शिरूर तालुका

पिंपळे खालसात स्वातंत्र्य सेनान्याचे जल्लोषात अभीष्टचिंतन

शिक्रापूर (शेरखान शेख): पिंपळे खालसा (ता. शिरुर) येथे १९७६ साली आणीबाणीच्या काळामध्ये जेलमध्ये कारावास भोगलेले ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी पोपटराव विठ्ठलराव धुमाळ यांच्या कुटुंबीयांनी त्यांचा एक्काहत्तर वा अभिष्टचिंतन उत्साहात साजरा केला असल्याने स्वातंत्र्यसेनानीच्या कार्याला उजाळा मिळाला आहे.

पिंपळे खालसा (ता. शिरुर) येथील स्वातंत्र्यसेनानी विठ्ठलराव पोपटराव धुमाळ यांच्या कुटुंबीयांनी त्यांचे 71 वे अभिष्टचिंतन साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांचे चिरंजीव नवनाथ धुमाळ, दत्तात्रय धुमाळ, सुना आशा धुमाळ, वृषाली धुमाळ, मुली अलका दौंडकर, निशा शेळके यांनी पुढाकार घेत सर्व पाहुण्यांना निमंत्रित केले. त्यानंतर स्वातंत्र्यसेनानी विठ्ठलराव धुमाळ व त्यांच्या पत्नी विजया धुमाळ यांचे 71 दिव्यांनी औक्षण करण्यात आले.

यावेळी स्वातंत्र्य सेनानी संपत धुमाळ, शरद धुमाळ, कैलास धुमाळ, किशोर धुमाळ, सरपंच अश्विनी धुमाळ, उपसरपंच राजेन्द्र धुमाळ, पंचायत समिती सदस्य विक्रम पाचुंदकर, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षा दिपाली शेळके, कोषाध्यक्ष बाळासाहेब शेळके, चेअरमन संभाजी धुमाळ, दिलीप धुमाळ, शिरुर केसरी विशाल धुमाळ, माजी सरपंच रमेश धुमाळ, बाबासाहेब शिंदे, हर्षद जाधव, बाळासाहेब चव्हाण, ज्ञानेश्वर शेळके, माऊली शेळके यांसह आदी उपस्थित होते, सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी बाळासाहेब धुमाळ, माणिक धुमाळ, रघुनाथ धुमाळ, सायली काळे, अभिषेक धुमाळ, ऋषिकेश धुमाळ, समीक्षा धुमाळ, अक्षरा ढमढेरे, साक्षी जयत, सुरज दौंडकर, सिद्धार्थ शेळके, जिजा काळे, तनुष काळे यांनी विशेष परिश्रम घेतले

तर कुटुंबीयांनी अचानक केलेल्या या कार्यक्रम व स्वागताने स्वातंत्र्यसेनानी पोपटराव धुमाळ देखील भारावून गेले होते, तर यावेळी त्यांच्या कारकीर्द बाबत बोलताना जून १९७५ मध्ये पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी भारत देशावर आणीबाणी टाकल्यावर देशात चळवळ झाली, चळवळ झाल्यावर अटल बिहारी वाजपेयी, जयप्रकाश नारायण, लालकृष्ण आडवाणी यांनी सत्याग्रह चालू केले, दरम्यान माजी आमदार कै. बाबुराव दौंडकर यांनी सत्याग्रह करण्याचे ठरवल्याने शिरुर तालुक्यातील करंजावणे, पिंपळे धुमाळ, कोरेगाव भीमा, शिक्रापूर व शिरुर येथील 32 लोकांनी मिळून तळेगाव ढमढेरे येथे सत्याग्रह केला.

सत्याग्रह केल्यावर सर्वांना येरावडा येथे एक महिन्याची शिक्षा देण्यात आली, तर (दि. २४) नोव्हेंबर १९७६ रोजी जेलमध्ये असताना जेवणाची खूप हाल भोगले, मिळेल ती भाजी खाऊन जीवन जगलो, कपड्यांना उवा सुद्धा झाल्या मी एक महिन्याची शिक्षा भोगली परंतु बाबुराव दौंडकर यांना मिसा कायद्याखाली नाशिक येथे तेरा महिन्याची शिक्षा भोगावी लागली असल्याचे यावेळी स्वातंत्र्यसेनानी यांनी सांगितले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

19 तास ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

19 तास ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

19 तास ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

19 तास ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

19 तास ago

‘पंचनाम्यांची वाट कसली पाहता?’ दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या; वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा

नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…

19 तास ago