शिरूर तालुका

ऊसतोड मजुरांची जगण्यासाठी धडपड पुस्तकांऐवजी हातात उसाची मोळी

पाबळ (सुनिल जिते): आपण शिक्षणात आघाडी घेतली असली तरी ऊस तोडणी कामगारांची मुले शिक्षणापासून वंचित असलेली पाहायला मिळत आहेत. आपले इतभर पोट भरण्यासाठी या कामगारांना आपले गाव सोडून परगावी ऊस तोडणी करण्यासाठी यावे लागते. मात्र, या कामगारांबरोबर त्यांची चिमुरडी मुलेही वणवण भटकताना दिसत आहेत. तर काही मुले आपल्या आई-वडिलांना मदत करताना त्यांच्या हातातील उसाचे भेळे बांधताना तसेच आपल्या हातात पाठ्यपुस्तकाच्या ऐवजी कोयते घेताना दिसत आहेत. शिक्षणाचे धडे गिरवण्यापेक्षा हि मुले काम करण्यातच धन्यता मानत असल्याची सध्यस्थिती आहे.

ऊस तोडणीसाठी परगावाहून आलेल्या या मुलांना एक वेळचे जेवण मिळणे कठीण तर शिक्षण आणि बाकी सुख सुविधा मिळणे दुर्मिळच. शिरूर तालुक्यात उस तोडणीसाठी जालना, बीड, उस्मानाबाद आदी जिल्ह्यातून हे ऊस तोडणी कामगार दाखल झाले आहेत. दरवर्षी प्रमाणे यंदाही शिरूर परिसरात या कामगारांच्या झोपड्या थाटलेल्या आहेत. यंदा या भागात ऊस तोडणीसाठी अनेक कारखान्यांचे मजूर आले असून, या मजुरांसोबत त्यांचे कुटुंबही दाखल झाले आहे. त्यांच्या लेकरांना ऊन, वारा, विंचू, काट्याचे भय कधी वाटतच नाही. उसाच्या फडातच ती लहानाची मोठी होतात.

कडाक्याच्या थंडीतही भल्या पहाटे कोयता हातात घेऊन फडात साऱ्यांची लगीनघाई सुरू होते. आर्थिक परिस्थितीअभावी आगामी उचल घेऊन यांचा उदरनिर्वाह चालत असतो. वर्षातील काही दिवस गावी, तर काही दिवस कारखान्यावर जात असल्याने मुलांच्या शिक्षणाची मात्र यामध्ये अपरिमित हानी होते.

ऊसतोड मजूर मुलांच्या समस्यांमध्ये शिक्षणापासून वंचित राहणे, स्थलांतरामुळे नियमित शाळेत न जाता येणे, बिबट्याकडून जिवाला धोका आणि त्यांना आवश्यक सुविधा न मिळणे या नुकसानीचा समावेश होतो. या समस्यांवर मात करण्यासाठी राज्य सरकारने शासकीय वसतिगृह योजना सुरू केली आहे. ज्याद्वारे विद्यार्थ्यांना राहण्याची सोय, भोजनाची सोय, गणवेश आणि शैक्षणिक साहित्य दिले जाते. परंतु या योजनेबद्दल अनेक ऊसतोड मजुरांना माहिती नाही. ही योजना तळागळापर्यंत जाणे गरजेचे आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मध्य प्रदेशातील राज्यसभा उमेदवारी वादावर काँग्रेसचे दादरमध्ये आंदोलन

मुंबई: मध्य प्रदेशातील राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार मिनाक्षी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज कथितपणे बेकायदेशीर आणि…

3 तास ago

राष्ट्रवादी काँग्रेसचा संघर्षाचा प्रवास थांबणार नाही; कार्यकर्त्यांनी नव्या जोमाने कामाला लागावे; सुनेत्रा पवार

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २७ व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात आयोजित कार्यक्रमात पक्षाच्या राष्ट्रीय…

3 तास ago

उरीतील स्फोटात महाराष्ट्राच्या दोन सुपुत्रांना वीरमरण; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भावपूर्ण श्रद्धांजली

मुंबई: जम्मू-काश्मीरमधील उरी सेक्टरजवळील कमलकोट परिसरात झालेल्या भीषण स्फोटात महाराष्ट्राचे दोन जवान शहीद झाल्याने राज्यभर…

3 तास ago

शिरूरमध्ये नव्या पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली वाहनांवर कडक कारवाई

शिरूर (): शिरूर पोलीस स्टेशनचे नवे पोलीस निरीक्षक विनोद भगवान पाटील यांनी पदभार स्वीकारताच शहरात…

3 तास ago

केळी उत्पादक शेतकऱ्यांना तातडीची मदत द्या; जयंत पाटील यांची शासनाकडे मागणी

मुंबई: राज्यातील अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणावर केळी बागांचे नुकसान झाले असून…

14 तास ago

वालधुनी बुद्धभूमी वादावर अखेर तोडगा; ३० एकरांवर उभारणार ‘आंतरराष्ट्रीय महाबोधी संकुल’

मुंबई: कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील वालधुनी येथील बुद्धभूमीच्या जागेबाबत अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या वादावर अखेर तोडगा…

14 तास ago