अनाथांच्या माहेर संस्थेतून झाले आत्तापर्यंत तब्बल १९२ विवाह
शिक्रापूर (शेरखान शेख): वढु बुद्रुक (ता. शिरुर) येथील अनाथ मुले, मुली यांसह महिलांसाठी कार्यरत असलेल्या माहेर संस्थेने आज पर्यंत बरेच अनाथ निराधार युवती व विधवा महिलांचे विवाह सोहळा साजरे केले असून नुकतेच माहेर संस्थेतील तीन विशेष पुरुष व तीन विशेष महिलांचे विवाह थाटात संपन्न झाले असून तिघा पुरुष व महिलांना आयुष्यभराचे जोडीदार मिळाले आहेत.
वढु बुद्रुक (ता. शिरुर) येथील माहेर संस्थेमध्ये अनेक अनाथ युवक, युवती बालके आश्रय घेत असताना काही दिवसांपूर्वी विशेष मुलांसह पुरुषांसाठी देखील कार्य हाती घेत विशेष पुरुषांसाठी करुणालया प्रकल्प सुरु करण्यात आला तर महिलांसाठी वात्सल्यधाम प्रकल्प सुरु करण्यात आला असताना काही दिवसांपूर्वी येथे विशेष महिला पुरुष दाखल झालेले असताना राजकुमार गोयल, अंकुश काळे व सुनील ढाकणे त्यांनी देखील विवाह करण्याची इच्छा माहेर संस्थेच्या संस्थापिका असलेल्या जगातील प्रेरणादायी व्यक्तींच्या यादीतील लुसि कुरियन यांच्याकडे व्यक्त केली असताना त्यांनी करुणालया व वात्सल्यधाम प्रकल्पा तील महिला पुरुषांची चर्चा करत तिघांचा विवाह पंचफुला भालेराव, सुजाता पगारे व मंदा पवार यांच्याशी करण्याचा निर्णय घेतला असताना तिघांचे देखील विवाह मधुसुदन गुरुजी व जोशी काका यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
यावेळी माहेर संस्थेच्या संस्थापिका लुसी कुरीयन, अध्यक्षा हिराबेगम मुल्ला, माहेर संस्थेचे व्यवस्थापक रमेश चौधरी, रमेश दुतोंडे, विजय तवर, आनंद सागर, तेजस्विनी पवार, स्वाती पाटील यांसह आदी मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते. सदर विवाह यशस्वी होण्यासाठी माहेर संस्थेतील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. दरम्यान माहेर संस्थेच्या संस्थापिका लुसि कुरियन यांनी सर्वांचे आभार मानले.
मुंबई: राज्य शासनाच्या चौथ्या महिला धोरणाच्या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रात महिला सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या…
मुंबई: विधिमंडळाचे कामकाज प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी नीता मुकेश अंबानी शाळेतील सुमारे ६० विद्यार्थ्यांनी विधानभवनाला दिलेली अभ्यासक…
नवी दिल्ली: तब्बल ३० वर्षे रखडलेल्या महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसनेच विरोध केला होता, असा आरोप…
इन्फ्रा, मेट्रो आणि परवडणाऱ्या घरांवर सरकारचा भर; ‘ठाणे पॅटर्न’ देशासाठी आदर्श – उपमुख्यमंत्री Eknath Shinde…
मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य असतानाही काही शाळांकडून नियमांचे…
नवी दिल्ली: देशात महिला सक्षमीकरण आणि ३३ टक्के आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, राजकीय…