क्राईम

लग्नाचा तगादा लावला म्हणून गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी बोलावलं अन्…

राजस्थान: लग्नाचा तगादा लावला म्हणून प्रियकराने आपल्याच प्रेयसीला मित्रांच्या स्वाधीन केल्याची धक्कादायक घटना राजस्थानमधून उघडकीस आली आहे. नराधम प्रियकराने प्रेयसीला भेटण्याच्या बहाण्याने अज्ञात स्थळी बोलावलं. तिथे हजर असलेल्या आरोपीच्या 2 मित्रांनी पीडितेवर वारंवार बलात्कार केला. याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी तीन जणांवर गुन्हा दाखल केलाय. तिघेही आरोपी फरार असून त्यांचा शोध घेतला जात आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २२ वर्षीय तरुणीचे एका अरबाज धोबी नामक तरुणासोबत प्रेमसंबंध होते. अरबाजने पीडितेला लग्नाचे अमिष दाखवून तिचं लैंगिक शोषण सुरू केलं. पीडितेने लग्नासाठी विचारणा केली असता आरोपीने टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. जेव्हा पीडितेने ही गोष्ट कुटुंबीयांना सांगण्याची धमकी दिली तेव्हा अरबाजने तिला अज्ञातस्थळी बोलावलं. अरबाजच्या सांगण्यावरुन पीडिता त्याला भेटण्यासाठी गेली असता, तिथे उपस्थित असलेल्या इतर दोन आरोपींनी तिचं अपहरण करत जंगलात नेलं. त्याठिकाणी तिच्यावर वारंवार बलात्कार करण्यात आला.

धक्कादायक बाब म्हणजे जेव्हा आरोपीचे मित्र तरुणीवर बलात्कार करत होते तेव्हा आरोपी अरबाज त्यांना प्रोत्साहित करत होता. बलात्कारानंतर आरोपींनी पीडितेला तिथेच सोडून दिलं. त्यानंतर पीडितेने आपलं घर गाठत कुटुंबीयांना आपबिती सांगितली. यानंतर पीडितेने तिच्या कुटुंबीयांसह पोलीस ठाणे गाठून आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तिनही आरोपींविरोधात अपहरण तसेच बलात्काराचा गुन्हा दाखल केला.गुन्हा दाखल होताच आरोपी फरार झाल्याची माहिती आहे. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

बारामतीकरांचा अभूतपूर्व कौल; सुनिल तटकरे यांचा मानाचा मुजरा, पश्चिम बंगाल परिवर्तनावरही भाष्य

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी बारामतीतील मतदारांचे आभार मानत विक्रमी मतदानाबद्दल मानाचा…

2 तास ago

बंगालमध्ये तृणमूल पिछाडीवर! वाघासारखं लढत राहू;  ममता बॅनरजी यांची प्रतिक्रिया

कोलकाता: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असताना मुख्यमंत्री Mamata Banerjee यांनी पहिली प्रतिक्रिया देत…

2 तास ago

भोर नसरापूर प्रकरण! आरोपीला फाशीचीच शिक्षा होणार;  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : भोर तालुक्यातील नसरापूर येथे चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या करणाऱ्या आरोपीला कठोरात कठोर…

2 तास ago

शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून भाजपावर काँग्रेसचा हल्लाबोल; सपकाळांचा गंभीर आरोप

मुंबई: काँग्रेस आघाडीच्या काळात शेतकऱ्यांना भरीव मदत मिळत होती, मात्र २०१४ नंतर भाजप सत्तेत आल्यानंतर…

2 तास ago

नातं हृदयाशी; बायपास सर्जरी

बायपास सर्जरी म्हटले की हातपाय गाळायचे दिवस आता गेले. बायपास केल्यानंतरही योग्य ती काळजी घेऊन…

6 तास ago

दक्षिणेत भाजपाला नकार, केरळमध्ये काँग्रेसचा विजय लोकशाहीचा; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्ष ने साम, दाम, दंड, भेद नीतीचा वापर…

6 तास ago