महाराष्ट्र

वरळीत कचरा अन् दुर्गंधीचे साम्राज्य; शिवसेना ॲक्शन मोडवर, वर्षभर ‘स्वच्छ वरळी’ अभियान

मुंबई : स्थानिक आमदारांच्या दुर्लक्षामुळे वरळी परिसरात कचरा आणि दुर्गंधीचे साम्राज्य पसरल्याचा आरोप करत शिवसेनेने आता स्वच्छता मोहिमेची धुरा हाती घेतली आहे. शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या निर्देशानंतर पक्षाचे पदाधिकारी ॲक्शन मोडवर आले असून, मंगळवारी वरळी कोळीवाडा आणि समुद्रकिनारी विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.

विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी या अभियानात उत्स्फूर्त सहभाग घेतला. ‘स्वच्छ वरळी, सुंदर वरळी’ या उपक्रमांतर्गत राबवण्यात आलेले हे अभियान केवळ एका दिवसापुरते मर्यादित न ठेवता वर्षभर सुरू ठेवण्यात येणार असल्याचे सचिन अहिर यांनी स्पष्ट केले.

नारळी पौर्णिमेच्या भेटीत नागरिकांनी मांडल्या समस्या

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी नारळी पौर्णिमेनिमित्त वरळी कोळीवाड्याला भेट देऊन स्थानिक नागरिकांशी संवाद साधला होता. यावेळी नागरिकांनी परिसरातील अस्वच्छता आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या आरोग्यविषयक समस्यांकडे त्यांचे लक्ष वेधले. त्यानंतर शिंदे यांनी तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना दिले.त्यानुसार शिवसेनेच्या पथकाने परिसराची पाहणी करून स्वच्छता मोहिमेला सुरुवात केली. समुद्रकिनाऱ्यासह परिसरातील कचरा हटवण्यात आला.

वर्षभराचा विशेष आराखडा

“वरळीतील नागरिक अस्वच्छतेमुळे हैराण झाले आहेत. स्थानिक आमदारांचे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे,” असा आरोप सचिन अहिर यांनी केला.ते म्हणाले, “आज केवळ समुद्रकिनाऱ्याची स्वच्छता करून थांबणार नाही. वरळी स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी वर्षभराचा विशेष आराखडा तयार करून ही मोहीम सातत्याने राबवली जाईल.”

दोन कोटी नावे वगळली’च्या आरोपावर विरोधकांना टोला

दरम्यान, मतदार याद्यांमधून सुमारे दोन कोटी नावे वगळल्याच्या विरोधकांच्या आरोपांवरही सचिन अहिर यांनी टीका केली. “एसआयआर प्रक्रिया सुरू असताना विरोधकांचे बीएलओ काय करत होते? केवळ बिनबुडाचे आरोप करण्यापेक्षा विरोधकांनी या प्रक्रियेकडे गांभीर्याने पाहावे. ज्या नागरिकांची नावे वगळली गेली आहेत, ती पुन्हा समाविष्ट करण्यासाठी विरोधकांनी प्रत्यक्ष प्रयत्न करावेत,” असा सल्ला अहिर यांनी दिला.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

SIR मोहिमेवर काँग्रेस आक्रमक; दावे-हरकतींसाठी ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढीची मागणी

मुंबई: महाराष्ट्रात सुरू असलेल्या SIR (Special Intensive Revision) मोहिमेत मोठ्या संख्येने मतदारांची नावे प्रारूप मतदार…

2 मिनिटे ago

साखर कारखान्यांसाठी ‘सॉफ्ट लोन’ योजना; एफआरपी वेळेत देण्यासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

मुंबई : राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना आगामी गाळप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी तसेच शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम वेळेत अदा…

1 तास ago

१७ सप्टेंबरला बीड–पुणे रेल्वे धावणार; डिसेंबरअखेर बीड–मुंबई सेवाही सुरू करण्याचे उद्दिष्ट

मुंबई: बीड जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्याच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणारी बीड–पुणे रेल्वे सेवा येत्या १७ सप्टेंबर रोजी…

2 तास ago

शिंदे गटाला निकालाआधीच टेन्शन? ‘धनुष्यबाण ठाकरेंनाच मिळणार’; असीम सरोदे यांचा मोठा दावा

मुंबई: सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हासंदर्भातील सुनावणी निर्णायक टप्प्यात पोहोचली असून, आजपासून शिंदे…

2 तास ago

अष्टविनायक यात्रा म्हणजे श्रद्धा, इतिहास आणि निसर्गाचा अनोखा संगम; जाणून घ्या आठही गणरायांचे महत्त्व

Pपुणे : महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेत अष्टविनायक यात्रेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. श्रीगणेशाची आठ…

2 तास ago

धनुष्यबाण गोठवण्याची मागणी करणाऱ्यांवर शिंदेंची खरमरीत टीका; ‘उबाठा’वर निशाणा

नवी दिल्ली: “बाळासाहेब ठाकरे यांना धनुष्यबाण प्राणाहून प्रिय होता. ते देव्हाऱ्यात धनुष्यबाणाची पूजा करायचे. मात्र, २०१९…

2 तास ago