शिरूर तालुका

सार्वजनिक बांधकाम यांच्या दुर्लक्षपणामुळे अन्नापुरातील निकृष्ट सिमेंट रस्त्याचे काम अखेर दुबार

सामाजिक कार्यकर्ते निलेश वाळुंज यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील अन्नापुर गावठाणातील (रंगाअण्णा पवार यांच्या घरासमोरून अंगणवाडीकडे) जाणाऱ्या दहा लाखांचा निधी असलेल्या सीमेंट रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणामुळे निकृष्ट झाल्याबाबत “सामाजिक कार्यकर्ते निलेश वाळुंज” यांनी सा.बां. उपविभागाकडे वेळोवेळी प्रत्यक्ष भेटून, तसेच फोन/व्हॉट्स ॲप याद्वारे , जवळपास एक वर्षाहून अधिक पाठपुरावा केला होता.

या तक्रारीची दखल घेऊन सा.बां.शिरुर उपविभागाचे सहाय्यक अभियंता अनिल जाधव यांनी स्थळ पाहणी केली होती. आणि निकृष्ट काम ठेकेदाराकडून पुन्हा करण्याचे निर्देश दिले होते. मुळातच हे काम होताना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या निगराणी खाली होत असते हे अधिकारीच पुणे येथे राहावयास असून त्यांचे कोणत्याच कामाकडे लक्ष नसते त्यामुळे या भागातील अनेक कामे निकृष्ट पद्धतीने होत आहे. वाळुंज यांचा या कामाविषयी सातत्याने पाठपुरावा सुरू होता अखेर नुकतेच सदर काम पुनः करण्यात आले आहे, ही जनहितासाठी महत्त्वाची बाब आहे.

“रस्ता पुन्हा करण्यात आल्याने समाधान आहे; परंतु यासाठी पाठपुराव्यामध्ये जनतेचा मौल्यवान वेळ वाया जातो, अधिकाऱ्यांनी लक्ष दिल्यास सर्व सार्वजनिक कामे नियम, तांत्रिक निकष आणि शास्त्रीय पद्धतीनुसार गुणवत्तापूर्ण होतील. जेणेकरून नंतर पच्छाताप होणार नाही. निकृष्ट कामे देशाच्या विकासाला बाधा ठरतात. बांधकाम विभागांनी ‘शासन निर्देशांचे काटेकोर पालन’ करून त्याप्रमाणे कामांपूर्वी फलक लावणे व गुणवत्ता तपासणीवर कठोर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. जिथे दुर्लक्ष किंवा गैरप्रकार दिसतील, तिथे जागरूक नागरिक म्हणून आम्ही गप्प बसणार नाही.” या भागात निकृष्ट कामे होतील अशा अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे.

निलेश मंदा यशवंत वाळुंज

(सामाजिक कार्यकर्ता / व्हिसल ब्लोअर)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

जगाला गवसणी घालणारा भारत; 2047 पर्यंत महासत्ता होण्यासाठी राष्ट्रीय रोडमॅप

नवी दिल्ली : भारताला 2047 पर्यंत विकसित, समृद्ध, सुरक्षित, तंत्रज्ञानसमृद्ध आणि जगाच्या विकासात नेतृत्व करणारी…

9 तास ago

एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तक समितीवरून महेश तपासेंचा केंद्रावर हल्लाबोल

‘अभ्यासक्रम सुधारणा नव्हे, वैचारिक ताबा मिळविण्याचा प्रयत्न’; आरएसएस-भाजपशी संबंधित व्यक्तींच्या नियुक्तीचा आरोप मुंबई: इयत्ता ११ वी…

9 तास ago

पिंपळवंडीतील घटनेने संताप; वैशाली नागवडे यांनी घेतली पीडित कुटुंबीयांची भेट

मुंबई: जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथे घडलेल्या संतापजनक घटनेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा वैशाली नागवडे यांनी…

10 तास ago

‘धनुष्यबाण’ गोठवण्याच्या मागणीवरून शिवसेनेचा उबाठावर बोचरा प्रहार

मुंबई : शिवसेनेचे पक्षचिन्ह ‘धनुष्यबाण’ गोठवण्याची मागणी उबाठा गटाने न्यायालयात केल्यानंतर शिवसेनेने सोशल मीडियावर बोचरे…

10 तास ago

‘छात्रों की गुंज’साठी पुण्यात काँग्रेसची जोरदार तयारी; भाजपवर हर्षवर्धन सपकाळ यांचा हल्लाबोल

पुणे: विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या ‘छात्रों की गुंज’…

10 तास ago

शहरांच्या बकालपणावर काँग्रेसचा हल्लाबोल; ‘शहर परिवर्तन गटा’चा शुभारंभ

मुंबई: विकासाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर निधी खर्च होत असतानाही अनेक शहरांचे बकाल रूप झाले आहे.…

10 तास ago