शिरूर (ओमकार भोरडे): काही दिवसांपूर्वी थांबलेली पारगाव–मंगरूळ–जांबुत–मलठण–शिक्रापूर–वाघोली–पुणे ही एसटी सेवा पुन्हा सुरू करण्यात आली असून प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. शिरूर आगारातून धावणारी ही गाडी आता टपालसेवाही नेणार असल्याने ती “टपाल गाडी” म्हणूनही ओळखली जाणार आहे, अशी माहिती चालक गणेश पलांडे व वाहक दत्तात्रय डोळस यांनी दिली.
या गाडीमुळे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी, नोकरी–धंद्यासाठी जाणाऱ्या कामगारांना तसेच पुण्यात उपचारासाठी जाणाऱ्या रुग्णांना मोठा आधार मिळणार आहे. या सेवेच्या पुनर्प्रारंभासाठी पोपट फिरोदिया जांबुत यांनी विशेष प्रयत्न केले असुन गाडी सुरू झाल्याच्या आनंदानिमित्त गणेगाव खालसा ग्रामस्थांच्या वतीने चालक पलांडे व वाहक डोळस यांचा मोठ्या उत्साहात सत्कार करण्यात आला. या वेळी माजी पोलीस पाटील विनायक दंडवते, दत्तात्रय भोगावडे, संजय तांबे, संतोष कड, महेश पवार, वैशाली बांगर, अनिकेत बांगर, पंकज बांगर, बापू बांगर, विजय भोसले, संभाजी बांगर, सतीश बोराडे, सोमनाथ बांगर, योगेश बेंडभर, सोमनाथ चातुर, कालिदास माकर, रमेश बोराडे, दिलीप काकडे, सचिन भोगावडे आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.या सेवेच्या पुनर्प्रारंभामुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…
मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…
मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…
लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…
शिरुर (तेजस फडके) सध्या सोन्याचा बाजार दिवसेंदिवस वाढत आहे. व्यक्तीला सोन खरेदी करणं सर्वसामान्य व्यक्तीच्या…