शिरूर तालुका

दहिवडी गावची पाणीदार गाव म्हणून ओळख नावारुपाला

शिक्रापूर (शेरखान शेख): दहिवडी (ता. शिरुर) येथे यापूर्वी बांधलेले बंधारे व मागील वर्षी केलेले खोलीकरण त्यामुळे सध्या चासकमान धरणाच्या डाव्या कालव्याचे आवर्तन वेळेत आल्याने दहिवडीतील बंधारे फुल झाल्याने शेतकरी समाधानी झालेले असून आता दहिवडी गावची ओळख पाणीदार गाव म्हणून नावारुपाला येत असल्याचे उपसरपंच सचिन गारगोटे यांनी दिली.

दहिवडी (ता. शिरुर) हा कायम दुष्काळी गाव म्हणून ओळख असलेले गाव कित्येक वेळा उन्हाळ्याच्या दिवसामध्ये शेतकऱ्यांना पाण्यामुळे पिके सोडून देण्याची वेळ आलेली आहे. मात्र यापूर्वी सदर ठिकाणी बंधारे बांधून ठेवलेले होते. त्यामध्ये पाणी साठा कमी राहत असताना मागील वर्षी नुकतेच सर्व बंधारे व ओढ्यांचे खोलीकरण करुन घेण्यात आले असताना सध्या चासकमान कालव्याचे पाणी बंधाऱ्यात आल्याने बंधारे फुल भरलेले असल्यामुळे गावचा पाणी प्रश्न किमान दोन महिने तरी सुटला असताना सध्या परिसरातील गहू, कांदा, हरभरा, कोबी व उसाच्या उत्पादनात चांगलीच वाढ होऊ लागली आहे. तसेच ओढ्याचे खोलीकरण झाल्याने या भागातील विहिरींसह विंधन विहिरींची सुद्धा पाणी पातळी वाढली आहे, सध्या ओढे व बंधारे फुल भरल्याने ग्रामस्थांच्या वतीने पाण्याचे पूजन करण्यात आले.

याप्रसंगी उपसरपंच सचिन गारगोटे, माजी सरपंच आनंदराव गारगोटे, सरपंच संतोष दौंडकर, माजी उपसरपंच राजेंद्र ढमढेरे, राजेंद्र जाधव, किसनराव दौंडकर, माजी चेअरमन मच्छिंद्र गारगोटे, केशव गारगोटे, अविनाश मांजरे, धनंजय गायकवाड, सागर गारगोटे, अविनाश गारगोटे, विकास गारगोटे, राहुल लवांडे, गौरव गारगोटे, अविनाश गायकवाड, अक्षय गारगोटे, रमेश गारगोटे, गणपत गारगोटे, देविदास गारगोटे, कैलास गायकवाड, राहुल गारगोटे, बबन गारगोटे, ऋषिकेश गारगोटे आदी मान्यवर उपस्थित होते. पाणी प्रश्न मिटत असल्याने दहिवडी गावची आता पाणीदार गाव म्हणून ओळख निर्माण होत असल्याने शेतकरी व ग्रामस्थ समाधान व्यक्त करत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

खरीप आढावा बैठकीत ‘इंटिग्रेटेड गाव विकास मॉडेल’ची मांडणी

ठाणे: उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांनी खरीप हंगाम आढावा बैठकीत केवळ कृषीपुरते मर्यादित न राहता “इंटिग्रेटेड…

34 मिनिटे ago

59 ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ‘ग्रामीण ते अवकाश’ व्हिजन

ठाणे: जवळपास 9500 विद्यार्थ्यांमधून निवड झालेल्या 59 ग्रामीण विद्यार्थ्यांना थेट इस्रोसारख्या जागतिक दर्जाच्या संस्थेला भेट…

37 मिनिटे ago

मुंबईत ‘खड्डेमुक्ती’वर ९० कोटींचा प्रश्नचिन्ह; अनियमिततेच्या आरोपांवरून प्रशासनाला निवेदन

मुंबई: मुंबई महानगरपालिका चे अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांना ‘खड्डेमुक्ती’ अभियानातील कथित अनियमितता व संभाव्य…

4 तास ago

पुण्यातील ILS विधी महाविद्यालय शुल्क वसुली प्रकरणी चौकशी; विद्यार्थ्यांना 6% व्याजासह परतावा

मुंबई: विद्यार्थी हिताला सर्वोच्च प्राधान्य देत पुणे येथील आय.एल.एस. विधी महाविद्यालयातील बेकायदेशीर शुल्क वसुली प्रकरणी…

4 तास ago

शेतीच्या वादातून चांडोह येथे हाणामारी; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील चांडोह येथील सालकरमळा परिसरात शेतीच्या नांगरणीवरून दोन गटांमध्ये वाद होऊन…

5 तास ago

पत्नीवर लोखंडी फायटरने हल्ला; पतीविरुद्ध शिरूर पोलिसांत गुन्हा दाखल

शिरूर (अरुणकुमार मोटे): पोटगीच्या वादातून संतापाच्या भरात पतीने पत्नीवर लोखंडी फायटरने हल्ला केल्याची धक्कादायक घटना…

5 तास ago