कुरळीच्या ग्रामसेविका ‘नॉट रिचेबल’

मांडवगण फराटा: कुरुळी (ता. शिरूर) येथील ग्रामसेविका कामावर सतत गैरहजर असल्यामुळे गावातील नागरिकांना गैरसोईला सामोरे जावे लागत आहे. आपला पदभार स्वीकारल्यापासून त्यांनी कामावर दांड्या मारण्यास सुरवात केलेली असून, त्या आपल्या कामावर नियमित येत नसल्याच्या तक्रारी गट विकास अधिकारी यांच्याकडे गावकऱयांनी केल्या आहेत.

नुकतेच सुरु झालेले आर्थिक वर्ष आणि त्याबरोबर होणारी गावातील सर्व विकास कामे ठप्प झाली आहेत. ग्रामसेविका कधी येणार? असे प्रश्न नागरिक विचारात आहेत. गट विकास अधिकारी शिरूर यांनी एका आदेशाद्वारे येथील ग्रामसेविका ए. आर. कदम यांना कुरुळी ग्रामपंचयतीचा अतिरिक्त पदभार दिलेला आहे. या आदेशाचे पालन होत नसून, या ग्रामसेविका आदेश झुगारत असल्याच्या समोर येत आहे. ग्रामसेकाविना गाव आणि कसे चालवावे काम? हा गंभीर प्रश्न गेली सहा महिन्यांपासून सरपंचासह सर्व सदस्यांना पडला आहे.

गट विकास अधिकार्यांची दिलेली जबाबदारी ग्रामसेविका घेत नसून हे गाव त्यांच्यांकडून वाऱ्यावर सोडले कि काय? अशी चर्चा गावभर होत आहे. गावातील प्रत्येक कामामध्ये हि उणीव जाणवत असून गाव कसे चालवावे, कामे कशी करावी, नागरिकांची गैरसोय कशी टाळावी, मिटिंग कश्या घायच्या? असे एक नव्हे अनेक प्रश्न येथील प्रस्थापित बॉडीला येत आहेत. प्रत्येक ग्रामसेवकाने आपल्या कामाच्या ठिकाणी राहावे, असा नियम आहे. यासाठी ग्रामसेवकाला शासनाकडून घरभाडे भत्ता दिला जातो. परंतु, तालुक्यातील बहुतांश ग्रामसेवक हे कामाच्या ठिकाणी राहत नसून त्यांना पगारात घरभाडे भत्ता दिला जातो, हि बाब यानिमित्त समोर येत आहे. याची गटविकास अधिकार चोकशी करणार का? कामावर सतत गैरहजर राहिल्यामुळे त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई होणार का? कामाच्या ठिकाणी त्यांना समज देऊन त्यांच्या लेखी खुलासा घेणार का? हे आता पाहावे लागणार आहे.

माझ्याकडे नागरगाव या गावचा मूळ चार्ज असून कुरुळी या गावचा अतिरिक्त चार्ज माझ्याकडे आहे. दोन गावचा कारभार सांभाळताना अनेक अडचणी येत आहेत. गटविकास अधिकारी शिरूर यांच्याकडे अतिरिक्त चार्ज कमी करण्याबाबत पत्रव्यवहार केलेला आहे. असे कुरुळीच्या ग्रामसेविका ए. आर. कदम यांनी सांगितले.

सध्या गावात ग्रामसेविका दररोज येत नसल्याने विकास कामे करताना अडथळा येत आहे. ग्रामसेविका गैरहजर राहत असल्याने ग्रामपंचायतीची कर वसुली होत नाही. त्यामुळे या ग्रामसेवकावर कारवाई करण्याची मागणी आम्ही केली आहे, असे कुरुळीचे उपसरपंच श्याम हरिहर यांनी सांगितले.
(क्रमश:)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांची जाहीर माफी मागावी; पत्रकार संघाची मागणी

मुंबई: नुकतेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलेले खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांबाबत…

3 तास ago

संविधान रक्षणासाठी संघर्षाची तयारी ठेवा; अनुसूचित जातींची भूमिका महत्त्वाची; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: देशात लोकशाही आणि संविधान धोक्यात असून संविधान व लोकशाहीच्या रक्षणासाठी सर्वांनी एकजुटीने संघर्ष करण्याची…

3 तास ago

संजय राऊतांविरोधात राष्ट्रीय महिला आयोगाकडे तक्रार; खासदार ज्योती वाघमारे

नवी दिल्ली: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत यांच्याकडून सातत्याने होत असलेल्या कथित…

3 तास ago

पत्रकारांशी झालेल्या वादाबाबत खासदार संजय पाटील यांची जाहीर माफी

मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय पाटील यांनी पत्रकारांशी झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर जाहीर दिलगिरी व्यक्त करत…

3 तास ago

शिंदोडी गावात रात्रीच्या वेळेस दिसली ‘ड्रोन’ सदृश्य वस्तू; संशयास्पद वस्तूमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

शिरुर (तेजस फडके) शिंदोडी गावात गेल्या काही दिवसांपासून रात्रीच्या वेळेस आकाशात ड्रोनसदृश्य वस्तू फिरत असल्याचे…

8 तास ago

जागतिक नेतृत्वाच्या शर्यतीत मोदी अव्वल; नव्या भारताच्या सामर्थ्याला जगाची मान्यता; एकनाथ शिंदे

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने जागतिक राजकारण, अर्थव्यवस्था आणि सामरिक क्षेत्रात प्रभावी झेप…

17 तास ago