पाबळ (सुनिल जिते): महाराष्ट्र शासनाच्या १५० दिवस कृती आराखड्यानुसार व महसूल विभागाच्या आदेशानुसार “महसूल सप्ताह २०२५” अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन दि. २५/०८/२०२५ रोजी मंडल मलठण, (ता. शिरूर), येथे तहसिलदार बाळासाहेब म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आले. या शिबिरात “जिवंत सातबारा” मोहिमेंतर्गत खातेदारांच्या वारस नोंदी करून दुरुस्ती सातबारा व फेरफार तयार करण्यात आले. तसेच विविध प्रकारचे दाखले जसे की उत्पन्न, जात, रहिवासी, अल्पभूधारक, बिनविरोध, इत्यादी मान्यवरांच्या हस्ते खातेदारांना प्रत्यक्ष प्रदान करण्यात आले.
सामाजिक आर्थिक सहाय्य योजनेंतर्गत लाभार्थ्यांचे अर्ज याच ठिकाणी स्वीकृत करण्यात आले, ज्यामुळे योजनांचा लाभ प्रत्यक्ष शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यास मदत झाली. या शिबिरात महसूल विभागाबरोबरच कृषी विभाग, पंचायत समिती, भूमी अभिलेख विभाग, आरोग्य विभाग, सेतू नागरी सुविधा केंद्र, सामाजिक वनिकरण विभाग, पशुवैद्यकीय विभाग, पाटबंधारे विभाग, महिला व बालकल्याण विभाग, वन विभाग व महावितरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी सक्रिय सहभाग घेतला.या शिबिराचा मुख्य उद्देश म्हणजे महसूल प्रकरणांमध्ये प्रलंबित फेरफार जलदगतीने निकाली काढणे, खातेदारांना त्वरित सेवा उपलब्ध करून देणे आणि शासनाच्या विविध योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचवणे हा होता. या शिबिराच्या माध्यमातून शासनाचा “नागरिक हित प्रथम” हाच दृष्टिकोन अधोरेखित झाला. महसूल सप्ताहाच्या निमित्ताने राबवलेला हा उपक्रम ग्रामपातळीवर पारदर्शक प्रशासन व प्रभावी सेवा वितरणाचा आदर्श ठरला आहे.
या उपक्रमास ग्रामस्थ, शेतकरी आणि लाभार्थी नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. एकाच ठिकाणी विविध विभागांच्या सेवा मिळाल्यामुळे नागरिकांना वेळ व खर्च वाचल्याने नागरीकांनी समाधान व्यक्त करण्यात आले.
मनीषा भालेराव – ग्रामविकास अधिकारी मलठण
मुंबई: शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्या वक्तव्यावरून राज्यातील राजकारण तापले असून, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतील दादर येथील ऐतिहासिक ‘राजगृह’ परिसरातील परिस्थितीवरून काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते…
मुंबई: महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळ मर्यादिततर्फे महाराष्ट्र शासनाच्या ‘रॅम्प’ (रायझिंग अँड ॲक्सेलेरेटिंग एमएसएमई परफॉर्मन्स) उपक्रमांतर्गत…
शिरूर : अवैध धंदे बंद करण्यासाठी व इतर मागण्यांसाठी शिरूरमध्ये निलेश वाळुंज यांचे सत्याग्रह आंदोलन…
मुंबई: वरळी परिसरात भाजप महायुतीच्या मोर्चामुळे निर्माण झालेल्या प्रचंड वाहतूक कोंडीदरम्यान राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश…
मुंबई: कुटुंबातील वडिलांचे निधन झाल्यानंतर मालमत्तेच्या वाटणीचा प्रश्न अनेकदा गुंतागुंतीचा ठरतो. विशेषतः आई आणि मुलांमध्ये…