शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुका खरेदी-विक्री संघाच्या सभापतीपदी महायुतीचे राजेंद्र नरवडे, तर उपसभापतीपदी बाळासाहेब नागवडे यांची बिनविरोध निवड झाली असल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी अरुण साकोरे यांनी केली. या निवडीनंतर परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे की, चेहरे तेच फक्त पक्ष बदल.
महायुतीचा वरचष्मा कायम
खरेदी-विक्री संघावर महायुतीचा प्रभाव राहिल्याने राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ला मोठा फायदा झाला आहे. या पार्श्वभूमीवर माजी आमदार अशोक पवार यांच्या चार समर्थकांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे अशोक पवार यांच्या गटाला मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे.
बिनविरोध निवडणुकीची प्रक्रिया
आज (२४ मार्च) सकाळी ११ ते ११:३० दरम्यान, सभापती व उपसभापती पदासाठी अर्ज दाखल करण्याची वेळ होती. राजेंद्र नरवडे आणि बाळासाहेब नागवडे यांच्याच उमेदवारी अर्जाची नामनिर्देशन पत्रे आल्याने ही निवडणूक बिनविरोध पार पडली.
अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली निर्णय
ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस युवक जिल्हाध्यक्ष अण्णा महाडिक यांनी बंद लिफाफ्यात दोन नावे आणली होती. त्यानुसार, सभापतीपदी राजेंद्र नरवडे, तर उपसभापतीपदी बाळासाहेब नागवडे यांची नावे निश्चित करण्यात आली.
महायुतीच्या नेत्यांचे परिश्रम
ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आमदार ज्ञानेश्वर (माऊली) कटके, माजी आमदार पोपटराव गावडे, माजी मंत्री दिलीपराव वळसे पाटील, राष्ट्रवादी युवकचे माजी जिल्हाध्यक्ष स्वप्नील गायकवाड, मानसिंग पाचुंदकर, तालुकाध्यक्ष रवींद्र काळे, जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष स्वप्नील ढमढेरे, बाजार समितीचे माजी संचालक आबाराजे मांढरे, भाजपा माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल पाचर्णे, बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश पवार, पंचायत समितीचे माजी सभापती विश्वास कोहोकडे, राजेंद्र कोरेकर, माजी सभापती शरद कालेवार, माजी सरपंच प्रकाश थोरात, श्रीनिवास घाडगे, आणि श्रुतिका झांबरे यांनी मेहनत घेतली.
अशोक पवार यांच्यावर टीका
ही निवडणूक बिनविरोध झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) च्या नेत्यांनी माजी आमदार अशोक पवार यांच्यावर टीका केली. तसेच, त्यांच्या चार समर्थकांनी पक्ष सोडल्याने त्यांची अधिक गोची झाली.
महायुतीचा पुढील निर्धार
या निकालानंतर महायुतीने बाजार समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्येही एकजूट दाखवून विजय मिळवण्याचा निर्धार व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), भाजपा आणि शिवसेना (शिंदे गट) यांनी एकत्र राहून पुढील निवडणुकीत विजय मिळवण्याचे लक्ष्य ठरवले आहे.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष रवी काळे यांनी माजी आमदार अशोक पवार यांना थेट सवाल केला – “निवडणुकीच्या दिवशी सभापती आणि उपसभापती कोण हे समजेल, अशी भीम गर्जना करणारे अशोक पवार आता शांत का?” तसेच, आगामी सर्व निवडणुकांमध्ये महायुतीचाच झेंडा फडकेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मुंबई: मंत्रालयातील पिण्याच्या पाण्याच्या टाकीमध्ये मांजर पडल्याच्या माहितीत तथ्थ नाही. पाण्याच्या टाक्यांवर लोखंडी झाकणे बसवलेली…
ठाणे: राज्याच्या राजकारणात एकनाथ शिंदे यांच्या भोवती वाढणारा जनाधार पुन्हा एकदा स्पष्ट झाला आहे. “अपॉइंटमेंटशिवाय…
मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या के-ईस्ट वॉर्डचे सहायक आयुक्त नितीन शुक्ला यांना एका महिलेला लग्नाचे आमिष दाखवून…
मुंबई: Dr. Shrikant Eknath Shinde यांनी अमेरिकेतील Harvard Kennedy School येथे आयोजित अभ्यासदौऱ्यात सहभागी होत…
अमरावती: राज्यातील प्रगत विकासाच्या दाव्यांना छेद देणारी धक्कादायक बाब समोर आली आहे. अमरावती जिल्ह्यातील मेळघाट…
फोन आजकाल लोकांच्या जीवनाचा महत्वाचा भाग झाला आहे. फोन नसेल तर अनेकांची कामे रखडतात. सकाळी…