रांजणगाव गणपती (तेजस फडके): शिरुर तालुक्याच्या पचंतारांकित औद्योगिक वसाहत असलेल्या असलेल्या डॉंगकाॅंग कंपनीच्या व्यवस्थापनाने मनमानी कारभार करत कोणतीही पुर्वसुचना न देता तसेच कामगारांना अपमानास्पद वागणूक देवून, मारहाण, शिवीगाळ, नुकसानभरपाई न देता, खोटे आरोप करुन कायमस्वरुपी कंपनीत पर्मनंट असणाऱ्या काही ठराविक कामगारांना कामावरुन काढुन टाकले आहे. त्यामुळे जोपर्यंत या अन्यायग्रस्त कामगारांना न्याय मिळत नाही. तोपर्यंत कामगारांच्या वतीने भिम आर्मी भारत एकता मिशनचे संस्थापक अध्यक्ष अॅड भाई चंद्रशेखर आझाद, राष्ट्रीय अध्यक्ष विनय सिंग तसेच महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सिताराम गंगावणे यांच्या अध्यक्षतेखाली भिम आर्मी भारत एकता मिशन संघटनेच्या माध्यमातून मंगळवार (दि 15) रोजी धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे शिरुर-पारनेर-श्रीगोंदाचे प्रभारी संदिप शेलार आणि शिरुर तालुकाध्यक्षा दिपीका भालेराव यांनी सांगितले.
रांजणगाव गणपती MIDC तील व्हील्स इंडिया कंपनीपासुन सकाळी 9 वाजता या आंदोलनाची सुरवात होणार असुन अनेक पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या ठिकाणी कामगार डॉंगकाॅंग कंपनीचे कामगार त्यांच्या कुटुंबीयांसोबत या आंदोलनात सहभागी होणार आहेत. त्यानंतर कंपनीच्या गेटवर मुजोर प्रशासनाच्या विरोधात धरणे आंदोलन करण्यात येणार असुन यावेळी कंपनीने कामावरुन काढुन टाकलेल्या कामगारांना पुन्हा कामावर रुजू करुन घेणे, कामगारांची झालेली नुकसानभरपाई देणे, कंपनी व्यवस्थापकांवर योग्य ती कारवाई करणे अशा विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात येणार आहे.
यावेळी भिम आर्मी भारत एकता मिशन संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सिताराम गंगावणे, पुणे जिल्हा उपाध्यक्ष रियाज शेख, पुणे जिल्हा महासचिव अविनाश उबाळे, महिला नेत्या मंजुषा महेश कुलकर्णी, शिरुर तालुका अध्यक्ष दिपिका भालेराव, उपाध्यक्ष शहाजी पवार, महिला उपाध्यक्ष कविता भवार, युवा कार्यकर्ते महेश कुलकर्णी, संजय गव्हाणे, गणेश राठे व अनेक पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या आंदोलनास भूमिपुत्र सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सोमनाथ (बंटी) नवले तसेच आर पी गटाचे मनोज जगताप, विनोद जगताप यांनी या आंदोलनास पाठिंबा दर्शवला आहे.
मुंबई : मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती, शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी आणि नाशिक कुंभमेळ्यानिमित्त तपोवन विकासासाठी आर्थिक…
नागपूर: महायुती सरकारने जाहीर केलेली शेतकरी कर्जमाफी ही सरसकट नसून अनेक जाचक अटी-शर्तींनी युक्त असल्याने…
मुंबई: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या २०२६ ते २०३१ या पंचवार्षिक कार्यकाळासाठी झालेल्या निवडणुकीत निर्माता…
मुंबई: "नेत्रदान हे मानवतेचे श्रेष्ठदान असून एका व्यक्तीच्या नेत्रदानामुळे दृष्टीहीनांच्या आयुष्यात नवी पहाट निर्माण होऊ…
षण्मुखानंद सभागृहात दुपारी २ वाजता होणार कार्यक्रम; संघटन विस्ताराला प्राधान्य मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १०…
मुंबई : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अर्थशास्त्र विभाग आणि ऑल इंडिया प्रोफेशनल काँग्रेस यांच्या संयुक्त…