शिरूर तालुका

शिरुर येथील माई छात्रालयात अक्षर मानव संघटना आणि पर्यावरण मित्र बहुउदेशीय संस्थेच्या वतीने निबंध स्पर्धा

शिरुर (तेजस फडके) शिरुर येथील सिंधुताई सपकाळ यांच्या माई छात्रालय येथील विद्यार्थ्यांसाठी अक्षर मानव संघटना आणि पर्यावरण मित्र बहुउदेशीय संस्थेच्या वतीने पर्यावरण मित्र आणि माणूस म्हणजे काय…? या दोन विषयांवर नुकत्याच निबंध स्पर्धा घेण्यात आल्या. यावेळी सर्वच विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत उस्फुर्त सहभाग घेतला. याप्रसंगी डॉ संतोष पोटे यांनी अंधश्रद्धा निर्मूलन याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तर पत्रकार नितीन बारवकर तसेच पत्रकार प्रविण गायकवाड यांनी वर्तमान पत्राबद्दल मुलांना माहिती दिली. तसेच मुलांना वर्तमान पत्र कसे छापले जाते यासाठी प्रिंटिंग प्रेस दाखविण्याचे आश्वासन दिले.

 

यावेळी आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्था भारतच्या महाराष्ट्र राज्य महिला प्रसिद्धीप्रमुख जिजाबाई दुर्गे, महाराष्ट्र राज्य महिला सहसचिव सुजाता रासकर, पत्रकार सतिश धुमाळ, तर्डोबाचीवाडी गावाच्या सरपंच धनश्री मोरे, शिरुर नगरपालिकेच्या माजी नगरसेविका कविता वाटमारे, देवदैठणच्या माजी आदर्श सरपंच मंगल कौठाळे, आरोग्य खात्याच्या आशा गुंड, माई छात्रालयातील विनय सपकाळ, शुभांगी सपकाळ यांनी या कार्यक्रमाचे उत्तम नियोजन केले. तसेच शिरुर येथील मीरा नर्सिंग होमची संपुर्ण टीम यावेळी उपस्थित होती.

 

 

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुरचे PI विनोद पाटील यांच्यासाह डीबी पथकाची धडाकेबाज कारवाई

तीन गावठी बनावटीची पिस्तुले आणि चार जिवंत काडतुसे जप्त  शिरुर (तेजस फडके) शिरुर पोलिस ठाण्याचा…

2 तास ago

पुण्यात पेढे खाल्ल्यानंतर अनेकांना विषबाधा; गुरुनानक डेरी सील, FDAची कारवाई

पुणे: पुण्यातील खराडी परिसरात नवीन कारच्या डिलिव्हरीचा आनंद साजरा करताना वाटण्यात आलेल्या पेढ्यांमुळे अनेक जण…

9 तास ago

ठाकरे गटाला मोठा धक्का? ६ खासदार शिंदे गटाच्या संपर्कात; सुषमा अंधारेंचा गंभीर आरोप

नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडींना वेग आला असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब…

9 तास ago

पावसाळ्यात ओलसर कपडे घालताना काळजी घ्या

सध्या पावसाळा सुरु आहे. पावसाळ्यात ऊन कमीच पडते. त्यामुळे वातावरण जरा ओलसरच असते. तसेच कपडे…

9 तास ago

तंत्रज्ञानाचा अतिवापर व्यसनापेक्षा कमी नाही, मानसिक आरोग्यावर होतोय परिणाम

बदलत्या जीवनशैलीनुसार संपूर्ण जग तंत्रज्ञानाच्या आविष्कारांनी वेढलेले आहे. त्यातच आजकालची तरुण मंडळी आपला बहुतेक वेळ…

9 तास ago

पालक भाजीचे गुणधर्म

सर्व पालेभाज्यांमध्ये पालक ही सर्वश्रेष्ठ भाजी आहे. पालक ही भाजी आहारात जेवढी महत्त्वाची आहे तेवढीच…

9 तास ago