शिक्रापूर (अक्षय टेमगिरे): छत्रपती शिवाजी महाराज स्व अभियानांतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबर ते महात्मा गांधी जयंती २ ऑक्टोबर या कालावधीत शासनाच्या निर्देशानुसार सेवा पंधरवडा साजरा करण्यात येत असुन या उपक्रमांतर्गत गावोगावी स्वच्छता, विकास आणि जनजागृतीसाठी विविध कार्यक्रम राबवले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून पुणे जिल्ह्यातील धामारी (ता. शिरूर) गावाची निवड करण्यात आली असुन शेत व पाणंद रस्त्यांचे सर्वेक्षण व जिओ-टॅगिंगचे महत्त्वाकांक्षी काम सुरू आहे.
धामारी गावातील एकूण ३५ रस्त्यांचे सर्वेक्षण आणि मोजणी पूर्ण करण्यात आली असून रस्त्यांना संकेतांक क्रमांक देणे, नकाशावर दिशा दर्शविणे आणि रस्त्यांवर नावफलक लावणे या कामाची अंमलबजावणी युद्धपातळीवर सुरू आहे. या उपक्रमामुळे गावातील प्रत्येक रस्ता शासनाच्या नोंदवहीत स्पष्ट होणार असून भविष्यात विकासकामे, दळणवळण व्यवस्था तसेच नागरिकांना मिळणाऱ्या सुविधा अधिक वेगाने आणि पारदर्शकतेने राबवता येतील.
या कामाचे सादरीकरण नुकतेच पुण्यात मुख्यमंत्री, महसूल मंत्री व जिल्हा पालकमंत्री यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या प्रकल्पाला शासन पातळीवर सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने धामारी गाव राज्यातील आदर्श प्रकल्प म्हणून पुढे येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.या उपक्रमासाठी शिरूर उपविभागीय अधिकारी पुनम अहिरे व तहसीलदार बाळासाहेब मस्के यांनी मार्गदर्शन केले. तर पाबळ मंडळ अधिकारी प्रमोद लोखंडे यांनी प्रत्यक्ष सर्वेक्षण व सादरीकरणाची जबाबदारी पार पाडली.स्थानिक ग्रामस्थांमध्ये या उपक्रमामुळे उत्साहाचे वातावरण असून, शासन-प्रशासनाच्या या प्रयत्नामुळे गावातील रस्त्यांची अचूक नोंद व शाश्वत विकास साध्य होईल, असा विश्वास व्यक्त होत आहे
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील मांडवगण फराटा येथे क्रिकेट स्पर्धेदरम्यान झालेल्या फायरींग प्रकरणातील दोन मुख्य…
संवेदनशीलता आणि मानवतेचे दर्शन घडवणारी घटना जेजुरी: जेजुरी येथे दर्शनासाठी आलेली तीन वर्षांची चिमुकली हरवल्याने काही…
शिक्रापूर (ओमकार भोरडे): पारोडी हद्दीतील एनएच-५४८ महामार्गालगत उभारण्यात आलेला जिओ कंपनीचा मोबाईल टॉवर वारंवार बंद…
नवनियुक्त पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांची प्रत्यक्ष बाजारात भेट; साध्या वेशातील पथके तैनात होणार शिक्रापूर…
शिरूर (अरुणकुमार मोटे): महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाच्या शिरूर तालुका कार्यकारिणीची बैठक नुकतीच शिरूर येथे उत्साहात…
सामान्यपणे एक्सपर्ट दिवसातून ७-८ तास झोप घेण्याचा सल्ला देत असतात. कारण इतकी झोप शरीरासाठी गरजेची…