पाबळ (सुनिल जिते): महाराष्ट्र शासनाच्या १५० दिवस कृती आराखड्यानुसार व महसूल विभागाच्या आदेशानुसार “महसूल सप्ताह २०२५” अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन दि. २५/०८/२०२५ रोजी मंडल मलठण, (ता. शिरूर), येथे तहसिलदार बाळासाहेब म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आले. या शिबिरात “जिवंत सातबारा” मोहिमेंतर्गत खातेदारांच्या वारस नोंदी करून दुरुस्ती सातबारा व फेरफार तयार करण्यात आले. तसेच विविध प्रकारचे दाखले जसे की उत्पन्न, जात, रहिवासी, अल्पभूधारक, बिनविरोध, इत्यादी मान्यवरांच्या हस्ते खातेदारांना प्रत्यक्ष प्रदान करण्यात आले.
सामाजिक आर्थिक सहाय्य योजनेंतर्गत लाभार्थ्यांचे अर्ज याच ठिकाणी स्वीकृत करण्यात आले, ज्यामुळे योजनांचा लाभ प्रत्यक्ष शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यास मदत झाली. या शिबिरात महसूल विभागाबरोबरच कृषी विभाग, पंचायत समिती, भूमी अभिलेख विभाग, आरोग्य विभाग, सेतू नागरी सुविधा केंद्र, सामाजिक वनिकरण विभाग, पशुवैद्यकीय विभाग, पाटबंधारे विभाग, महिला व बालकल्याण विभाग, वन विभाग व महावितरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी सक्रिय सहभाग घेतला.या शिबिराचा मुख्य उद्देश म्हणजे महसूल प्रकरणांमध्ये प्रलंबित फेरफार जलदगतीने निकाली काढणे, खातेदारांना त्वरित सेवा उपलब्ध करून देणे आणि शासनाच्या विविध योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचवणे हा होता. या शिबिराच्या माध्यमातून शासनाचा “नागरिक हित प्रथम” हाच दृष्टिकोन अधोरेखित झाला. महसूल सप्ताहाच्या निमित्ताने राबवलेला हा उपक्रम ग्रामपातळीवर पारदर्शक प्रशासन व प्रभावी सेवा वितरणाचा आदर्श ठरला आहे.
या उपक्रमास ग्रामस्थ, शेतकरी आणि लाभार्थी नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. एकाच ठिकाणी विविध विभागांच्या सेवा मिळाल्यामुळे नागरिकांना वेळ व खर्च वाचल्याने नागरीकांनी समाधान व्यक्त करण्यात आले.
मनीषा भालेराव – ग्रामविकास अधिकारी मलठण
मुंबई : मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती, शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी आणि नाशिक कुंभमेळ्यानिमित्त तपोवन विकासासाठी आर्थिक…
नागपूर: महायुती सरकारने जाहीर केलेली शेतकरी कर्जमाफी ही सरसकट नसून अनेक जाचक अटी-शर्तींनी युक्त असल्याने…
मुंबई: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या २०२६ ते २०३१ या पंचवार्षिक कार्यकाळासाठी झालेल्या निवडणुकीत निर्माता…
मुंबई: "नेत्रदान हे मानवतेचे श्रेष्ठदान असून एका व्यक्तीच्या नेत्रदानामुळे दृष्टीहीनांच्या आयुष्यात नवी पहाट निर्माण होऊ…
षण्मुखानंद सभागृहात दुपारी २ वाजता होणार कार्यक्रम; संघटन विस्ताराला प्राधान्य मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १०…
मुंबई : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अर्थशास्त्र विभाग आणि ऑल इंडिया प्रोफेशनल काँग्रेस यांच्या संयुक्त…