शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यात दोन दिवसांपासून पावसाचे वातावरण असून पश्चिम भागात आमदाबाद, मलठण, कवठे येमाई, टाकळी हाजी, निमगाव दुडे, फाकटे, म्हसे, माळवाडी या गावांमध्ये शुक्रवारी थोड्याफार प्रमाणात तर शनिवारी गारांसह पाऊस पडला आहे. या पावसामुळे काढणीला आलेल्या कांद्याचे नुकसान झाले असून या वातावरणाचा इतर पिकांनाही मोठा फटका बसला आहे. बियाणे तयार करण्यासाठी लावलेले कांदा पीक फुलोऱ्यात आले असून या पिकाचेही नुकसान झाले आहे.
अगोदरच कांद्यास बाजार नाही आणि या पावसामुळे कांदा पिकाबरोबरच बियाणे पीक सुध्धा धोक्यात आल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण आहे. या भागात डाळिंबाच्या बागा मोठ्या प्रमाणात असून क्रॉप कव्हर कागद टाकलेला असल्यामुळे काही प्रमाणात फळांचा बचाव झाला आहे. क्रॉप कव्हर कागदामुळे उन्हापासून तर बचाव होतोच शिवाय गारांपासूनही संरक्षण होत असल्याने डाळिंब शेतकऱ्यांनी क्रॉप कव्हर कागद टाकण्याचे आवाहन डाळिंब मार्गदर्शक कैलास गावडे यांनी केले.
शिरूर (तेजस फडके): पुणे-नगर महामार्गावरील कारेगाव (ता. शिरूर) येथील जयश्री फर्निचरच्या बाजूला असलेल्या लॉजिंगमध्ये सुरू…
शिरूर : शिरूर तालुक्यातील करडे घाटात दोन गुन्हेगार गटांच्या वादातून झालेल्या गोळीबारात विशाल सुनील काळे…
मुंबई: राज्याच्या सांस्कृतिक चळवळीला दिशा देणाऱ्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातील संचालकपद गेल्या दीड महिन्यांपासून रिक्त असल्याने…
पुणे : पुणे शहरातील स्वारगेट एसटी स्थानकाच्या आवारात एका प्रवासी युवतीवर 25 फेब्रुवारी 2025 रोजी…
शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्यातील शिरूर-न्हावरे मार्गावरील करडे घाट परिसर आज (सोमवरा) सायंकाळी पाच…
मंगळवेढा: सातारा येथे झालेल्या ५२ व्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत मानाचा ‘हिंदकेसरी’ किताब पटकावून मंगळवेढा तालुक्यातील…