शिरूर तालुका

पाबळला रस्त्यावरील खड्ड्यात वृक्षारोपण करत आंदोलन

शिक्रापूर: पाबळ (ता. शिरुर) येथे पाबळ खेड रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले असून सदर रस्त्याची दुरुस्ती करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम कोणतीही तसदी घेत नसल्याने अपघातांची संख्या वाढत असल्याने येथील नागरिकांनी रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करत आंदोलन केले आहे.

पाबळ (ता. शिरुर) येथे पाबळ खेड पाबळ रस्त्यावर खेड वरुन पाबळ येथे येत असताना पाबळगावात प्रवेश करतानाच रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून त्यामध्ये पावसामुळे पाण्याची डबकी तयार झाली आहे. तसेच सदर रस्त्यालगत मागील वर्षी बांधलेल्या ओढ्यावरील मोरीवर मोठे खड्डे पडले आहेत. पाबळ खेड रस्त्याने मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक वाहतूक होत असते शिरुर रांजणगाव MIDC भागातून मोठ्या प्रमाणावर माल वाहतूक व प्रवासी गाड्या खेड सेझ येथे जात असतात.

ओढ्यावरील मोरीच्या झालेल्या नित्कृष्ट बांधकामामुळे येथे मोठे खड्डे पडले असल्यामुळे नागरिकांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे. या सर्व बाबीची दखल घेत सरपंच मारुती शेळके, शिक्षण संस्थेचे अध्यक्ष भगवान घोडेकर, विकास घोडेकर, दादासाहेब घोडेकर, ज्ञानेश्वर झोडगे यांसह ग्रामस्थांनी या खड्ड्यामध्ये वृक्षारोपण करुन सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष वेधण्यासाठी अनोखे आंदोलन केले असून सदर रस्त्याची तातडीने दुरुस्त करावी, अशी मागणी देखील आंदोलकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे. तर येथील रस्त्याचा भाग खेड सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असल्याने या विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता त्यांनी येथील खड्डे बुजवण्याचे काम तातडीने हाती घेणार असल्याचे सांगितले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुरचे PI विनोद पाटील यांच्यासाह डीबी पथकाची धडाकेबाज कारवाई

तीन गावठी बनावटीची पिस्तुले आणि चार जिवंत काडतुसे जप्त  शिरुर (तेजस फडके) शिरुर पोलिस ठाण्याचा…

2 तास ago

पुण्यात पेढे खाल्ल्यानंतर अनेकांना विषबाधा; गुरुनानक डेरी सील, FDAची कारवाई

पुणे: पुण्यातील खराडी परिसरात नवीन कारच्या डिलिव्हरीचा आनंद साजरा करताना वाटण्यात आलेल्या पेढ्यांमुळे अनेक जण…

9 तास ago

ठाकरे गटाला मोठा धक्का? ६ खासदार शिंदे गटाच्या संपर्कात; सुषमा अंधारेंचा गंभीर आरोप

नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडींना वेग आला असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब…

9 तास ago

पावसाळ्यात ओलसर कपडे घालताना काळजी घ्या

सध्या पावसाळा सुरु आहे. पावसाळ्यात ऊन कमीच पडते. त्यामुळे वातावरण जरा ओलसरच असते. तसेच कपडे…

9 तास ago

तंत्रज्ञानाचा अतिवापर व्यसनापेक्षा कमी नाही, मानसिक आरोग्यावर होतोय परिणाम

बदलत्या जीवनशैलीनुसार संपूर्ण जग तंत्रज्ञानाच्या आविष्कारांनी वेढलेले आहे. त्यातच आजकालची तरुण मंडळी आपला बहुतेक वेळ…

9 तास ago

पालक भाजीचे गुणधर्म

सर्व पालेभाज्यांमध्ये पालक ही सर्वश्रेष्ठ भाजी आहे. पालक ही भाजी आहारात जेवढी महत्त्वाची आहे तेवढीच…

9 तास ago