शिरूर तालुका

पंचायत समिती शिरूर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती उत्साहात साजरी

शिरूर (अरुणकुमार मोटे): पंचायत समिती शिरूर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती मोठ्या उत्साहात व आदरभावाने साजरी करण्यात आली. या कार्यक्रमास पंचायत समितीतील विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सभापती स्वाती घावटे होत्या. यावेळी गटविकास अधिकारी महेश डोके, सहाय्यक गटविकास अधिकारी लहामटे, गटशिक्षण अधिकारी तसेच पशुधन विकास अधिकारी निर्मला चोभे, बाल विकास प्रकल्प अधिकारी सटाले, विस्तार अधिकारी शिक्षण बाळकृष्ण कळमकर यांच्यासह पंचायत समितीचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर त्यांच्या जीवनकार्यावर आधारित व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी काकडे सर यांनी डॉ. आंबेडकर यांच्या संघर्षमय जीवनप्रवास, सामाजिक न्यायासाठी केलेले कार्य आणि संविधान निर्मितीत दिलेले अमूल्य योगदान यावर प्रभावी भाष्य केले. त्यांच्या खास शैलीतील मार्मिक व विचारप्रवर्तक मांडणीमुळे उपस्थित श्रोत्यांना प्रेरणा मिळाली.

कार्यक्रमात आणखी एक विशेष उपक्रम म्हणून कक्ष अधिकारी संदीप घायवट यांनी स्वखर्चातून उपस्थित सर्व मान्यवर, अधिकारी व कर्मचाऱ्यांना डायरी व पेनचे वाटप केले. त्यांच्या या उपक्रमाचे सर्वांनी कौतुक केले.समारोप प्रसंगी मान्यवरांनी डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचा अंगीकार करून समाजात समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांची जपणूक करण्याचे आवाहन केले. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

कामगार दिन व महाराष्ट्र दिनानिमित्त कामगार प्रश्नांवर प्रकाश; नव्या कायद्यांमुळे संमिश्र चित्र

मुंबई: कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कामगारांच्या स्थितीवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली…

18 तास ago

महाविकास आघाडी एकसंघ; अंबादास दानवे यांना काँग्रेसचा ठाम पाठिंबा

मुंबई: आगामी राज्यसभा व विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी (मविआ) घटक पक्षांमध्ये सकारात्मक व…

18 तास ago

शिरुर तालुक्यात बैलगाडा शर्यतीदरम्यान अपघात; निष्काळजीपणामुळे एकाचा मृत्यू…?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील करंदी येथे आयोजित करण्यात आलेल्या बैलगाडा शर्यतीदरम्यान झालेल्या अपघातात प्रकाश…

23 तास ago

शरीराचे अवयव व त्याला निष्काळजीपणामुळे होणारे आजार

१) पोट: केव्हा बिघाडते, जेव्हा तुम्ही सकाळी नाष्टा करत नाही. २) मूत्रपिंड: केव्हा बिघडतात जेव्हा…

2 दिवस ago

मुंबईच्या पवई–चांदिवली उद्यानांना ‘सुरक्षा कवच’; गैरप्रवृत्तींवर विशेष मोहीम राबवण्याचे निर्देश

मुंबई: मुंबईतील पवई व चांदिवली परिसरातील महानगरपालिका उद्यानांमध्ये अंमली पदार्थ सेवन आणि इतर गैरप्रवृत्तींना आळा…

2 दिवस ago

व्यावसायिक चालकांसाठी ‘व्यवहारिक मराठी’ अनिवार्य; न शिकणाऱ्यांवर कारवाईचा इशारा

मुंबई: महाराष्ट्रात प्रवासी वाहन चालवणाऱ्या प्रत्येक व्यावसायिक चालकाला ‘व्यवहारिक मराठी’ येणे बंधनकारक करण्याबाबत राज्य सरकार…

2 दिवस ago