nitin-thorat
शिरूरः आमदाबाद येथील शेतकरी नितीन आर्जुन थोरात यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात येणारा वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार 2021 करिता जाहीर झाला आहे. पुणे विभागातील पुणे जिल्ह्यातून एका शेतकऱ्यास दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो.
नितीन आर्जुन थोरात यांनी त्यांच्या शेतामध्ये सघन केशरआंबा, भाजीपाला फळ पिके यामध्ये मेथी कोथिंबीर त्याचबरोबर वांगी टोमॅटो कांदा बटाटा हळद या पिकांची लागवड करून चांगले उत्पन्न मिळविले आहे. शेतीच्या मशागती करिता ट्रॅक्टर यंत्राचा वापर आणि आंतरमशागती करिता पावर विडर चा वापर केल्याने त्यांच्या वेळेत आणि खर्चात बचत झाल्याने उत्पन्नात वाढ झाल्याचे त्यांनी सांगितले. या अनुषंगाने त्यांनी शेतामध्ये बांधावर चिंचेच्या झाडांची लागवड करून चिंचेपासूनही वार्षिक उत्पन्न सुरू असल्याचे सांगितले. त्याचबरोबर बायोगॅस (गोबर गॅस) निर्मीती, शासकिय योजनेच्या अनुदानातून शेडनेटहाऊस आणि शेततळे उभारुन पाणी टंचाईवर मात करण्यासाठी पिकांना व फळबागेला ठिबकसंचाद्वारे पाणी दिले.
पशुपालन यामध्ये देशी गोवंशाची लालाकंधारी व गावरान जातीच्या गाय व म्हैस पालनामुळे दुध आणि शेणापासून गोबरगॕस निर्मीती व शेतीसाठी शेणखत उपलब्ध झाले आहे. याच बरोबर गांडूळखत निर्मीतीही केली. शेताच्या बांधावर चिंच लागवडी बरोबर उपयोगी असलेल्या व दुर्मीळ होत असलेल्या वड, पिंपळ, पायर (पिंप्री), बेल, खैर, मोह, बांबू, ऊंबर, कुचला, बहावा, आवळा, फणस, पळस, शमी, हिरडा, बेहडा, लक्ष्मीतरु, शेवगा, गुळवेल, अर्जुन, रिठा इत्यादी वृक्षांची लागवड केली आहे. त्याच बरोबर परिसरातील शेतकऱ्यांना सोबत घेऊन नवनविन शेतीचे प्रयोग, कृषीविज्ञान केंद्राना भेटी देऊन मार्गदर्शन घेतात. त्यांना मिळालेल्या या पुरस्काराचे परिसरात कौतुक होत असून, अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
नितीन थोरात यांना कृषिनिष्ठ शेतकरी पुरस्कार प्रदान
आमदाबादच्या उपसरपंचपदी प्रदिप साळवे बिनविरोध
शिरुर येथील डॉक्टरांचे अथक प्रयत्न आणि अत्याधुनिक उपचारामुळे असाध्य आजारावर रुग्णाने केली मात
Video; घोडगंगा कारखान्याच्या थकीत पगारासाठी कामगारांचे ‘शोले’ स्टाईल आंदोलन
कर्जमाफी, ओबीसी आरक्षण आणि गोसीखुर्द कालवा दुर्घटनेवर सरकारला धारेवर धरले; ३ ऑगस्टपासून 'मंडल यात्रा'ची घोषणा.…
मुंबई: भायखळा येथील नूतनीकृत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण…
मुंबई: लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने नूतनीकरण व विस्तारीकरण करण्यात आलेल्या नाट्यगृहाचे लोकार्पण मुख्यमंत्री…
रांजणगाव गणपती (तेजस फडके): ता. शिरुर तालुक्यात असणाऱ्या रांजणगाव एमआयडीसीतील ब्रिटानिया कंपनीत माल पोहोचविण्यासाठी आलेल्या…
मुंबई: भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षणव्यवस्था ही केवळ पदवी देणारी नसून विचारक्षम, कौशल्यसंपन्न आणि मूल्याधिष्ठित नागरिक…
पेपरफुटी ही केवळ कायद्याची किंवा प्रशासनाची समस्या नसून, ती लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांशी आणि देशाच्या भविष्यासोबत…