शिरूर तालुका

सार्वजनिक बांधकाम यांच्या दुर्लक्षपणामुळे अन्नापुरातील निकृष्ट सिमेंट रस्त्याचे काम अखेर दुबार

सामाजिक कार्यकर्ते निलेश वाळुंज यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील अन्नापुर गावठाणातील (रंगाअण्णा पवार यांच्या घरासमोरून अंगणवाडीकडे) जाणाऱ्या दहा लाखांचा निधी असलेल्या सीमेंट रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणामुळे निकृष्ट झाल्याबाबत “सामाजिक कार्यकर्ते निलेश वाळुंज” यांनी सा.बां. उपविभागाकडे वेळोवेळी प्रत्यक्ष भेटून, तसेच फोन/व्हॉट्स ॲप याद्वारे , जवळपास एक वर्षाहून अधिक पाठपुरावा केला होता.

या तक्रारीची दखल घेऊन सा.बां.शिरुर उपविभागाचे सहाय्यक अभियंता अनिल जाधव यांनी स्थळ पाहणी केली होती. आणि निकृष्ट काम ठेकेदाराकडून पुन्हा करण्याचे निर्देश दिले होते. मुळातच हे काम होताना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या निगराणी खाली होत असते हे अधिकारीच पुणे येथे राहावयास असून त्यांचे कोणत्याच कामाकडे लक्ष नसते त्यामुळे या भागातील अनेक कामे निकृष्ट पद्धतीने होत आहे. वाळुंज यांचा या कामाविषयी सातत्याने पाठपुरावा सुरू होता अखेर नुकतेच सदर काम पुनः करण्यात आले आहे, ही जनहितासाठी महत्त्वाची बाब आहे.

“रस्ता पुन्हा करण्यात आल्याने समाधान आहे; परंतु यासाठी पाठपुराव्यामध्ये जनतेचा मौल्यवान वेळ वाया जातो, अधिकाऱ्यांनी लक्ष दिल्यास सर्व सार्वजनिक कामे नियम, तांत्रिक निकष आणि शास्त्रीय पद्धतीनुसार गुणवत्तापूर्ण होतील. जेणेकरून नंतर पच्छाताप होणार नाही. निकृष्ट कामे देशाच्या विकासाला बाधा ठरतात. बांधकाम विभागांनी ‘शासन निर्देशांचे काटेकोर पालन’ करून त्याप्रमाणे कामांपूर्वी फलक लावणे व गुणवत्ता तपासणीवर कठोर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. जिथे दुर्लक्ष किंवा गैरप्रकार दिसतील, तिथे जागरूक नागरिक म्हणून आम्ही गप्प बसणार नाही.” या भागात निकृष्ट कामे होतील अशा अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे.

निलेश मंदा यशवंत वाळुंज

(सामाजिक कार्यकर्ता / व्हिसल ब्लोअर)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

विड्याचे पान सेवन करण्याची पद्धत

जर तुम्ही दररोज सकाळी रिकाम्या पोटी विडयाचे पान खाल्ले तर तुम्हाला त्यातून बरेच फायदे मिळतील.…

2 तास ago

कढीपत्त्यापासून तयार केलेला चहा आरोग्यासाठी खूप फायदेशीर

बहुतेक लोक विविध पदार्थांमध्ये कढीपत्ता भरपूर वापरतात. कढीपत्ता जेवणाची चव वाढवण्याचे काम करतो. सांबर, डाळ,…

2 तास ago

राज्यात जनगणना मोहिमेला सुरुवात; नागरिकांना ‘स्व-गणना’ची सुविधा

मुंबई : राज्यात १ मेपासून जनगणना मोहिमेला सुरुवात झाली असून ही मोहीम दोन टप्प्यांत राबवली…

2 तास ago

निष्ठा, समर्पण आणि साधेपणाचा वारसा: यशवंत हाप्पे यांना काँग्रेसची भावपूर्ण श्रद्धांजली

मुंबई: काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी यशवंत हाप्पे यांच्या स्मरणार्थ दादर येथील टिळक भवनमध्ये शोकसभा आयोजित करण्यात…

3 तास ago

चिमुरडीवरील अत्याचार-हत्येने पुणे हादरले; कायदा-सुव्यवस्था कोलमडली, गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राज्यातील कायदा सुव्यवस्थेची लक्तरे आधीच वेशीवर टांगली गेलेली आहेत. राज्यात महिला व लहान मुलीही…

3 तास ago

बारावी निकाल 89.79% : यशस्वी विद्यार्थ्यांचे दादाजी भुसे यांच्याकडून अभिनंदन

आवडीनुसार पुढील वाटचालीचे आवाहन; मुलींची उत्तीर्णता मुलांपेक्षा 6.35% अधिक मुंबई: उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता 12…

3 तास ago