सविंदणे (अरुणकुमार मोटे): शिरुरवरुन पाबळ, राजगुरुनगर, भिमाशंकर तसेच पारगाव, मंचर, नारायणगाव, आळेफाटा या मोठ्या गावांना जाणारा तसेच अष्टविनायक महार्गाला जोडणारा जवळचा व दळणवळणासाठी अतिशय महत्वाचा महामार्ग आहे.
परंतू या रस्त्यावरील आण्णापूर ते मलठण या रस्त्याची खड्डयांमुळे मोठी दुरावस्था झाल्याने वाहन चालकांचे वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे. खड्डयांमुळे अनेक अपघात या रस्त्यावर होत आहे.
गेले अनेक दिवसापासून या रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडले असून सार्वजनिक बांधकाम विभाग मात्र निद्रिस्त अवस्थेत आहे. तसेच मलठण गावठाणातील रस्त्याचे काम अपुर्ण राहील्याने वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
बाजार तळाजवळील रस्त्याच्या कडेला असलेला धोकादायक खड्डा अदयापही बुजवलेला नाही. आण्णापूर, मलठण रस्त्यावरील खड्डे दोन दिवसात न बुजवल्यास रास्ता रोको करण्याचा इशारा माजी सरपंच नाना फुलसुंदर, अशोक माशेरे, गणेश जामदार, व मलठण ग्रामस्थांनी दिला आहे..
मुंबई: महाराष्ट्रात अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांमुळे राज्यभर संतापाची लाट उसळली आहे. नुकत्याच समोर आलेल्या…
मुंबई: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर होत असताना मतदारांनी दाखवलेला विश्वास हा “आदरणीय अजितदादांच्या पवित्र…
पालकांची वाढती चिंता, समाजजागृती आणि यंत्रणांच्या जबाबदारीवर पुन्हा प्रश्नचिन्ह मुंबई: महाराष्ट्रात अल्पवयीन मुलींवरील अत्याचारांच्या सलग…
पुणे: पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथील चिमुकलीवरील अत्याचार व हत्येच्या घटनेने राज्यभर संताप व्यक्त होत असताना,…
जर तुम्ही दररोज सकाळी रिकाम्या पोटी विडयाचे पान खाल्ले तर तुम्हाला त्यातून बरेच फायदे मिळतील.…
बहुतेक लोक विविध पदार्थांमध्ये कढीपत्ता भरपूर वापरतात. कढीपत्ता जेवणाची चव वाढवण्याचे काम करतो. सांबर, डाळ,…