शिरूर तालुका

धामारी गावातील 35 रस्त्यांचे सर्वेक्षण व जिओ टॅगिंगचे काम अंतिम टप्प्यात

शिक्रापूर (अक्षय टेमगिरे): छत्रपती शिवाजी महाराज स्व अभियानांतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबर ते महात्मा गांधी जयंती २ ऑक्टोबर या कालावधीत शासनाच्या निर्देशानुसार सेवा पंधरवडा साजरा करण्यात येत असुन या उपक्रमांतर्गत गावोगावी स्वच्छता, विकास आणि जनजागृतीसाठी विविध कार्यक्रम राबवले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून पुणे जिल्ह्यातील धामारी (ता. शिरूर) गावाची निवड करण्यात आली असुन शेत व पाणंद रस्त्यांचे सर्वेक्षण व जिओ-टॅगिंगचे महत्त्वाकांक्षी काम सुरू आहे.

धामारी गावातील एकूण ३५ रस्त्यांचे सर्वेक्षण आणि मोजणी पूर्ण करण्यात आली असून रस्त्यांना संकेतांक क्रमांक देणे, नकाशावर दिशा दर्शविणे आणि रस्त्यांवर नावफलक लावणे या कामाची अंमलबजावणी युद्धपातळीवर सुरू आहे. या उपक्रमामुळे गावातील प्रत्येक रस्ता शासनाच्या नोंदवहीत स्पष्ट होणार असून भविष्यात विकासकामे, दळणवळण व्यवस्था तसेच नागरिकांना मिळणाऱ्या सुविधा अधिक वेगाने आणि पारदर्शकतेने राबवता येतील.

या कामाचे सादरीकरण नुकतेच पुण्यात मुख्यमंत्री, महसूल मंत्री व जिल्हा पालकमंत्री यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या प्रकल्पाला शासन पातळीवर सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने धामारी गाव राज्यातील आदर्श प्रकल्प म्हणून पुढे येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.या उपक्रमासाठी शिरूर उपविभागीय अधिकारी पुनम अहिरे व तहसीलदार बाळासाहेब मस्के यांनी मार्गदर्शन केले. तर पाबळ मंडळ अधिकारी प्रमोद लोखंडे यांनी प्रत्यक्ष सर्वेक्षण व सादरीकरणाची जबाबदारी पार पाडली.स्थानिक ग्रामस्थांमध्ये या उपक्रमामुळे उत्साहाचे वातावरण असून, शासन-प्रशासनाच्या या प्रयत्नामुळे गावातील रस्त्यांची अचूक नोंद व शाश्वत विकास साध्य होईल, असा विश्वास व्यक्त होत आहे

शिरूर तालुका टीम

Recent Posts

चासकमान कालव्याची गळती ‘हेड’ला, अस्तरीकरण ‘टेल’ला… उलट्या कारभाराविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार

शिरुर (तेजस फडके): चासकमान डाव्या कालव्याच्या अस्तरीकरणाच्या मनमानी, विस्कळीत आणि शेतकरीविरोधी नियोजनाविरोधात आंबळे परिसरातील शेतकऱ्यांचा…

16 तास ago

नैसर्गिकरित्या मूड बदला

धावपळीच्या जीवनात आपण एकामागे एक सतत कामे करतो. मात्र हे आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते. याचा…

1 दिवस ago

मणक्याचे दुखणे आणि पाठदुखी कारणे व कोणती काळजी घ्यावी

बहुतांश जणांची कामे ही सध्या बैठ्या स्वरूपाची असतात. विविध सरकारी कार्यालयात, बँकेत, आयटी मध्ये काम…

1 दिवस ago

शिरूर तालुक्यात घोड नदीकाठी शेतकऱ्यावर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला; कायदा-सुव्यवस्थेचा उडाला पुन्हा बोजवारा…?

शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील निमोणे गावातील पिंपळाचीवाडी परिसरात घोड नदीच्या काठावर विद्युत मोटार सुरु…

1 दिवस ago

मोशी कचरा डेपो दुर्घटना म्हणजे भ्रष्टाचाराचा हिमनग; उच्चस्तरीय चौकशीची वडेट्टीवारांची मागणी

प्रशासनाच्या निष्काळजीपणा, नियमभंग आणि वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पातील अनियमिततेवर कठोर कारवाईची मागणी मुंबई: मोशी कचरा डेपो येथे…

1 दिवस ago

टीईटी पेपरफुटीवर दादा भुसेंच्या राजीनाम्याची काँग्रेसची सात दिवसांची अल्टिमेटम; राज्यभर आंदोलनाचा इशारा

मुंबई : टीईटी आणि सीईटी पेपरफुटी प्रकरणावरून काँग्रेसने राज्य सरकार आणि शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यावर…

1 दिवस ago