शिक्रापुर (शेरखान शेख) शिक्रापुर (ता. शिरुर) येथील ग्रामस्थांनी चार दिवसांपासून कचरा बंद आंदोलन सुरु केल्याने नागरिकांच्या घरात कचरा साठून राहिला असल्याचे समोर येत असुन आता ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांची कचरा आंदोलनाबाबत नुकतीच बैठक संपन्न झाली आहे.
शिक्रापूर येथील ग्रामस्थांनी चार दिवसांपासून कचरा बंद आंदोलन सुरु केले असल्यामुळे ग्रामपंचायतच्या कचरा गाड्या देखील बंद झाल्याने नागरिकांच्या घरातील कचरा घरातच साठवला गेला. मात्र त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न देखील निर्माण झाला आहे. तर नुकतीच ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांची याबाबत बैठक संपन्न झाली. यावेळी सरपंच रमेश गडदे, उपसरपंच मयूर करंजे, ग्रामविकास अधिकारी शिवाजी शिंदे, माजी उपसरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य रमेश थोरात, सुभाष खैरे, विशाल खरपुडे, त्रिनयन कळमकर, प्रकाश वाबळे, सारिका सासवडे, सोमनाथ भुजबळ, गणेश लांडे यांसह आदी उपस्थित होते.
दरम्यान यावेळी झालेल्या बैठकीत काही ठिकाणी भाडे तत्वावर कचरा प्रकल्पासाठी जागा घेऊन प्रकल्प उभारण्याबाबत चर्चा झाली परंतु अनेक ठिकाणहून नागरिकांनी आमच्या भागात कचरा प्रकल्प नको म्हणून ग्रामपंचायतकडे तक्रारी अर्ज दाखल केले त्यामुळे अडचण निर्माण झाली असताना अखेर एका ठिकाणी भाडेतत्वावर शेड घेण्याच्या चर्चेवर शिक्कामोर्तब झाले मात्र आता पुढे काय होणार याकडे सर्व नागरिकांसह ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
सध्या ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांची बैठक झाली असून एका ठिकाणी रेडी असलेले शेड भाडेतत्वावर घेण्याचे ठरले असून त्याबाबत लवकरच कार्यवाही केली जाणार असून सध्याचा गोळा होणारा कचरा एका अन्य ठिकाणी संकलित करण्याचे काम सुरु करण्यात आले असल्याचे ग्रामविकास अधिकारी शिवाजी शिंदे यांनी सांगितले.
मुंबई: देशातील प्रतिष्ठित पत्रकार संघटनांपैकी एक असलेल्या Mumbai Press Club ने आपल्या तीन सदस्यांची हकालपट्टी…
मुंबई: राज्यातील पर्यटन क्षेत्र अधिक सक्षम, परिणामकारक आणि पर्यटकाभिमुख करण्यासाठी पायाभूत सुविधा मजबूत करणे, सेवांचा…
सोशल मीडियातून मैत्री करून लॉजवर नेऊन अत्याचार; अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल केल्याचा आरोप, १५ हून अधिक…
मुंबई: राज्यातील कामगार क्षेत्रातील कायदे अधिक सुलभ, पारदर्शक आणि प्रभावी करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने महत्त्वपूर्ण…
मुंबई: छत्रपती संभाजीनगर येथून कुटुंबासह मुंबईत पर्यटनासाठी आलेली ८ वर्षीय अनाबिया सुलतान मुस्ताक शेख ही…
मुंबई: गोरेगावमधील पत्रा चाळ रहिवाशांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयात…