शिरूर तालुका

पिंपळे जगतापच्या कचऱ्याची विल्हेवाट लावा…

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ग्रामपंचायत कडे मागणी

शिक्रापूर (शेरखान शेख): पिंपळे जगताप (ता. शिरुर) येथे मुख्य रस्त्याच्या कडेला कचऱ्याचे ढीग साचल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत असल्याने येथील कचऱ्याची विल्हेवाट लावत ठोस उपाययोजना करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने ग्रामपंचायत कडे करण्यात आली आहे.

पिंपळे जगताप (ता. शिरुर) येथील शिक्रापूर चाकण रस्त्यासह इतर ठिकाणी व्यवसायिक कचरा टाकत असल्याने अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचून दुर्गंधी पसरली आहे.

कचरा अनेकदा पेट घेत असल्याने वायू प्रदूषण देखील होत असल्याने येथील कचऱ्याची विल्हेवाट लावत कायमस्वरुपी उपाययोजना करण्याबाबतची मागणी करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शाम बेंडभर, संतोष सोंडेकर, गणेश नाईकनवरे, अजिंक्य तांबे, भूषण शितोळे यांसह आदींनी ग्रामपंचायत कार्यालयात निवेदन देत सदर कचरा प्रश्न सोडवण्याची मागणी केली आहे.

पिंपळे जगताप ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी मिलिंद केंज यांच्याशी संपर्क साधला असता ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत या प्रश्नाबाबत चर्चा करुन मार्ग काढला जाईल, असे ग्रामविकास अधिकारी मिलिंद केंज यांनी सांगितले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मंत्रालयातील पिण्याच्या पाण्याच्या टाकीमध्ये मांजर पडल्याचा संदेश खोटा

मुंबई: मंत्रालयातील पिण्याच्या पाण्याच्या टाकीमध्ये मांजर पडल्याच्या माहितीत तथ्थ नाही. पाण्याच्या टाक्यांवर लोखंडी झाकणे बसवलेली…

2 तास ago

शिंदेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत मोठे प्रवेश; राष्ट्रवादीला धक्का

ठाणे: राज्याच्या राजकारणात एकनाथ शिंदे यांच्या भोवती वाढणारा जनाधार पुन्हा एकदा स्पष्ट झाला आहे. “अपॉइंटमेंटशिवाय…

5 तास ago

लग्नाच्या आमिषाखाली फसवणूक? मुंबई महानगरपालिकेच्या सहायक आयुक्ताला अटक; प्रशासनात खळबळ

मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या के-ईस्ट वॉर्डचे सहायक आयुक्त नितीन शुक्ला यांना एका महिलेला लग्नाचे आमिष दाखवून…

5 तास ago

‘लोकल टू ग्लोबल’! खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा हार्वर्डमधील अभ्यास दौरा प्रेरणादायी

मुंबई: Dr. Shrikant Eknath Shinde यांनी अमेरिकेतील Harvard Kennedy School येथे आयोजित अभ्यासदौऱ्यात सहभागी होत…

5 तास ago

मेळघाटातील कुपोषणाचे भीषण वास्तव; वर्षभरात ९२ बालकांचा मृत्यू

अमरावती: राज्यातील प्रगत विकासाच्या दाव्यांना छेद देणारी धक्कादायक बाब समोर आली आहे. अमरावती जिल्ह्यातील मेळघाट…

7 तास ago

तुम्हीही रात्री मोबाईल उशीखाली घेऊन झोपता त्याचे होऊ शकतात गंभीर परिणाम

फोन आजकाल लोकांच्या जीवनाचा महत्वाचा भाग झाला आहे. फोन नसेल तर अनेकांची कामे रखडतात. सकाळी…

8 तास ago