शिरूर तालुका

अनाधिकृत माती वाहतुकीप्रकरणी शिरूर तहसिलदारांची कारवाई, हायवा ट्रक ताब्यात

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील शिरूर-हिंगणी रोडवर १५ मे रोजी रात्री अंदाजे ११.३० वाजता शिरुर तहसिलदारांसह महसूल पथकाने कारवाई करत एक हायवा ट्रक (MH-AD-३९१८) अनधिकृतपणे माती वाहतूक करताना पकडला. ट्रकमध्ये सुमारे ५ ब्रास माती आढळली असून, त्याबाबत कोणतीही रॉयल्टी पावती सादर करण्यात आलेली नव्हती.

तपासणीत असे निदर्शनास आले की, सदर माती ही श्रीगोंदा तालुक्यातील राजापूर येथून आणली जात होती व रामलिंग या ठिकाणी नेली जात होती. वाहनचालकाने त्याच्याकडे कोणत्याही प्रकारची रॉयल्टी पावती नसल्याचे कबूल केले. तसेच, ट्रक चालकाने मालकाचे नाव “नामा धावडे, रा. सावंतवाडी, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर” असल्याचे सांगितले. या प्रकरणी तहसीलदार, शिरूर यांनी नामा धावडे यांना नोटीस बजावली असून, महाराष्ट्र भूगर्भ खनिज (विक्री विकास व विनियमन) अधिनियमांतर्गत कारवाई प्रस्तावित आहे.यामध्ये

रॉयल्टी (५ ब्रास x ₹६००): ₹३,०००,दंड (बाजारभाव ₹१६१० x ५ = ₹८,०५०; पाचपट = ₹४०,२५०),वाहनदंड: ₹२,००,०००,भूमिभाडे: ₹१५० अशी एकूण रक्कम: २,५१,४५० (अक्षरी: दोन लाख एकावन्न हजार चारशे पन्नास रुपये) असा दंड ठोठावण्यात आला आहे.

याप्रकरणी अधिकृत पंचनामा महसूल अधिकाऱ्यांनी तयार केला असून, ट्रक सध्या तहसील कार्यालयाच्या आवारात ताब्यात ठेवण्यात आला आहे. या कारवाईमुळे माती वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून यापुढे अनाधिकृतरित्या मुरूम,माती वाहतूक करणाऱ्या वाहनांवर अश्याच प्रकारे धडक कारवाई करण्यात येईल असे शिरूरचे तहसीलदार बाळासाहेब मस्के यांनी सांगितले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शेरखान शेख यांनी लिहिलेल्या ‘अनुभवांच्या पाऊलखुणा’ पुस्तकाचे प्रकाशन!

शिक्रापूर : शिक्रापूर (ता. शिरूर) येथील पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते व प्राणीमित्र शेरखान शेख यांनी त्यांच्या…

1 तास ago

शिरूर तालुक्यातील भीमा नदीच्या पात्रात हात-पाय दोरीने घट्ट बांधलेला मृतदेह आला समोर…

शिरूर : शिरूर तालुक्यातील टाकळी भीमा हद्दीतील भीमा नदीच्या पात्रात थरारक गुन्ह्याची उकल करणारी घटना…

2 तास ago

अंडी-चिकन सोडा ‘हे’ 5 प्रोटीनयुक्त शाकाहारी पदार्थ खा, पिळदार शरीर बनवा

आजकाल लोक फिटनेस आणि स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी अनेकदा अंडी आणि चिकनचे सेवन करतात, परंतु त्याऐवजी…

15 तास ago

नाकातून भळाभळा रक्त आलं तर काय कराल? घाबरुन न जाता, तातडीने करा ‘हे’ उपाय

जसजसं तापमान वाढत जातं आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या डोकं वर काढणं सुरू करतात. कमजोरी, थकवा, डिहायड्रेशन,…

15 तास ago

तुम्हीही घाई घाईने जेवता का? १० मिनिटांत जेवण्याचा शरीरावर असा होतो परिणाम

जेवण करताना अनेकदा घरातील मोठी मंडळी ‘सावकाश जेव’ असे सांगतात. काही लोक अत्यंत हळू हळू…

15 तास ago

भीमाशंकरच्या विकासाला २८८ कोटींची गती; पुनर्वसनासाठी १९३ कोटींचा निधी

पुणे: श्री क्षेत्र भीमाशंकरचा सर्वांगीण विकास करून हे तीर्थक्षेत्र पर्यटन, स्थानिक रोजगार आणि अर्थव्यवस्थेला चालना देणारे…

16 तास ago