शिरूर तालुका

शिरुर तालुक्यातील कवठयाची येमाई देवी म्हणजे नवसाला पावणारी आख्यायिका…

सविंदणे (अरुणकुमार मोटे): कवठे येमाई (ता. शिरुर) येथील ग्रामदैवत, कुलदेवी व महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील तमाम भाविक भक्तांचे श्रद्धास्थान, आराध्य दैवत, कुलदैवत असनाऱ्या श्री येमाई देवीचा नवरात्र महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे.

शिरुर तालुक्याच्या पश्चिम भागात शिरुर- मंचर रोडवर कवठे येमाई हे गाव असून गावच्या दक्षिणेस ३ कि. मी. अंतरावर निसर्गरम्य परिसरात प्रसिद्ध तीर्थक्षेत्र श्री येमाई देवी देवस्थान एक जागृत देवस्थान असून या ठिकाणी देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविक भक्तांची मनोकामना, मनातील इच्छा पूर्ण होत असल्याने भक्त गणांची येथे नवस फेडण्यासाठी नेहमीच मोठी गर्दी होत असते.

कवठे येमाई गावास ऐतिहासिक वारसा लाभलेला असून गावाजवळून वाहणाऱ्या घोडनदीच्या किनारी पुर्वी कवठे हे गाव वसलेले होते, अशी आख्यायिका आहे. कवठे येमाई गावचे वैभव असलेल्या श्री येमाई देवीच्या प्राचीन मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला असून मंदिर परिसरास तीर्थक्षेत्राचा दर्जाही प्राप्त झाला आहे.

देवीच्या मंदिर परिसरात सभोवताली शेकडो वर्षांपूर्वीचे मोठमोठे वाट वृक्ष, मंदिराच्या उत्तरेस पायऱ्या असलेली ऐतिहासिक बारव (विहीर), मंदिरातील प्रशस्थ गाभारा, समोरचा मोठा सभामंडप,देवालयाच्या सभोवताली तटबंदीचा वाडा, त्यास पूर्वेकडून व उत्तरेकडून असणारी भव्य प्रवेशद्वारे, मंदिरासमोर २ ऐतिहासिक घाट्या (घंटा) असून पूर्वेकडील महाद्वाराजवळ दोन ऐतिहासिक नगारे आहेत.

मंदिराच्या आवारात तीन उंच दीपमाळी असून नवरात्र उत्सव व चैत्र पौर्णिमेस होणाऱ्या यात्रा उत्सवात त्या पेटविल्या जातात. देवीच्या दर्शनासाठी येथे मुक्कामी येणाऱ्या भाविकांच्या राहण्याच्या सोयीसाठी आवारातच खोल्या बांधलेल्या आहेत.

देवीच्या मंदिराच्या मागील बाजूस १५ फूट खोल दगडी बांधकामातील श्री महादेवाचे ऐतिहासिक मंदिर असून त्यातील दगडी पिंड व दगडी नंदी हे या मंदिराचे वैशिष्ठय आहे. याच ऐतिहासिक महादेव मंदिरातून ३ कि.मी. अंतरावर असणाऱ्या कवठे गावठाणातील राजवाड्यापर्यंत पूर्वी भुयारी मार्ग होता.

धार, इंदोर, वणी ते दिंडोरीच्या पायथ्यापासून तसेच पुणे, मुंबई, नगर, नाशिक, जळगावसह संपूर्ण राज्यभरातून देवीचे भक्त दर मंगळवारी, नवरात्र उत्सव व चैत्र पौर्णिमेस होणाऱ्या यात्रा उत्सवात श्री येमाई देवीच्या दर्शनासाठी कुटुंबासह मोठ्या संख्येने येत असतात. देवीची पूजा गोरे पाटील करीत आहेत.

दररोज सकाळी ८ व संध्याकाळी ६ वाजता देवीची नियमित आरती व ओलांडा या ठिकाणी होत असतो. विशेषेकरुन भाविकांची यावेळी मोठी उपस्थिती, गर्दी होत असते. वर्षातील प्रत्येक पौर्णिमेस रात्री व आषाढ, श्रावण महिन्यातील मंगळवारी सायंकाळी गावातून श्री येमाई देवीच्या पालखीची सवाद्य मिरवणूक निघत असते. गावातील सर्वच भागातील वाड्यावस्त्यातील लोकांना या पालख्यांचा मान दिला जातो.

नवरात्र काळात श्री येमाई देवीचा मोठा उत्सव येथे साजरा करण्यात येतो. होम – हवन, भजन व इतर धार्मिक कार्यक्रम मोठ्या श्रद्धेने साजरे करण्यात येतात. वार्षिक पिकपाण्याचा अंदाज घेण्यासाठी जेष्ठ महिन्यातील पौर्णिमेस सायंकाळी मंदिरासमोर असणारी सुमारे १२५ किलोग्रॅम वजनाची मोठी दगडी गोटी १३ जणांच्या उजव्या हाताच्या मधल्या एकच बोटाच्या साहाय्याने उचलली जाते.

हा मान पिढ्यानपिढ्या मुंजाळवाडी ग्रामस्थांना आहे. येथील श्री येमाई देवी देवस्थानला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळाला असल्याने मंदिर परिसराचे चांगल्या प्रकारे सुशोभीकरन होऊन कायापालट होण्यास सुरुवात झाली आहे.

कवठे येमाई (ता. शिरुर) येथील तीर्थक्षेत्र श्री येमाई देवी देवस्थान हे पुण्यापासून ७० कि.मी. शिरुर पासून २७ कि.मी.मंचरपासून ३५ कि.मी. तर राजगुरुनगर (खेड) पासून ४५ कि.मी. व कवठे येमाई गावातून ३ कि.मी. अंतरावर हे जागृत देवस्थान आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

एमपीएससी विद्यार्थ्यांच्या स्वप्नांवर सरकारचा बुलडोझर; जीआर मागे घ्या, अन्यथा रस्त्यावर उतरू; अतुल लोंढे

सरळ सेवा भरतीचे प्रमाण कमी करून लाखो स्पर्धा परीक्षार्थींवर अन्याय; काँग्रेसचा सरकारला इशारा मुंबई: एमपीएससीमार्फत…

10 तास ago

पोटात होणाऱ्या या समस्येमुळे मेंदुवर पडतो वाईट प्रभाव, जाणून घ्या कसा कराल बचाव

अनेकदा तुम्ही पाहिलं असेल की, अनेक गंभीर आजारांची सुरूवात ही पोटापासूनच होते. त्यामुळेच पोटाचं आरोग्य…

12 तास ago

आल्याचा वापर करून शरीरातील Uric Acid करू शकता कमी

आजकाल शरीरात यूरिक अ‍ॅसिड वाढणं ही एक कॉमन समस्या झाली आहे. खाण्या पिण्याच्या चुकीच्या सवयी…

12 तास ago

बेलाचे सरबत आरोग्यासाठी फायदेशीर

पचन सुधारते: बेलाच्या सरबतात फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, ज्यामुळे पचन सुधारते आणि गॅस, अतिसार आणि…

12 तास ago

ठाण्यातील ९०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी रुग्णालयाचे काम फास्टट्रॅकवर पूर्ण करा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई: ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील नागरिकांना अत्याधुनिक आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या ९००…

12 तास ago

अक्कलकोट श्री स्वामी समर्थ मंदिर परिसराच्या विकासाला गती; ५०० कोटींच्या आराखड्यासाठी म्हाडा विशेष नियोजन प्राधिकरण

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मान्यता; रस्ते, वाहनतळ, पालखी मार्ग आणि सार्वजनिक सुविधांचा होणार सर्वांगीण विकास…

12 तास ago