शिरूर तालुका

लोकसेवा आयोगातून आमदाबादच्या श्रद्धा जाधव यांची कृषी अधिकारीपदी निवड

शिरूर (नितीन थोरात): शिरूर तालुक्यातील आमदाबाद येथील श्रद्धा चंद्रकला राजेंद्र जाधव यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण करत कृषी अधिकारी पदाला गवसणी घातली आहे. त्यांच्या या यशामुळे आमदाबादसह टाकळीहाजी परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

श्रद्धा या शेतकरी राजेंद्र गणपत जाधव यांच्या द्वितीय कन्या आहेत. लहान वयातच पितृछत्र हरपल्यानंतर जाधव कुटुंबावर कठीण प्रसंग ओढावले होते. अत्यंत खडतर परिस्थितीत शेतीच्या उत्पन्नावर काबाडकष्ट करत राजेंद्र जाधव यांनी आपल्या तीनही मुलींना उच्च शिक्षण दिले. त्यापैकी श्रद्धा यांनी बी.एस्सी. अॅग्री शिक्षण पूर्ण करून स्पर्धा परीक्षेची तयारी केली आणि अखेर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण करत कृषी अधिकारी पद पटकावले.

काही वर्षांपूर्वी श्रद्धा यांचा विवाह तालुक्यातील बेट भागातील नेते सावित्राभाऊ थोरात यांचे चिरंजीव अक्षय थोरात यांच्याशी झाला आहे. शिक्षण, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर मिळवलेल्या या यशामुळे जाधव कुटुंबासह संपूर्ण परिसराचा त्यांच्यावर अभिमान व्यक्त केला जात आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

नगरविकास विभागाने महिला सुरक्षेसाठी स्वतंत्र कार्यप्रणाली विकसित करावी;  डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई: राज्य शासनाच्या चौथ्या महिला धोरणाच्या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रात महिला सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या…

17 तास ago

विधिमंडळाची अभ्यासक भेट ठरली विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी अनुभव

मुंबई: विधिमंडळाचे कामकाज प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी नीता मुकेश अंबानी शाळेतील सुमारे ६० विद्यार्थ्यांनी विधानभवनाला दिलेली अभ्यासक…

17 तास ago

महिला आरक्षणावरून काँग्रेसवर शिंदेंचा हल्लाबोल

नवी दिल्ली: तब्बल ३० वर्षे रखडलेल्या महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसनेच विरोध केला होता, असा आरोप…

17 तास ago

ठाणे तिथे काय उणे! विकासाच्या वेगाने ठाणे ‘सुपर सिटी’कडे

इन्फ्रा, मेट्रो आणि परवडणाऱ्या घरांवर सरकारचा भर; ‘ठाणे पॅटर्न’ देशासाठी आदर्श – उपमुख्यमंत्री Eknath Shinde…

17 तास ago

मराठी भाषा सक्ती! नियम मोडणाऱ्या शाळांवर कठोर कारवाईचा इशारा

मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य असतानाही काही शाळांकडून नियमांचे…

19 तास ago

देशात नारी शक्तीचा जयघोष की राजकारणाचा दिखावा?

नवी दिल्ली: देशात महिला सक्षमीकरण आणि ३३ टक्के आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, राजकीय…

19 तास ago