शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील निमोणे येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे, जिथे एक शेतकरी आपल्या खरेदी केलेल्या शेतजमिनीत गेलेल्या असता, त्याने स्वतः लावलेला ऊस कोणीतरी चोरी करून नेल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी विश्रांतवाडी, पुणे येथील रहिवासी ज्योती शिवाजी जाधव (वय ४२) यांनी शिरूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवला आहे.
फिर्यादीने दिलेल्या माहितीप्रमाणे, त्यांनी गट नंबर 1064/1/अ मधील एक एकर क्षेत्र विकत घेतले होते. दिनांक 19 मे 2025 रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास त्यांनी त्या शेतजमिनीत भेट दिली असता, तेथे लावलेला २० महिन्यांचा उभा ऊस कुणीतरी तोडून चोरी करून नेल्याचे लक्षात आले. त्याचप्रमाणे त्या शेतात नांगरटही करण्यात आलेली होती.
फिर्यादीच्या आरोपानुसार, ही संपूर्ण घटना शेजारील शेतकरी महादेव भगवान लाड, तसेच मूळ जमीनमालक आरूणा नाना काळे व नाना सोनबा काळे (सर्व रा. निमोणे, ता. शिरूर) यांच्या संगनमताने घडवली गेली आहे. या तिघांनी मिळून बेकायदेशीरपणे शेतात प्रवेश करून ऊस चोरी केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणी शिरूर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणाचा तपास पो.हवा टेंगले हे करत आहेत. शेतजमिनीतील वादातून वाढलेल्या या प्रकारामुळे निमोणे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. स्थानिक पोलीस यावर पुढील तपास करत असून, दोषींवर कडक कारवाई होणार असल्याचे संकेत दिले आहेत.
मुंबई: मुंबई–पुणे द्रुतगती मार्गाला पूर्णतः ‘ऍक्सेस कंट्रोल’ बनवणाऱ्या महत्त्वाच्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे ९९ टक्के काम…
मुंबई: महाराष्ट्राच्या जनजीवनाशी नाळ जोडलेली लालपरी आता नव्या उमेदीनं, नव्या शिस्तीनं आणि नव्या संवेदनशीलतेनं प्रवासाला…
नागपूर: राज्यातील महायुती सरकार महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांना अभय देत आहे का, असा संतप्त सवाल काँग्रेस…
पनवेल: पनवेल महानगरपालिका आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पनवेल शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने ११…
मुंबई: तेलंगणातील काँग्रेस सरकारने मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली राज्य परिवहन महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण…
पुणे: वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (VSI) च्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाचा २६ एप्रिल ते ८ मे २०२६ दरम्यान…