महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ग्रामपंचायत कडे मागणी
शिक्रापूर (शेरखान शेख): पिंपळे जगताप (ता. शिरुर) येथे मुख्य रस्त्याच्या कडेला कचऱ्याचे ढीग साचल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत असल्याने येथील कचऱ्याची विल्हेवाट लावत ठोस उपाययोजना करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने ग्रामपंचायत कडे करण्यात आली आहे.
पिंपळे जगताप (ता. शिरुर) येथील शिक्रापूर चाकण रस्त्यासह इतर ठिकाणी व्यवसायिक कचरा टाकत असल्याने अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचून दुर्गंधी पसरली आहे.
कचरा अनेकदा पेट घेत असल्याने वायू प्रदूषण देखील होत असल्याने येथील कचऱ्याची विल्हेवाट लावत कायमस्वरुपी उपाययोजना करण्याबाबतची मागणी करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शाम बेंडभर, संतोष सोंडेकर, गणेश नाईकनवरे, अजिंक्य तांबे, भूषण शितोळे यांसह आदींनी ग्रामपंचायत कार्यालयात निवेदन देत सदर कचरा प्रश्न सोडवण्याची मागणी केली आहे.
पिंपळे जगताप ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी मिलिंद केंज यांच्याशी संपर्क साधला असता ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत या प्रश्नाबाबत चर्चा करुन मार्ग काढला जाईल, असे ग्रामविकास अधिकारी मिलिंद केंज यांनी सांगितले.
७५ वर्षीय केरबा खोरे यांच्या व्यथेला राज्यभरातून प्रतिसाद; तहसीलदार बाळासाहेब म्हस्के व आमदार माउली कटके…
शिरुर (तेजस फडके) गोवंश संरक्षणाच्या उद्देशाने लागू करण्यात आलेल्या 'महाराष्ट्र पशु संरक्षण' कायद्याचा हेतू जरी…
शिरुर (तेजस फडके): चासकमान डाव्या कालव्याच्या अस्तरीकरणाच्या मनमानी, विस्कळीत आणि शेतकरीविरोधी नियोजनाविरोधात आंबळे परिसरातील शेतकऱ्यांचा…
धावपळीच्या जीवनात आपण एकामागे एक सतत कामे करतो. मात्र हे आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते. याचा…
बहुतांश जणांची कामे ही सध्या बैठ्या स्वरूपाची असतात. विविध सरकारी कार्यालयात, बँकेत, आयटी मध्ये काम…
शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील निमोणे गावातील पिंपळाचीवाडी परिसरात घोड नदीच्या काठावर विद्युत मोटार सुरु…