शिरूर तालुका

विडिओ: पिंपरखेड मध्ये मध्यरात्री ढगफुटी सदृश पाऊस….

सविंदणे (अरुणकुमार मोटे): दिवसभर उन्हाचा मोठा तडाखा, प्रचंड उकाड्यामुळे पिंपरखेड व परिसर त्रस्त होता… संध्याकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. व परिसर जलमय झाला. ग्रामस्थ ही निवांत झाले… परंतु रात्री साडेतीन च्या सुमारास पुन्हा पावसाला सुरुवात झाली. मात्र हा पाऊस वेगळेच चिन्ह दाखवत होता…. थांबतही नव्हता उलट जोर वाढत गेला….. सकाळी साडेपाच च्या सुमारास पावसाने उसंत घेतली…. मागच्या पन्नास वर्षात असा पाऊस पाहीला नव्हता असे जेष्ठ नागरिक सांगत होते…. प्रत्येक ओढा पातळी सोडुन वाहत होता. शेतातील पाणी बांध फोडून उसळी घेत होते…. जमीन सपाटीकरण करताना गाडले गेलेले ओढे पुन्हा आपली सिमा दाखवत होते…. पिंपरखेडमधील शेतीची मोठी हानी करत पाणी नदीच्या दिशेने धावत होते. सुरुवातीला उत्सुकतेचे रुपांतर नंतर काळजी व चिंतेत बदलत गेले….

पिंपरखेड ची भौगोलिक परिस्थिती अशी आहे की शेजारच्या कोणत्याच गावातील पाणी या गावात येत नाही त्यामुळे नदीला आला तोच पुर…. ओढ्यांनी कधीच पुरस्थिती अनुभवलेली नव्हती… दाभाडेमळा, भागडीरोड, पारगाव रोड, मधलामळा, आंबेवाडी येथील शेतांचे बांध फुटले…. दाभाडेमळा, पारगाव रोड, आंबेवाडी येथे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, प्रभाकर ढोमे यांची कांद्याची बराखी पाण्यात जाऊन मोठे नुकसान झाले.

पारगावरोड येथून आंबेवाडीकडे जाणारा ओढा पाणी पारगाव रोड कडे वळवुन दिल्याने अरुंद झाला होता. मात्र, निसर्गाने एकाच सपाट्यात तो ओढा पुन्हा पुर्वव्रत केला…. मात्र या ठिकाणी शेतीचे मोठे नुकसान झाले… आंबेवाडी येथुन जाणा-या सरांडीच्या ओढ्याने देखील पातळी ओलांडत मोठे नुकसान केले… अनेक शेताच्या बांधांबरोबरच शेतक-यांनी ओढ्यांवर नळ्या टाकुन पलीकडे जाण्यासाठी जे रस्ते केले होते ते सगळे तुटले आहेत… मुरुम सहज उपलब्ध होत नसल्याने आता त्या शेतक-यांना मोठा खर्च होणार आहे….. मा. सरपंच रामदासशेठ ढोमे यांचे पीव्हीसी पाईपही वाहुन गेले…

निसर्गाने निर्माण केलेली पाणी वितरण व्यवस्था बदलणे हे अत्यंत धोक्याचे आहे… ओढ्यांमध्ये झाडी निर्माण झालेली आहे तसेच मोठी लाकडे व झुडुपे यामुळे पाणी शेतात मोठ्या प्रमाणात घुसल्याचे पाहायला मिळते… त्यामुळे शेतक-यांनी शेताबरोबरच ओढ्यांच्या स्वच्छतेकडेही ग्रामपंचायत व महसुल प्रशासनाने गांभिर्याने लक्ष देणे गरजेचे आहे…. झालेली नुकसानभरपाई मिळणे अत्यंत गरजेचे असुन प्रशासकीय पातळीवर लवकरात लवकर पंचनामे होऊन अहवाल पाठवुन मदत मिळण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे, असे शिवसेनेचे तालुकाप्रमुख गणेश जामदार, पंचायत समिती सदस्य डॉ. सुभाष पोकळे यांनी सांगितले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

केळी उत्पादक शेतकऱ्यांना तातडीची मदत द्या; जयंत पाटील यांची शासनाकडे मागणी

मुंबई: राज्यातील अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणावर केळी बागांचे नुकसान झाले असून…

5 तास ago

वालधुनी बुद्धभूमी वादावर अखेर तोडगा; ३० एकरांवर उभारणार ‘आंतरराष्ट्रीय महाबोधी संकुल’

मुंबई: कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील वालधुनी येथील बुद्धभूमीच्या जागेबाबत अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या वादावर अखेर तोडगा…

5 तास ago

मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कारभारावर काँग्रेसचा हल्लाबोल

गिरीश महाजनांच्या वक्तव्यावरून हकालपट्टीची मागणी मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पंतप्रधानपदाच्या…

5 तास ago

गणेशोत्सवाला जागतिक स्तरावर नवी ओळख देण्याचा उपक्रम; नामांकित मंडळांचा होणार सन्मान

मुंबई: मुंबई आणि परिसरातील सामाजिक, सांस्कृतिक पर्यावरणपूरक तसेच उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गणेशोत्सव मंडळांच्या कार्याचा गौरव…

6 तास ago

UPSC पूर्व परीक्षा प्रशिक्षणासाठी CET-2026 प्रवेश प्रक्रिया सुरू

मुंबई: उच्च शिक्षण विभागांतर्गत राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था (SIAC), मुंबई यांच्या माध्यमातून नागरी सेवा…

6 तास ago

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मागणीची दखल; ॲप-आधारित टॅक्सी कंपन्यांवर कारवाईचे आदेश

प्रवाशांकडून जबरदस्तीने टिप वसुली, अतिरिक्त शुल्काच्या सक्तीविरोधात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश कल्याण: ॲप-आधारित…

6 तास ago