शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यात दोन दिवसांपासून पावसाचे वातावरण असून पश्चिम भागात आमदाबाद, मलठण, कवठे येमाई, टाकळी हाजी, निमगाव दुडे, फाकटे, म्हसे, माळवाडी या गावांमध्ये शुक्रवारी थोड्याफार प्रमाणात तर शनिवारी गारांसह पाऊस पडला आहे. या पावसामुळे काढणीला आलेल्या कांद्याचे नुकसान झाले असून या वातावरणाचा इतर पिकांनाही मोठा फटका बसला आहे. बियाणे तयार करण्यासाठी लावलेले कांदा पीक फुलोऱ्यात आले असून या पिकाचेही नुकसान झाले आहे.
अगोदरच कांद्यास बाजार नाही आणि या पावसामुळे कांदा पिकाबरोबरच बियाणे पीक सुध्धा धोक्यात आल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण आहे. या भागात डाळिंबाच्या बागा मोठ्या प्रमाणात असून क्रॉप कव्हर कागद टाकलेला असल्यामुळे काही प्रमाणात फळांचा बचाव झाला आहे. क्रॉप कव्हर कागदामुळे उन्हापासून तर बचाव होतोच शिवाय गारांपासूनही संरक्षण होत असल्याने डाळिंब शेतकऱ्यांनी क्रॉप कव्हर कागद टाकण्याचे आवाहन डाळिंब मार्गदर्शक कैलास गावडे यांनी केले.
रांजणगाव गणपती (तेजस फडके) : ‘देवाच्या दारी सर्व भक्त समान’ असा संदेश समाजाला देणाऱ्या धार्मिक…
मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…
मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…
एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …