शिरूर तालुका

दहिवडी गावची पाणीदार गाव म्हणून ओळख नावारुपाला

शिक्रापूर (शेरखान शेख): दहिवडी (ता. शिरुर) येथे यापूर्वी बांधलेले बंधारे व मागील वर्षी केलेले खोलीकरण त्यामुळे सध्या चासकमान धरणाच्या डाव्या कालव्याचे आवर्तन वेळेत आल्याने दहिवडीतील बंधारे फुल झाल्याने शेतकरी समाधानी झालेले असून आता दहिवडी गावची ओळख पाणीदार गाव म्हणून नावारुपाला येत असल्याचे उपसरपंच सचिन गारगोटे यांनी दिली.

दहिवडी (ता. शिरुर) हा कायम दुष्काळी गाव म्हणून ओळख असलेले गाव कित्येक वेळा उन्हाळ्याच्या दिवसामध्ये शेतकऱ्यांना पाण्यामुळे पिके सोडून देण्याची वेळ आलेली आहे. मात्र यापूर्वी सदर ठिकाणी बंधारे बांधून ठेवलेले होते. त्यामध्ये पाणी साठा कमी राहत असताना मागील वर्षी नुकतेच सर्व बंधारे व ओढ्यांचे खोलीकरण करुन घेण्यात आले असताना सध्या चासकमान कालव्याचे पाणी बंधाऱ्यात आल्याने बंधारे फुल भरलेले असल्यामुळे गावचा पाणी प्रश्न किमान दोन महिने तरी सुटला असताना सध्या परिसरातील गहू, कांदा, हरभरा, कोबी व उसाच्या उत्पादनात चांगलीच वाढ होऊ लागली आहे. तसेच ओढ्याचे खोलीकरण झाल्याने या भागातील विहिरींसह विंधन विहिरींची सुद्धा पाणी पातळी वाढली आहे, सध्या ओढे व बंधारे फुल भरल्याने ग्रामस्थांच्या वतीने पाण्याचे पूजन करण्यात आले.

याप्रसंगी उपसरपंच सचिन गारगोटे, माजी सरपंच आनंदराव गारगोटे, सरपंच संतोष दौंडकर, माजी उपसरपंच राजेंद्र ढमढेरे, राजेंद्र जाधव, किसनराव दौंडकर, माजी चेअरमन मच्छिंद्र गारगोटे, केशव गारगोटे, अविनाश मांजरे, धनंजय गायकवाड, सागर गारगोटे, अविनाश गारगोटे, विकास गारगोटे, राहुल लवांडे, गौरव गारगोटे, अविनाश गायकवाड, अक्षय गारगोटे, रमेश गारगोटे, गणपत गारगोटे, देविदास गारगोटे, कैलास गायकवाड, राहुल गारगोटे, बबन गारगोटे, ऋषिकेश गारगोटे आदी मान्यवर उपस्थित होते. पाणी प्रश्न मिटत असल्याने दहिवडी गावची आता पाणीदार गाव म्हणून ओळख निर्माण होत असल्याने शेतकरी व ग्रामस्थ समाधान व्यक्त करत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुरचे PI विनोद पाटील यांच्यासाह डीबी पथकाची धडाकेबाज कारवाई

तीन गावठी बनावटीची पिस्तुले आणि चार जिवंत काडतुसे जप्त  शिरुर (तेजस फडके) शिरुर पोलिस ठाण्याचा…

49 मिनिटे ago

पुण्यात पेढे खाल्ल्यानंतर अनेकांना विषबाधा; गुरुनानक डेरी सील, FDAची कारवाई

पुणे: पुण्यातील खराडी परिसरात नवीन कारच्या डिलिव्हरीचा आनंद साजरा करताना वाटण्यात आलेल्या पेढ्यांमुळे अनेक जण…

8 तास ago

ठाकरे गटाला मोठा धक्का? ६ खासदार शिंदे गटाच्या संपर्कात; सुषमा अंधारेंचा गंभीर आरोप

नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडींना वेग आला असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब…

8 तास ago

पावसाळ्यात ओलसर कपडे घालताना काळजी घ्या

सध्या पावसाळा सुरु आहे. पावसाळ्यात ऊन कमीच पडते. त्यामुळे वातावरण जरा ओलसरच असते. तसेच कपडे…

8 तास ago

तंत्रज्ञानाचा अतिवापर व्यसनापेक्षा कमी नाही, मानसिक आरोग्यावर होतोय परिणाम

बदलत्या जीवनशैलीनुसार संपूर्ण जग तंत्रज्ञानाच्या आविष्कारांनी वेढलेले आहे. त्यातच आजकालची तरुण मंडळी आपला बहुतेक वेळ…

8 तास ago

पालक भाजीचे गुणधर्म

सर्व पालेभाज्यांमध्ये पालक ही सर्वश्रेष्ठ भाजी आहे. पालक ही भाजी आहारात जेवढी महत्त्वाची आहे तेवढीच…

8 तास ago