शिक्रापूर (शेरखान शेख): दहिवडी (ता. शिरुर) येथे यापूर्वी बांधलेले बंधारे व मागील वर्षी केलेले खोलीकरण त्यामुळे सध्या चासकमान धरणाच्या डाव्या कालव्याचे आवर्तन वेळेत आल्याने दहिवडीतील बंधारे फुल झाल्याने शेतकरी समाधानी झालेले असून आता दहिवडी गावची ओळख पाणीदार गाव म्हणून नावारुपाला येत असल्याचे उपसरपंच सचिन गारगोटे यांनी दिली.
दहिवडी (ता. शिरुर) हा कायम दुष्काळी गाव म्हणून ओळख असलेले गाव कित्येक वेळा उन्हाळ्याच्या दिवसामध्ये शेतकऱ्यांना पाण्यामुळे पिके सोडून देण्याची वेळ आलेली आहे. मात्र यापूर्वी सदर ठिकाणी बंधारे बांधून ठेवलेले होते. त्यामध्ये पाणी साठा कमी राहत असताना मागील वर्षी नुकतेच सर्व बंधारे व ओढ्यांचे खोलीकरण करुन घेण्यात आले असताना सध्या चासकमान कालव्याचे पाणी बंधाऱ्यात आल्याने बंधारे फुल भरलेले असल्यामुळे गावचा पाणी प्रश्न किमान दोन महिने तरी सुटला असताना सध्या परिसरातील गहू, कांदा, हरभरा, कोबी व उसाच्या उत्पादनात चांगलीच वाढ होऊ लागली आहे. तसेच ओढ्याचे खोलीकरण झाल्याने या भागातील विहिरींसह विंधन विहिरींची सुद्धा पाणी पातळी वाढली आहे, सध्या ओढे व बंधारे फुल भरल्याने ग्रामस्थांच्या वतीने पाण्याचे पूजन करण्यात आले.
याप्रसंगी उपसरपंच सचिन गारगोटे, माजी सरपंच आनंदराव गारगोटे, सरपंच संतोष दौंडकर, माजी उपसरपंच राजेंद्र ढमढेरे, राजेंद्र जाधव, किसनराव दौंडकर, माजी चेअरमन मच्छिंद्र गारगोटे, केशव गारगोटे, अविनाश मांजरे, धनंजय गायकवाड, सागर गारगोटे, अविनाश गारगोटे, विकास गारगोटे, राहुल लवांडे, गौरव गारगोटे, अविनाश गायकवाड, अक्षय गारगोटे, रमेश गारगोटे, गणपत गारगोटे, देविदास गारगोटे, कैलास गायकवाड, राहुल गारगोटे, बबन गारगोटे, ऋषिकेश गारगोटे आदी मान्यवर उपस्थित होते. पाणी प्रश्न मिटत असल्याने दहिवडी गावची आता पाणीदार गाव म्हणून ओळख निर्माण होत असल्याने शेतकरी व ग्रामस्थ समाधान व्यक्त करत आहे.
कोल्हापुरात पार्थिवाचे घेतले अंतिम दर्शन; शिक्षण, समाजसेवा आणि वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाला भावपूर्ण श्रद्धांजली कोल्हापूर :…
६० दिवसांत अहवाल सादर होणार; ९ ऑगस्टचे जनआंदोलन नियोजितप्रमाणेच होणार मुंबई: पुणे–नाशिक सरळ रेल्वे प्रकल्पाच्या…
निवडणूक प्रक्रिया रद्द करून निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी; चौकशी पुर्ण होईपर्यंत निकाल व पुढील प्रक्रिया…
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यार्थी प्रदेशाध्यक्षपदी ॲड. चिन्मय गाढे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाच्या राष्ट्रीय…
'फर्स्ट कम, फर्स्ट सर्व्ह' तत्त्वावर रिक्त घरांची विक्री; शिरूर, खराबवाडी, दापोडी, म्हाळुंगे-इंगळे आणि सांगलीतील प्रकल्पांना…
कोरेगाव भीमा येथे पूर्वीही एसीबीची कारवाई; आता पुण्यात १० लाखांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी गुन्हा, देखरेखीवर…