शिरूर तालुका

वाघाळे येथील मच्छिंद्र थोरात यांचे निधन

वाघाळेः वाघाळे (ता. शिरूर) येथील प्रगतशील शेतकरी मच्छिंद्र लहानू थोरात यांचे आज (सोमवार) अल्पशा आजाराने निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, एक मुलगी, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. गावामध्ये आज सायंकाळी सहा वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

मच्छिंद्र थोरात यांनी मोठ्या कष्टातून संसार उभा केला होता. प्रगतशील शेतकरी म्हणून त्यांची ओळख होती. अतिषय नम्र असलेले आप्पा या नावाने गावात त्यांची ओळख होती. कधीही ते कोणावर मोठ्याने ओरडले अथवा चिडल्याचे ऐकवात नाही. वाघाळे गावामध्येच ते लहानाचे मोठे झाले. शेवट पर्यंत त्यांनी शेती केली. आजच्या काळामध्ये एकत्रित कुटुंब पाहायला मिळत नाही. परंतु, त्यांनी कुटुंब जोडून ठेवण्याचे संस्कार मुलांवर केले होते. एक आदर्श पती, पिता कसा आसावा याचे उत्तम उदाहरण त्यांनी पंचक्रोशीतील नागरिकांना दाखवून दिले होते.

पहाडी आवाज, मोठी उंची, धोतर आणि पांढरी शुभ्र टोपी असा त्यांचा पेहराव होता. कुटुंब अथवा मुलांच्या मित्रांची मैफल बसल्यानंतर अनेक जुन्या आठणींना ते उजाळा देत. त्यांच्याकडे आठवणींचा मोठा खजीना होता. त्यांच्या जाण्यामुळे कुटुंबियांसह गावावर शोककळा पसरली आहे. व्यावसायिक संदीप थोरात आणि विकास सोसायटीचे चेअरमन दिलीप थोरात हे त्यांचे पुत्र होत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

धनुष्यबाण गोठवण्याची मागणी करणाऱ्यांवर शिंदेंची खरमरीत टीका; ‘उबाठा’वर निशाणा

नवी दिल्ली: “बाळासाहेब ठाकरे यांना धनुष्यबाण प्राणाहून प्रिय होता. ते देव्हाऱ्यात धनुष्यबाणाची पूजा करायचे. मात्र, २०१९…

37 मिनिटे ago

राज्यभरात २९ सप्टेंबरला ‘रोजगार महाकुंभ’; महाविद्यालयांनी पुढाकार घ्यावा; चंद्रकांत पाटील

मुंबई: राज्यातील युवक-युवतींना त्यांच्या शैक्षणिक पात्रता, कौशल्ये आणि क्षमतेनुसार रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी…

40 मिनिटे ago

युद्धजन्य परिस्थितीतही भारताची अर्थव्यवस्था ७.८ टक्के दराने वाढतेय; एकनाथ शिंदे

ठाणे : जगातील अनेक देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली असताना आणि त्याचा विविध अर्थव्यवस्थांवर परिणाम…

47 मिनिटे ago

आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून सपकाळांचा सरकारवर हल्लाबोल

नाशिक : आदिवासी विद्यार्थी गेल्या १५ ते २० दिवसांपासून विविध मागण्यांसाठी उपोषण आणि आंदोलन करत…

52 मिनिटे ago

वरळीत कचरा अन् दुर्गंधीचे साम्राज्य; शिवसेना ॲक्शन मोडवर, वर्षभर ‘स्वच्छ वरळी’ अभियान

मुंबई : स्थानिक आमदारांच्या दुर्लक्षामुळे वरळी परिसरात कचरा आणि दुर्गंधीचे साम्राज्य पसरल्याचा आरोप करत शिवसेनेने…

55 मिनिटे ago

प्रारूप मतदार यादीवर काँग्रेसचा आक्षेप; ‘नोटीस मिळणाऱ्या मतदारांची बूथनिहाय यादी जाहीर करा’

मुंबई: एसआयआर (Special Intensive Revision) मोहिमेंतर्गत महाराष्ट्रातील प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या…

59 मिनिटे ago