शिरूर तालुका

टाकळी भीमात पिंजऱ्यात अडकलेल्या उद मांजरांची सुटका

निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची विशेष कामगिरी

शिक्रापूर (शेरखान शेख): टाकळी भीमा (ता. शिरुर) येथील गायकवाड वस्ती येथे पिंजऱ्यात अडकलेल्या दोन उद मांजरांची सुटका करुन त्यांना निसर्गाच्या सानिध्यात मुक्तकरुन जीवदान देण्यात करण्यात निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना यश आले आहे.

टाकळी भीमा (ता. शिरुर) येथील गायकवाड वस्ती येथे अतिष गायकवाड यांच्या घराबाहेर असलेल्या माशांच्या पिंजऱ्यामध्ये दोन भलेमोठे उद मांजर अडकल्याचे दिसून आले, याबाबतची माहिती निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेचे अध्यक्ष शेरखान शेख यांना मिळताच प्राणीमित्र शेरखान शेख व अमोल कुसाळकर यांनी सदर ठिकाणी धाव घेत पाहणी केली असता 2 उदमांजर पिंजऱ्यात अडकल्याचे दिसून आले.

दरम्यान प्राणीमित्रांनी दोन्ही उदमांजरांना पिंजऱ्यातून शिताफीने बाहेर काढून शिरुर वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर, वनपाल गौरी हिंगणे, वनरक्षक प्रमोद पाटील, अभिजित सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली सदर उदमांजरांना निसर्गाच्या सानिध्यात मुक्त केले, यावेळी आकाश भोरडे, अतिष गायकवाड, रवी वाव्हळ यांसह आदी उपस्थित होते, तर कोठेही जखमी पशु पक्षी आढळून आल्यास नागरिकांनी वनविभाग तसेच प्राणीमित्रांना संपर्क करण्याचे आवाहन निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेचे अध्यक्ष शेरखान शेख यांनी केले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

गरब्यात मुस्लिमांच्या प्रवेशावरून वाद; अमृता फडणवीसांच्या भूमिकेचे संजय राऊतांकडून समर्थन

तापलेले असतानाच आता नवरात्रोत्सवातील गरबा-दांडियावरूनही वाद निर्माण झाला आहे. मंत्री नितेश राणे यांनी गरब्यात ‘लव्ह…

48 मिनिटे ago

वाघाळे येथील मारुती थोरात (गुरुजी) यांचे अपघाती निधन…

शिरूर : वाघाळे (ता. शिरूर) येथील आदर्श शिक्षक मारुती वामन थोरात यांचे अपघाती सोमवारी (ता.…

1 तास ago

दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवारांची साथ का सोडली? खळबळजनक गौप्यस्फोट…

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर शरद पवार यांचे अत्यंत निष्ठावंत मानले जाणारे माजी गृहमंत्री…

3 तास ago

शिरूर तालुका शेतकरी शिष्टमंडळाचे साखर आयुक्तांना निवेदन…

शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…

19 तास ago

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश; चंद्रकांत पाटील यांनी रंगवला पेपर माशे बाप्पा

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…

23 तास ago

कच्चा कांदा खाल्ल्याचे काय आहेत फायदे

जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…

23 तास ago