शिरूर तालुका

स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव वर्षभर जागर करणार: अविनाश क्षीरसागर

शिक्रापूर: भारताला स्वातंत्र्य मिळवून ७५ वर्ष पूर्ण होत असताना स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव संपूर्ण देशभर मोठ्या उत्साहाने साजरा केला जात असून महाविद्यालयात विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीचे विचार आणखी प्रभावीपणे रुजवण्यासाठी वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करत क्रांतिकारकांचा जीवनपट विद्यार्थ्यांसमोर उलगडून दाखविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन शिरुर तालुका मुख्याध्यापक संघाचे खजिनदार प्राचार्य अविनाश क्षीरसागर यांनी केले.

पाबळ (ता. शिरुर) येथील भैरवनाथ विद्यामंदिर येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रम प्रसंगी बोलताना प्राचार्य अविनाश क्षीरसागर बोलत होते. याप्रसंगी विद्यालयाचे पर्यवेक्षक तुकाराम ताम्हाणे, भैरवनाथ विद्यामंदिर सेवक सहकारी पतसंस्थेचे संचालक रोहिदास चौधरी, आनंदा गावडे, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदे पुणे ग्रामीणचे उपाध्यक्ष जितेंद्रकुमार थिटे, आण्णा ओहोळ, निळकंठ पाटील, काळूराम गव्हाणे, संदीप गवारे, अरुण निकम, अतुल लिमगुडे, किरण रेटवडे, सुनिल जाधव, देवा शेळके, भरत जाधव, रेखा पलांडे, रोहिणी जाधव, विजया धुमाळ, जयश्री कोहीनकर, शितल सरोदे, कीर्ती कापरे, कल्पना चौधरी, अश्विनी यादव यांसह आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी भारत मातेच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले.

विद्यालयातील ऋतुजा मैड, साक्षी थिटे, वैष्णवी फटांगडे, श्रृतिका चापोडे, साक्षी आदक या विद्यार्थिनींनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे कार्य विद्यार्थ्यांसमोर मांडले. तर यावेळी बोलताना स्वातंत्र चळवळ आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील अग्रगण्य व्यक्तिमत्व विचारवंत, साहित्यिक, कवी, प्रबोधनकार, समाज सुधारक अशा विविध प्रांतात काम करणारे साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे तसेच स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, अशी गर्जना करत सार्वजनिक उत्सवातून सामाजिक एकात्मतेची जाणीव करुन देणारा स्वातंत्र्यसेनानी, पत्रकार, थोर समाजसेवक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे विचार विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे मत उपप्राचार्य सुदाम पिंगळे यांनी व्यक्त केले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संतोष क्षीरसागर यांनी केले. तर महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदे पुणे ग्रामीणचे उपाध्यक्ष जितेंद्रकुमार थिटे यांनी आभार मानले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

किडनी स्टोन असल्यावर कोणती फळं खावीत आणि कोणती टाळावीत

आजकाल वेगवेगळ्या कारणांनी लोकांना किडनी स्टोनची समस्या होते. किडनी स्टोन झाल्याचं अनेकदा फार उशीरा समजतं.…

2 तास ago

एक्सरसाईज नंतर लगेच पाणी पिणं पडू शकतं महागात, जाणून घ्या योग्य पद्धत कोणती

एक्सरसाईज आरोग्यासाठी किती फायदेशीर असते हे सगळ्यांनाच माहीत आहे. लोक फीट राहण्यासाठी रोज एक्सरसाईज करतात.…

2 तास ago

सरकारच्या हिस्सा विक्रीच्या निर्णयाने LIC शेअर घसरला; बाजार उघडताच 9% पडझड

मुंबई : देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसी (LIC) च्या शेअरमध्ये मंगळवारी बाजार सुरू होताच…

2 तास ago

यशवंतरावांच्या जिल्ह्यात ठरावांचा लिलाव दुर्दैवी! ठरावांचा बाजार म्हणजे लोकशाहीचा पराभव

सातारा : राज्याचे पहिले मुख्यमंत्री तथा सहकार चळवळीचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या जिल्ह्यात जिल्हा मध्यवर्ती…

2 तास ago

नाना पाटेकर-सतीश पुळेकरांच्या मैत्रीत दुरावा; ‘इतकी चांगली मैत्री संपली’, पुळेकरांची खंत

मुंबई: मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर आणि अभिनेते सतीश पुळेकर यांची एकेकाळची गाजलेली मैत्री…

2 तास ago

रेशन कार्डमध्ये नवीन सदस्याचे नाव कसे जोडाल? जाणून घ्या ऑनलाइन आणि ऑफलाइन संपूर्ण प्रक्रिया

मुंबई: कुटुंबात नवीन सदस्याचे आगमन झाले आहे आणि त्याचे नाव शिधापत्रिकेत (रेशन कार्ड) समाविष्ट करायचे…

2 तास ago