nitin-thorat
शिरूरः आमदाबाद येथील शेतकरी नितीन आर्जुन थोरात यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात येणारा वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार 2021 करिता जाहीर झाला आहे. पुणे विभागातील पुणे जिल्ह्यातून एका शेतकऱ्यास दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो.
नितीन आर्जुन थोरात यांनी त्यांच्या शेतामध्ये सघन केशरआंबा, भाजीपाला फळ पिके यामध्ये मेथी कोथिंबीर त्याचबरोबर वांगी टोमॅटो कांदा बटाटा हळद या पिकांची लागवड करून चांगले उत्पन्न मिळविले आहे. शेतीच्या मशागती करिता ट्रॅक्टर यंत्राचा वापर आणि आंतरमशागती करिता पावर विडर चा वापर केल्याने त्यांच्या वेळेत आणि खर्चात बचत झाल्याने उत्पन्नात वाढ झाल्याचे त्यांनी सांगितले. या अनुषंगाने त्यांनी शेतामध्ये बांधावर चिंचेच्या झाडांची लागवड करून चिंचेपासूनही वार्षिक उत्पन्न सुरू असल्याचे सांगितले. त्याचबरोबर बायोगॅस (गोबर गॅस) निर्मीती, शासकिय योजनेच्या अनुदानातून शेडनेटहाऊस आणि शेततळे उभारुन पाणी टंचाईवर मात करण्यासाठी पिकांना व फळबागेला ठिबकसंचाद्वारे पाणी दिले.
पशुपालन यामध्ये देशी गोवंशाची लालाकंधारी व गावरान जातीच्या गाय व म्हैस पालनामुळे दुध आणि शेणापासून गोबरगॕस निर्मीती व शेतीसाठी शेणखत उपलब्ध झाले आहे. याच बरोबर गांडूळखत निर्मीतीही केली. शेताच्या बांधावर चिंच लागवडी बरोबर उपयोगी असलेल्या व दुर्मीळ होत असलेल्या वड, पिंपळ, पायर (पिंप्री), बेल, खैर, मोह, बांबू, ऊंबर, कुचला, बहावा, आवळा, फणस, पळस, शमी, हिरडा, बेहडा, लक्ष्मीतरु, शेवगा, गुळवेल, अर्जुन, रिठा इत्यादी वृक्षांची लागवड केली आहे. त्याच बरोबर परिसरातील शेतकऱ्यांना सोबत घेऊन नवनविन शेतीचे प्रयोग, कृषीविज्ञान केंद्राना भेटी देऊन मार्गदर्शन घेतात. त्यांना मिळालेल्या या पुरस्काराचे परिसरात कौतुक होत असून, अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
नितीन थोरात यांना कृषिनिष्ठ शेतकरी पुरस्कार प्रदान
आमदाबादच्या उपसरपंचपदी प्रदिप साळवे बिनविरोध
शिरुर येथील डॉक्टरांचे अथक प्रयत्न आणि अत्याधुनिक उपचारामुळे असाध्य आजारावर रुग्णाने केली मात
Video; घोडगंगा कारखान्याच्या थकीत पगारासाठी कामगारांचे ‘शोले’ स्टाईल आंदोलन
मुंबई: मुंबई–पुणे द्रुतगती मार्गाला पूर्णतः ‘ऍक्सेस कंट्रोल’ बनवणाऱ्या महत्त्वाच्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे ९९ टक्के काम…
मुंबई: महाराष्ट्राच्या जनजीवनाशी नाळ जोडलेली लालपरी आता नव्या उमेदीनं, नव्या शिस्तीनं आणि नव्या संवेदनशीलतेनं प्रवासाला…
नागपूर: राज्यातील महायुती सरकार महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांना अभय देत आहे का, असा संतप्त सवाल काँग्रेस…
पनवेल: पनवेल महानगरपालिका आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पनवेल शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने ११…
मुंबई: तेलंगणातील काँग्रेस सरकारने मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली राज्य परिवहन महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण…
पुणे: वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (VSI) च्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाचा २६ एप्रिल ते ८ मे २०२६ दरम्यान…