क्राईम

पाबळला जमिनीच्या वादातून मारहाण प्रकरणी दुसराही गुन्हा

शिक्रापूर (शेरखान शेख): पाबळ (ता. शिरुर) येथील माळतळे वस्ती येथे जमिनीच्या वादातून मारहाण प्रकरणी 7 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले असताना पुन्हा विरोधी गटाकडून 10 जणांवर परस्पर विरोधी तक्रार देण्यात आल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे मिनिनाथ ज्ञानोबा पिंगळे, मंदा मिनिनाथ पिंगळे, मंगेश मिनिनाथ पिंगळे, अनुष्का मिनिनाथ पिंगळे, पोपट ज्ञानोबा पिंगळे, अजित पोपट पिंगळे, नंदा पोपट पिंगळे, अमित पोपट पिंगळे, कांताराम ज्ञानोबा पिंगळे, छाया कांताराम पिंगळे यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

पाबळ (ता. शिरुर) येथील माळतळे वस्ती येथे राहणाऱ्या मीनानाथ पिंगळे व त्यांचा चुलत भाऊ अरुण पिंगळे यांच्यात जमिनीच्या वाटपावरुन दावा सुरु असून ते न्यायालयात प्रलंबित असताना मारहाण झाल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे मीनानाथ पिंगळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सात जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते.

त्यानंतर रत्नमाला सोमनाथ पिंगळे (वय ४२) रा. माळतळे वस्ती पाबळ (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादीवरुन शिक्रापूर पोलिसांनी मिनिनाथ ज्ञानोबा पिंगळे, मंदा मिनिनाथ पिंगळे, मंगेश मिनिनाथ पिंगळे, अनुष्का मिनिनाथ पिंगळे, पोपट ज्ञानोबा पिंगळे, अजित पोपट पिंगळे, नंदा पोपट पिंगळे, अमित पोपट पिंगळे, कांताराम ज्ञानोबा पिंगळे, छाया कांताराम पिंगळे सर्व रा. रा. माळतळे वस्ती पाबळ (ता. शिरुर) जि. पुणे यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक गणेश सुतार करत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

बारामतीकरांचा अभूतपूर्व कौल; सुनिल तटकरे यांचा मानाचा मुजरा, पश्चिम बंगाल परिवर्तनावरही भाष्य

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी बारामतीतील मतदारांचे आभार मानत विक्रमी मतदानाबद्दल मानाचा…

5 तास ago

बंगालमध्ये तृणमूल पिछाडीवर! वाघासारखं लढत राहू;  ममता बॅनरजी यांची प्रतिक्रिया

कोलकाता: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असताना मुख्यमंत्री Mamata Banerjee यांनी पहिली प्रतिक्रिया देत…

5 तास ago

भोर नसरापूर प्रकरण! आरोपीला फाशीचीच शिक्षा होणार;  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : भोर तालुक्यातील नसरापूर येथे चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या करणाऱ्या आरोपीला कठोरात कठोर…

5 तास ago

शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून भाजपावर काँग्रेसचा हल्लाबोल; सपकाळांचा गंभीर आरोप

मुंबई: काँग्रेस आघाडीच्या काळात शेतकऱ्यांना भरीव मदत मिळत होती, मात्र २०१४ नंतर भाजप सत्तेत आल्यानंतर…

6 तास ago

नातं हृदयाशी; बायपास सर्जरी

बायपास सर्जरी म्हटले की हातपाय गाळायचे दिवस आता गेले. बायपास केल्यानंतरही योग्य ती काळजी घेऊन…

10 तास ago

दक्षिणेत भाजपाला नकार, केरळमध्ये काँग्रेसचा विजय लोकशाहीचा; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्ष ने साम, दाम, दंड, भेद नीतीचा वापर…

10 तास ago