Shirur Police Station
शिरूर : सादलगाव (ता. शिरूर) येथील ज्येष्ठ पत्रकार संपत कारकुड यांना गावातील एकाकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची गंभीर घटना घडली आहे. श्री. कारकूड यांनी शिरूर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. रेवणनाथ प्रशांत माने उर्फ भैया (वय २०) असे आरोपीचे नाव आहे.
पत्रकार संपत कारकुड हे आपल्या शेताकडे जात असताना आरोपी माने याने रस्त्यात त्यांची गाडी अडवली. “तुझा बांध कुठे फोडला आहे रे, तू माझ्या चांगल्या डोक्यात बसलेला आहेस. तुझा एकदा कार्यक्रम करतोच,” अशी धमकी देत आरोपीने स्वतःच्या फोर व्हीलरच्या डिक्कीत लपवलेले हत्यार काढून मारण्यासाठी उगारले. मात्र, कारकुड यांच्या गाडीवर पाठीमागे बसलेल्या व्यक्तीने प्रसंगावधान राखत ते हत्यार वरचीवर धरल्याने पत्रकारांचा जीव वाचला.
पत्रकार कारकुड यांच्या शेतजमिनीचा बांध फोडण्यात आल्याचा प्रकार घडला होता. तो प्रकार पंचांना दाखवण्यासाठी ते शेताकडे जात असताना रस्त्यात दबा धरून बसलेल्या आरोपी माने याने अचानक हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यातून पत्रकार थोडक्यात बचावले आहेत. या प्रकरणी पत्रकार संपत कारकुड यांनी शिरूर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, आरोपीविरुद्ध गुन्हा रजिस्टर क्रमांक ३५२, ३५१(२) आणि ३५१(३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास शिरूर पोलीस करत आहेत.
दरम्यान, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पत्रकारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
पत्रकारांवर हल्ला करणाऱ्यांवर पत्रकार संरक्षण कायद्याप्रमाणे कारवाई करा
त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर झालेल्या हल्ल्याचा मीडिया असोसिएशन ऑफ इंडियाकडून तीव्र निषेध
पत्रकारांच्या एस.टी. प्रवास सवलतीत सुधारणा होणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
महाराष्ट्रातील ज्येष्ठ पत्रकारांना २०हजार सन्मान निधी मिळणार…
महारेलला जनजागृती, चर्चासत्रे आणि तीन आठवड्यांत पर्यायी मार्गाचा अभ्यास करण्याचे निर्देश ठाणे : ठाणे अंतर्गत…
सहा वर्षे आश्वासनांची मालिका, 'स्टॉप पेमेंट' धनादेशांचा धक्का; तिघांविरुद्ध फसवणूक, बनावट कागदपत्रे व संगनमताचे गंभीर…
'देवाभाऊ' पुस्तक प्रकाशन सोहळ्यात बाळासाहेब फडणवीस यांचे वक्तव्य; चंद्रकांत पाटील यांच्याकडूनही मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाचे कौतुक पुणे…
मुंबई: अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) जून-जुलै 2026 या कालावधीत राज्यभर बनावट औषधे, विनापरवाना उत्पादन-विक्री,…
नागपूर: भंडारा येथून सुरू झालेल्या विदर्भातील ११ जिल्ह्यांच्या 'मंडल यात्रा'च्या पार्श्वभूमीवर काँग्रेस विधिमंडळ नेते विजय…
ई-२० धोरण घाईत राबवले; वाहनधारकांचे नुकसान झाल्याचा काँग्रेसचा आरोप, फडणवीसांच्या दिल्लीवारीवरही निशाणा मुंबई: पेट्रोलमध्ये इथेनॉल…