शिरूर तालुका

शिरूर तालुक्यात लंपी रोगाचा प्रकोप; शेतकऱ्यांचे जनावरे संकटात, भरपाई व तत्काळ उपचाराची मागणी तीव्र

शिरूर (अरुणकुमार मोटे): सध्या शिरूर तालुक्यातील विविध गावांमध्ये गोवंश जनावरांमध्ये लंपी स्किन रोगाने थैमान घातले असून शेतकऱ्यांच्या उपजीविकेचा मुख्य आधार असलेल्या जनावरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. अनेक ठिकाणी जनावरे आजारी पडत असून काही ठिकाणी जनावरांचे मृत्यूही झाले आहेत. या गंभीर परिस्थितीकडे शासनाचे व वैद्यकीय अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.

सरकारी डॉक्टरांचा अभाव, उपचारांना खोळंबा

गावोगावी सरकारी पशुवैद्यकीय डॉक्टर वेळेवर उपलब्ध होत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. किरकोळ खासगी डॉक्टरांकडून उपचार करूनही रोगावर फारसा परिणाम होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे सरकारी स्तरावरून जलद हालचाल होणे आवश्यक आहे. असे मत शेतकरी निवृत्ती(नाना )काळोखे यांनी व्यक्त केले आहे.

संक्रमणाचा प्रादुर्भाव लक्षात घेता पशुवैद्यकीय विभागाने तातडीने घरोघरी जाऊन सर्वेक्षण करून रोगग्रस्त जनावरांची नोंद घ्यावी, तसेच लक्षणे दिसणाऱ्या जनावरांवर त्वरित उपचार सुरू करावेत, अशी ग्रामस्थांची जोरदार मागणी आहे.

शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी

लंपी रोगामुळे जनावरे मृत झालेल्या शेतकऱ्यांना शासनाने नुकसानभरपाई देण्याचे ठोस धोरण राबवावे, अशी मागणी गावागावातील सरपंच, ग्रामसेवक व शेतकरी करत आहेत. शेतकऱ्यांना आधार देणारी ही जनावरे मृत झाल्यास त्यांचे आर्थिक गणित कोलमडते. त्यामुळे भरपाई ही काळाची गरज बनली आहे.

या पार्श्वभूमीवर संबंधित गावातील सरपंच व ग्रामसेवक यांनी एकत्रितपणे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधून तातडीने उपाययोजना राबवाव्यात. याबाबत लवकरात लवकर बैठक घेऊन परिस्थितीचे गांभीर्य वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवणे अत्यावश्यक आहे.

शेतकऱ्यांच्या आरोग्य सुरक्षेसाठी एकजूट हवी

हा लंपी रोग केवळ जनावरांपुरता मर्यादित न राहता शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान घडवतो. त्यामुळे शासन, प्रशासन व ग्रामपंचायतींनी एकत्रितपणे काम करून या संकटावर मात करण्यासाठी प्रयत्नशील राहणे गरजेचे आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

20 वर्षांत 40 बदल्या! तुकाराम मुंढेंनाही मागे टाकणाऱ्या IPS अधिकारी डी. रूपा मौदगिल यांची धडाकेबाज कारकीर्द

मुंबई: प्रशासकीय सेवेत प्रामाणिक आणि कडक शिस्तीच्या अधिकाऱ्यांना अनेकदा राजकीय दबाव आणि वारंवार होणाऱ्या बदल्यांचा…

9 तास ago

चाकण एमआयडीसीतील समस्या प्राधान्याने सोडविण्यात येतील;  सुनेत्रा पवार

रस्ते, वाहतूक अन् पायाभूत सुविधांच्या प्रश्नांवर लवकरच वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक; उद्योग प्रतिनिधींशी सविस्तर चर्चा; प्रशासनाला…

17 तास ago

सुखबीर बादलांवर हल्ला करणारा जसपालसिंग कोण? पुण्यात वकिली, दोन वर्षांपासून गुरुद्वारात सेवा

नांदेड : शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख आणि पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये…

17 तास ago

एका वर्षात हजारो सरकारी शाळा घटल्या; महाराष्ट्रातही ३५७ शाळांना फटका

नवी दिल्ली : देशातील सरकारी प्राथमिक शाळांच्या संख्येत एका वर्षात तब्बल ९,८६६ ने घट झाल्याची…

17 तास ago

महागाईचा भडका; घरखर्चाचे गणित कोलमडले! उत्पन्न जैसे थे, मात्र खर्चाचा आलेख वाढता

नाशिक : महागाईचा वाढता आलेख सर्वसामान्य नागरिकांच्या घरगुती अर्थकारणावर परिणाम करू लागला आहे. किराणा मालासह…

17 तास ago

NCMC स्मार्ट कार्डला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद; १ कोटींहून अधिक नोंदणी

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) प्रवाशांसाठी सुरू करण्यात आलेल्या NCMC (National Common…

17 तास ago