शिक्रापूर (ओमकार भोरडे): पारोडी हद्दीतील एनएच-५४८ महामार्गालगत उभारण्यात आलेला जिओ कंपनीचा मोबाईल टॉवर वारंवार बंद राहत असल्याने पारोडी व पंचक्रोशीतील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी टॉवर बंद केला जात असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला असून, यामुळे मोबाईल नेटवर्क सेवा पूर्णपणे विस्कळीत होत असल्याचे त्यांनी सांगितले.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, टॉवर बहुतांश वेळा नागरिक झोपल्यानंतर बंद केला जातो आणि सकाळी पुन्हा सुरू केला जातो. त्यामुळे शेतकरी, व्यापारी, विद्यार्थी तसेच सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. आपत्कालीन परिस्थितीत संपर्क साधणेही अशक्य होत असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
याच टॉवरच्या परिसरात मागील वर्षी एका शेतकऱ्याच्या ४७ गोण्या डाळिंब चोरी करण्याचा प्रयत्न झाला होता. त्या वेळी नेटवर्क उपलब्ध नसल्यामुळे इतर ग्रामस्थ किंवा पोलिसांशी तातडीने संपर्क साधणे शक्य झाले नसल्याचे समोर आले होते. शेतकऱ्याच्या प्रसंगावधानामुळे मोठे नुकसान टळले होते.
टॉवर वारंवार बंद राहत असल्याने चोरीच्या घटनांना चालना मिळू शकते, अशी भीतीही ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. या समस्येबाबत अनेक वेळा जिओ कस्टमर केअरकडे तक्रारी करूनही कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. विविध माध्यमांतून बातम्या प्रसिद्ध होऊनही कंपनी प्रशासनाने अद्याप दखल घेतली नसल्याने ग्रामस्थांचा संताप वाढला आहे.
दरम्यान, पुढील आठ ते दहा दिवसांत या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढला गेला नाही, तर रस्ता रोको आंदोलनासह जिओ टॉवरवर चढून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा पारोडी गावचे तंटामुक्ती अध्यक्ष डॉ. विश्वनाथ कोकरे, रविराज टेमगिरे, रजनी अविनाश टेमगिरे व इतर ग्रामस्थांनी दिला आहे.
पारोडी व पंचक्रोशीतील नागरिकांना अखंडित मोबाईल सेवा उपलब्ध करून देण्यासाठी जिओ कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने चौकशी करून योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
७५ वर्षीय केरबा खोरे यांच्या व्यथेला राज्यभरातून प्रतिसाद; तहसीलदार बाळासाहेब म्हस्के व आमदार माउली कटके…
शिरुर (तेजस फडके) गोवंश संरक्षणाच्या उद्देशाने लागू करण्यात आलेल्या 'महाराष्ट्र पशु संरक्षण' कायद्याचा हेतू जरी…
शिरुर (तेजस फडके): चासकमान डाव्या कालव्याच्या अस्तरीकरणाच्या मनमानी, विस्कळीत आणि शेतकरीविरोधी नियोजनाविरोधात आंबळे परिसरातील शेतकऱ्यांचा…
धावपळीच्या जीवनात आपण एकामागे एक सतत कामे करतो. मात्र हे आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते. याचा…
बहुतांश जणांची कामे ही सध्या बैठ्या स्वरूपाची असतात. विविध सरकारी कार्यालयात, बँकेत, आयटी मध्ये काम…
शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील निमोणे गावातील पिंपळाचीवाडी परिसरात घोड नदीच्या काठावर विद्युत मोटार सुरु…