तहसील कार्यालयात दुपारी १२ वाजता सोडत
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील ग्रामपंचायतींसाठी मोठी आणि महत्त्वाची प्रक्रिया या आठवड्यात पार पडणार आहे. एकूण ९६ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठीचे आरक्षण शुक्रवारी, ११ जुलै २०२५ रोजी निश्चित करण्यात येणार आहे. ही आरक्षण प्रक्रिया अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), इतर मागास वर्ग (OBC) आणि महिला या प्रवर्गासाठी पार पडणार असून, सोडतीच्या माध्यमातून आरक्षण निश्चित केले जाईल.
याबाबत माहिती देताना शिरूरचे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांनी सांगितले की, आरक्षण निश्चितीची ही पारदर्शक प्रक्रिया मुख्य प्रशासकीय इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील सभागृह क्रमांक १ मध्ये, शुक्रवारी दुपारी १२ वाजता सुरू होणार आहे. या कार्यक्रमात सर्व संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आणि जनतेच्या साक्षीने ही आरक्षण सोडत काढण्यात येईल.
या प्रक्रियेमध्ये प्रत्येक ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी वरील चार प्रमुख प्रवर्गांमधील आरक्षणाचे प्रमाण लक्षात घेऊन संगणकीकृत लॉटरी प्रणालीद्वारे (सोडत) आरक्षण निश्चित केले जाणार आहे. ही आरक्षण यादी जाहीर झाल्यानंतर आगामी ग्रामपंचायत निवडणुकांची रूपरेषा स्पष्ट होणार आहे, तसेच अनेक इच्छुक उमेदवार आणि राजकीय गटांचे भवितव्यही यावर अवलंबून असेल.
तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांनी ग्रामस्थांना आवाहन केले आहे की, इच्छुक नागरिकांनी या प्रक्रियेला उपस्थित राहावे, जेणेकरून पारदर्शकतेस व माहिती अधिकारास पूरक अशा पद्धतीने आरक्षण निश्चिती करण्यात मदत होईल.
ही आरक्षण प्रक्रिया आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अतिशय महत्त्वाची असून, यामुळे शिरूर तालुक्यातील राजकीय घडामोडींना नवसंजीवनी मिळणार असल्याचे जाणकारांचे मत आहे.
मुंबई: मंत्रालयातील पिण्याच्या पाण्याच्या टाकीमध्ये मांजर पडल्याच्या माहितीत तथ्थ नाही. पाण्याच्या टाक्यांवर लोखंडी झाकणे बसवलेली…
ठाणे: राज्याच्या राजकारणात एकनाथ शिंदे यांच्या भोवती वाढणारा जनाधार पुन्हा एकदा स्पष्ट झाला आहे. “अपॉइंटमेंटशिवाय…
मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या के-ईस्ट वॉर्डचे सहायक आयुक्त नितीन शुक्ला यांना एका महिलेला लग्नाचे आमिष दाखवून…
मुंबई: Dr. Shrikant Eknath Shinde यांनी अमेरिकेतील Harvard Kennedy School येथे आयोजित अभ्यासदौऱ्यात सहभागी होत…
अमरावती: राज्यातील प्रगत विकासाच्या दाव्यांना छेद देणारी धक्कादायक बाब समोर आली आहे. अमरावती जिल्ह्यातील मेळघाट…
फोन आजकाल लोकांच्या जीवनाचा महत्वाचा भाग झाला आहे. फोन नसेल तर अनेकांची कामे रखडतात. सकाळी…