Mahaganpati
रांजणगाव गणपती (किरण शेलार-पिंगळे) : अष्टविनायकांपैकी एक असलेल्या शिरुर तालुक्यातील श्री क्षेत्र रांजणगाव गणपती येथे यंदाच्या भाद्रपद गणेशोत्सवाची जय्यत तयारी पूर्ण झाली आहे. रविवार (ता. २४ ऑगस्ट) पासून यात्रेला सुरुवात होत असून, हा सोहळा शनिवार (ता. ३० ऑगस्ट) पर्यंत मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. भाविकांना महागणपतीचे मुक्तद्वार दर्शन घेण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.
मुक्तद्वार दर्शनाचे वैशिष्ट्य…
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही भाविकांना मुख्य गाभाऱ्यात प्रवेश करून थेट श्री महागणपतीच्या मूर्तीला स्पर्श करून दर्शन घेण्याची संधी मिळणार आहे. ही पर्वणी भाविकांसाठी अतिशय दुर्मिळ असल्याने मोठ्या संख्येने भक्त येथे दाखल होतात.
पालखी सोहळे आणि द्वारयात्रा…
भाविकांसाठी सुविधा व सुरक्षा व्यवस्था…
भाविकांसाठी दर्शनबारी, पिण्याच्या पाण्याची सोय, पार्किंग आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यात्रेच्या काळात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार असून तहसीलदार बाळासाहेब म्हस्के, पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्यासह प्रशासनाचे अधिकारी सज्ज आहेत.
धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम…
संपूर्ण आठवडाभर विविध धार्मिक विधी, कीर्तन, भजन तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
रांजणगाव देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षा स्वाती पाचुंदकर पाटील, मुख्य विश्वस्त ओंकार देव, उपाध्यक्ष संदीप दौंडकर, सचिव डॉ. तुषार पाचुंदकर पाटील, खजिनदार विजय देव, व्यवस्थापक बाळासाहेब गोऱ्हे, संतोष रणपिसे व पुजारी मंडळी यांनी भाविकांसाठी भव्य आयोजन केले आहे. त्यामुळे भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महागणपतीचे मुक्तद्वार दर्शन व धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन देवस्थान ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.
नक्की काय आहे रांजणगाव गणपतीचा इतिहास…?
शिक्रापूर : शिरूर तालुक्यातील वरुडे येथील एका अल्पवयीन मुलाने जुन्या वादाचा राग मनात धरून, गेल्या…
शिरूर (तेजस फडके) : नवीन खरेदी केलेल्या शेतजमिनीच्या वादातुन एकाने आपल्या साथीदारांच्या मदतीने एका चुलत…
शिक्रापुर (ओंकार भोरडे) शिरुर तालुक्यातील वरूडे गावात घराबाहेर झोपलेल्या व्यक्तीच्या निर्घृण हत्येचा उलगडा अवघ्या 36…
मुंबई : मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती, शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी आणि नाशिक कुंभमेळ्यानिमित्त तपोवन विकासासाठी आर्थिक…
नागपूर: महायुती सरकारने जाहीर केलेली शेतकरी कर्जमाफी ही सरसकट नसून अनेक जाचक अटी-शर्तींनी युक्त असल्याने…
मुंबई: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या २०२६ ते २०३१ या पंचवार्षिक कार्यकाळासाठी झालेल्या निवडणुकीत निर्माता…