शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यात दोन दिवसांपासून पावसाचे वातावरण असून पश्चिम भागात आमदाबाद, मलठण, कवठे येमाई, टाकळी हाजी, निमगाव दुडे, फाकटे, म्हसे, माळवाडी या गावांमध्ये शुक्रवारी थोड्याफार प्रमाणात तर शनिवारी गारांसह पाऊस पडला आहे. या पावसामुळे काढणीला आलेल्या कांद्याचे नुकसान झाले असून या वातावरणाचा इतर पिकांनाही मोठा फटका बसला आहे. बियाणे तयार करण्यासाठी लावलेले कांदा पीक फुलोऱ्यात आले असून या पिकाचेही नुकसान झाले आहे.
अगोदरच कांद्यास बाजार नाही आणि या पावसामुळे कांदा पिकाबरोबरच बियाणे पीक सुध्धा धोक्यात आल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण आहे. या भागात डाळिंबाच्या बागा मोठ्या प्रमाणात असून क्रॉप कव्हर कागद टाकलेला असल्यामुळे काही प्रमाणात फळांचा बचाव झाला आहे. क्रॉप कव्हर कागदामुळे उन्हापासून तर बचाव होतोच शिवाय गारांपासूनही संरक्षण होत असल्याने डाळिंब शेतकऱ्यांनी क्रॉप कव्हर कागद टाकण्याचे आवाहन डाळिंब मार्गदर्शक कैलास गावडे यांनी केले.
आजकालच्या लाइफ स्टाईलमध्ये शरीरात कोलेस्ट्रॉल जमा होऊन नसा ब्लॉक होणं एक सामान्य समस्या बनली आहे.…
लसणाच्या पाकळ्यात अँटिऑक्सिडंट असतात, जे शरीरातून विषारी पदार्थ काढून टाकतात. सूक्ष्मजंतू नष्ट करणारे प्रतिजैविक गुणधर्म…
एकता, कर्तव्य, युवाशक्ती आणि राष्ट्रहिताच्या भावनेतून विकसित भारत घडविण्याचा संदेश मुंबई: भारत हा केवळ भौगोलिक…
फास्ट ट्रॅक न्यायालये, १० वर्षांपर्यंत कारावास आणि १० कोटी दंडाच्या प्रस्तावित तरतुदींना शिंदेंचा पाठिंबा; विद्यार्थ्यांच्या…
मुंबई : नीट पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला असला तरी…
मुंबई : नीट पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचे स्वागत करत अखिल भारतीय…