शिरूर तालुका

अध्यात्म आत्मसात करणे काळाची गरज; समाधान शर्मा

शिक्रापूर (शेरखान शेख): प्रत्येक विद्यार्थ्याच्या जीवनात व समाजात शिक्षकांचे महत्त्व अनन्यसाधारण असून शिक्षक आपल्या अध्यापनातून व्यक्ती, समाज आणि राष्ट्राची निर्मिती करतो. त्यामुळे शिक्षका बरोबर विदयार्थांचे वागणे नेहमी आदर युक्त असले पाहीजे तसेच अध्यात्म आत्मसात करणे काळाची गरज असल्याचे मत ह.भ.प. समाधान महाराज शर्मा यांनी व्यक्त केले.

केंदूर (ता. शिरुर) येथील स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापुर संचालित सरदार रघुनाथराव ढवळे हायस्कूल येथे नुकतेच ह.भ.प. समाधान महाराज शर्मा यांनी विद्यार्थ्यांना आध्यात्मिक मार्गदर्शन केले. याप्रसंगी प्राचार्य अनिल साकोरे, संस्थेचे पुणे विभागीय सदस्य राम साकोरे, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष श्रीहरी पऱ्हाड, दत्ता साकोरे, निलेश साकोरे, दत्ता साकोरे, चंद्रकांत थिटे, महादेव पाटील, नंदू बहिरम, संजय जोहरे, मोतीलाल वागतकर, मनोज दोंड, बाळासो धस, दशरथ सुक्रे, सारीका पाटील, राजु पानमंद, सोमनाथ पिचड, शिवाजी ताथवडे यांसह आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी बोलताना अध्यात्मामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण होऊन जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रेरणा मिळते. शिक्षण हे परिवर्तनाचे प्रभावी माध्यम मानले गेले आहे. शिक्षणामुळे समाजात शांतीयुक्त क्रांती निर्माण होते. हे परिवर्तन घडत असताना हिंदुस्थानचा धार्मिक व सांस्कृतिक वारसा, इतिहास, ज्ञान, परंपरा यांच्या बरोबरीनेच आधुनिक जगातील वैज्ञानिक प्रगती आणि भविष्यकाळाची आव्हाने यांचाही समग्रतेने विचार होण्याची आवश्यकता असल्याचे सांगत विद्यार्थ्यांना महापुरुंषांची ओळख करून देत साने गुरुजीयांच्या कथेचा सात दिवसाचा सप्ताह प्रत्येक शाळेत घडला जावा असे देखील समाधान महाराज शर्मा यांनी व्यक्त केले सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राम साकोरे यांनी केले तर चंदकांत थिटे यांनी आभार मानले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

नारी शक्ती वंदन की सत्ता शक्ती वंदन? महिला आरक्षणावरून भाजपवर टीका

मुंबई: महिला आरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीवरून भाजपवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) चे प्रवक्ता ॲड.…

23 मिनिटे ago

मुंबई युवक काँग्रेसचा SIR प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न; ‘गिग वर्कर्स न्याय अभियान’ पुस्तिकेचे प्रकाशन

मुंबई: महाराष्ट्रात सुरू असलेल्या विशेष मतदार यादी पुनरिक्षण (Special Intensive Revision – SIR) प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर…

26 मिनिटे ago

मोदींच्या भाषणावर वडेट्टीवारांचा हल्लाबोल; महिला आरक्षणावर भाजपवर ‘इव्हेंटबाजी’चा आरोप

नागपूर: Vijay Wadettiwar यांनी पंतप्रधान Narendra Modi यांच्या कालच्या भाषणावर जोरदार टीका करत ते भाषण…

46 मिनिटे ago

महिला आरक्षण विधेयकावरून देशात राजकीय गदारोळ

मुंबई: महिला आरक्षण विधेयकाच्या पार्श्वभूमीवर देशातील राजकारण तापले असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची जोरदार मालिका…

50 मिनिटे ago

वाघाळे येथे अक्षय तृतीयेनिमित्त कृषी पूजनाने संस्कृतीचा जागर; बैलगाडीची भव्य शोभायात्रा…

शिरूर : शिरूर तालुक्यातील वाघाळे येथे १९ तारखेला पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या प्रेरणेतून कार्यरत स्वाध्याय…

3 तास ago

वाघोलीत घडली हृदयद्रावक घटना; उच्चशिक्षित महिलेने संपवलं आयुष्य…

वाघोली : वाघोलीतील 'रविनंदा कॉयलाईट' सोसायटीत एक हृदयद्रावक घटना घडली आहे. माहेरहून १० लाख रुपये…

4 तास ago