सविंदणे (अरुणकुमार मोटे): शिरुरवरुन पाबळ, राजगुरुनगर, भिमाशंकर तसेच पारगाव, मंचर, नारायणगाव, आळेफाटा या मोठ्या गावांना जाणारा तसेच अष्टविनायक महार्गाला जोडणारा जवळचा व दळणवळणासाठी अतिशय महत्वाचा महामार्ग आहे.
परंतू या रस्त्यावरील आण्णापूर ते मलठण या रस्त्याची खड्डयांमुळे मोठी दुरावस्था झाल्याने वाहन चालकांचे वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे. खड्डयांमुळे अनेक अपघात या रस्त्यावर होत आहे.
गेले अनेक दिवसापासून या रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडले असून सार्वजनिक बांधकाम विभाग मात्र निद्रिस्त अवस्थेत आहे. तसेच मलठण गावठाणातील रस्त्याचे काम अपुर्ण राहील्याने वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
बाजार तळाजवळील रस्त्याच्या कडेला असलेला धोकादायक खड्डा अदयापही बुजवलेला नाही. आण्णापूर, मलठण रस्त्यावरील खड्डे दोन दिवसात न बुजवल्यास रास्ता रोको करण्याचा इशारा माजी सरपंच नाना फुलसुंदर, अशोक माशेरे, गणेश जामदार, व मलठण ग्रामस्थांनी दिला आहे..
शिंदोडी (तेजस फडके) शिंदोडी, ता. शिंदोडी येथील घोड धरणाच्या पात्रातुन शेतीच्या नावाखाली काळ्या मातीचा उपसा…
शिंदोडी (तेजस फडके) निमोणे (ता. शिरुर) येथे घोडनदीच्या पात्रातील पाण्याच्या बांधावरुन झालेल्या वादाचे रुपांतर थेट…
मुंबई: राज्यातील शिक्षकांना कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि डिजिटल तंत्रज्ञानाचे आधुनिक प्रशिक्षण देण्यासाठी शालेय शिक्षण विभाग…
मुंबई: महाराष्ट्रात मान्सूनच्या प्रगतीला झालेल्या विलंबाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे युवानेते जय पवार यांनी मुंबईतील प्रादेशिक…
शिवसेनेच्या हिरक महोत्सवी वर्धापन दिन सोहळ्यात शिंदेंचा विरोधकांवर हल्लाबोल; विधान परिषदेत महायुती सर्व १७ जागा…
नाशिक: केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी नाशिक–पुणे सरळ रेल्वेमार्ग रद्द करून तो नाशिक–शिर्डी–अहिल्यानगर मार्गे नेण्याची…