून पाणी येणारे भावविवश प्रसंग उभे राहायचे,हे पाहणार्याच्याही लक्षात येत नव्हते. प्रत्येक गीतानंतर होणारा टाळ्यांचा कडकडाट आणि बक्षिसांची खैरात बरंच काही सांगून गेली. बैलगाडा शर्यत म्हणजे पुणे जिल्ह्याची शान,प्रत्यक्ष बैलगाडा स्पर्धेच्या घाटाचे वातावरण शेवटी तयार झाले होते.
कार्यक्रमाचे उदघाटन सावित्राशेठ थोरात यांच्या शुभहस्ते झाले. कार्यक्रमासाठी बाळासाहेब डांगे, वसंतशेठ पडवळ, मनीषाताई नरवडे, रवींद्र पडवळ, मालुबाई मिंडे, अविनाश पोकळे, बापूसाहेब लांडगे, शरद निंबाळकर, अविनाश चव्हाण, सतीश पाचर्णे, विठ्ठल मुंजाळ, मारुतीशेठ इचके, कैलास गारगोटे, प्रभाकर शेळके, श्रीकांत निचित, भास्कर थोरात, पी सी बारहाते ,शरद धोत्रे,लहू शितोळे, कैलास सोदक, बाबासाहेब शेरकर, पाटीलबुवा डफळ, संतोष जाधव, एकनाथ शिंदे, अयुब तांबोळी, सुनील खोमणे, बाळासाहेब इचके, मच्छिन्द्रनाथ कुंभार, संतोष निचित, बाबाजी निचित, शैला इचके, प्रमिला इचके, राजश्री अरुणकुमार मोटे, ज्योती निचित यांनी उपस्थित राहून बालकलाकारांच्या कलेला दाद दिली.
कार्यक्रमाचे नियोजन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संभाजी इचके, उपाध्यक्षा शामल इचके,रामभाऊ इचके, मनोहर नरवडे, सुधीर पडवळ, विद्या इचके, नितीन इचके, गणेशशेठ इचके, दिलीप इचके, मुख्याध्यापक बाबाजी मेचे यांनी केले. सूत्रसंचालन कैलास पडवळ व निलेश पडवळ यांनी केले, आभार प्रकाश इचके सर यांनी मानले.
मुंबई : राज्यातील स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य द्यावे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२०…
मुंबई: जगभरात वेगाने विकास होत असताना महाराष्ट्रानेही देशाच्या गतिशील विकासाचे ‘चेंज मेकर्स’ बनावे, असे आवाहन…
उल्हासनगर : उल्हासनगर आणि कल्याण शहरासह ग्रामीण परिसरात दिवसातून अनेकवेळा वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांमध्ये…
रांजणगाव गणपती (तेजस फडके): कारेगाव येथील बहुचर्चित ‘कारेश्वर भिशी’ प्रकरणाने आता गंभीर वळण घेतले असून,…
महिन्याला एकदा रूटीन चेकअप करणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. रूटीन चेकअपचे फायदे रोग लवकर ओळखणे नियमित…
च्यवनप्राश एक प्राचीन आयुर्वेदिक औषध आहे. ज्याचे शतकानुशतके भारतीय घरांमध्ये सेवन केले जात आहे. हा…