शिरूर तालुका

युवा पिढीने थोर व्यक्तींचा आदर्श ठेवावा; डॉ. मिलिंद कसबे

शिक्रापूर (शेरखान शेख): युवापिढीने छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, संत गाडगेबाबा यांसारख्या थोर व्यक्तिंचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून समाजाच्या व देशाच्या उन्नतीसाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन प्रा. डॉ. मिलिंद कसबे यांनी केले आहे.

तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील साहेबराव शंकरराव ढमढेरे महाविद्यालयात शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक महेश ढमढेरे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या यशवंतराव चव्हाण व्याख्यानमाला दरम्यान युवकांचे सामाजिक भान याविषयावर प्रा. डॉ .मिलिंद कसबे बोलत होते. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक नवले, डॉ. संदीप सांगळे, प्रा. किशोर आढाव, प्रा. कल्याणी ढमढेरे, प्रा. मिनाक्षी दिघे, नामदेव भोईटे यांसह आदी पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना अलिकडच्या काळात जयघोषाच्या पलिकडे आपण महापुरुषांना समजूनच घेत नाही, ग्रंथालयात जाऊन महापुरुषांविषयी साहित्याचे वाचन बारकाईने व गांभीर्याने केल्यास आपल्याला आपले आदर्श सापडतात. आपला आदर्श हेच आपले शक्तिस्थान असून त्यांच्यामुळे आपल्याला प्रेरणा आणि उर्जा मिळते तेच आपल्याला यशस्वी होण्यासाठी झपाटून टाकतात.

दरम्यान आपला आदर्श चुकला तर आपल्या आयुष्याची दिशा चुकते आणि आपण भरकटतो त्यामुळे आपण आपल्या आदर्शाची निवड डोळसपणे करायला हवी. तर युवकांनी दुसऱ्याच्या सावलीत उभे राहण्यापेक्षा स्वतःची सावली निर्माण करायला हवी. तरुणवर्गाने जीवनात विधायक ध्येय ठेवून ती ध्येय साकार करण्यासाठी त्या ध्येयाचा ध्यास आणि पडेल ते कष्ट करण्याची कायम तयारी ठेवली पाहिजे, असे देखील प्रा .डॉ. कसबे यांनी यावेळी सांगितले .

सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुत्रसंचालन प्रा.अविनाश नवले यांनी केले तर प्रा. दत्तात्रय कारंडे यांनी प्रास्ताविक केले आणि प्रा. केशव उबाळे यांनी आभार मानले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

सणसवाडीत ८०० लिटर डिझेल चोरीचा पर्दाफाश; बॅरलमध्ये पाणी भरून कंपनीची दिशाभूल, दोन सराईत चोरटे अटकेत

शिक्रापूर: शिरूर तालुक्यातील सणसवाडी येथील झेनिथ बायोकेमिकल इंडस्ट्रीज प्रा. लि. कंपनीतून तब्बल ८०० लिटर डिझेल…

3 तास ago

महाराष्ट्राला ‘समग्र शिक्षा’त अधिक निधी द्या; केंद्रीय परिषदेत दादाजी भुसे यांची जोरदार मागणी

मुंबई: देशातील एकूण विद्यार्थी संख्येपैकी ८.६१ टक्के विद्यार्थी महाराष्ट्रात शिक्षण घेत असतानाही ‘समग्र शिक्षा’ योजनेच्या…

3 तास ago

विद्यार्थ्यांवर लाठीमार म्हणजे लोकशाहीवरील काळा डाग; हे विद्यार्थ्यांच्या जिवावर उठलेलं निष्ठूर सरकार; विजय वडेट्टीवार

सिंदेवाही: दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ सिंदेवाही येथे काँग्रेसच्या वतीने तीव्र निषेध…

3 तास ago

नारळ पाणी पिण्याचे अनेक फायदे असूनही काही लोकांसाठी ठरतं घातक

हेल्दी ड्रिंक्सचा विषय निघतो तेव्हा नारळ पाण्याचं नाव सगळ्यात वर येतं. नारळ पाणी हे शरीरासाठी…

20 तास ago

आंबट ढेकर, पोटदुखीपासून आराम मिळवण्यासाठी घरगुती उपाय

कधीकधी अपचनामुळे पोट जड होऊन वेदनाही होतात. अस्वस्थता, जळजळ आणि मळमळ असा त्रासही होतो. तर…

20 तास ago

आजारी पडण्यापुर्वी पुढील गोष्टी फक्त आयुर्वेदच करु शकतो

1) कॅन्सर होण्याची भीती वाटते.-नियमित कडीपत्त्याचा रस प्या. 2) हार्ट अँटॅकची भीती वाटते - नियमित…

20 तास ago