शिरूर (अरुणकुमार मोटे): आण्णापुर ता. शिरूर येथील एका रिक्षाचालकास रस्त्यात अडवून तीन जणांनी दमदाटी करत पैसे मागून, पैसे न दिल्याच्या कारणावरून मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी शिरूर पोलीस स्टेशनमध्ये तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.
या संदर्भात दाखल तक्रारीनुसार, प्रदीप शाहू गायकवाड (वय 28 वर्षे, व्यवसाय – रिक्षा चालक, रा. आण्णापुर, ता. शिरूर, जि. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक 18 मे रोजी रात्री 10.30 वाजता ते आपल्या रिक्षातून रामलिंग ते आण्णापुर रस्त्यावरून आपल्या घरी जात असताना, बालाजी शाळेजवळ त्यांना 1) जीवन चंद्रकांत सकट, 2) देवा संजय पठारे, 3) रोहीत दीपक भोंडे (सर्व रा. आण्णापुर, ता. शिरूर, जि. पुणे) या तिघांनी अॅक्टिव्हा मोटारसायकल आडवी लावून अडवले.
त्यांनी गायकवाड यांच्याकडे मद्यपानासाठी पैसे मागितले. पैसे देण्यास नकार दिल्यावर त्यांनी गायकवाड यांना शिवीगाळ करत वायर व दगडाने डोक्यात व पायावर मारहाण केली. या मारहाणीत गायकवाड जखमी झाले असून, आरोपी घटनास्थळावरून पळून गेले आहे. या प्रकरणी पोलीस हवालदार राऊत तपास करत असून गुन्ह्याचा पुढील तपास शिरूर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
शहरात अशा प्रकारच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, संबंधित आरोपींना लवकरात लवकर अटक करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे. शिरूर शहरासह ग्रामीण भागात अल्पवयीन व इतर मुलांमध्ये भाईगिरीची क्रेज मोठ्या वाढत चालली असून त्यांना कायदयाचे भय राहीले नाही. शिरूर पोलिसांनी आता अशा भाई लोकांवर जरब बसविण्यासाठी कठोर उपायोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे .
शिरूर : शिरूर तालुक्यातील टाकळी भीमा हद्दीतील भीमा नदीच्या पात्रात थरारक गुन्ह्याची उकल करणारी घटना…
आजकाल लोक फिटनेस आणि स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी अनेकदा अंडी आणि चिकनचे सेवन करतात, परंतु त्याऐवजी…
जसजसं तापमान वाढत जातं आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या डोकं वर काढणं सुरू करतात. कमजोरी, थकवा, डिहायड्रेशन,…
जेवण करताना अनेकदा घरातील मोठी मंडळी ‘सावकाश जेव’ असे सांगतात. काही लोक अत्यंत हळू हळू…
पुणे: श्री क्षेत्र भीमाशंकरचा सर्वांगीण विकास करून हे तीर्थक्षेत्र पर्यटन, स्थानिक रोजगार आणि अर्थव्यवस्थेला चालना देणारे…
मुंबई: राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या ‘छात्रों की गुंज’ अभियानाची भाजप आणि देवेंद्र फडणवीस सरकारने…