तेलंगना: रस्त्यावरुन चालताना किंवा गाडी चालवताना तुमची एक चूक तुमच्यासाठी घातक ठरु शकते. हे सर्व माहीत असूनही अनेकदा लोक रस्त्याच्या नियमांकडे दुर्लक्ष करुन उद्यानात चालत असल्यासारखे रस्त्यावरुन चालत असतात. रस्त्यावरील अपघातात अनेकांना आपला जीव गमवावा लागतो. मात्र, अनेकदा लोकांचे नशीब त्यांना त्यावेळी साथ देते, त्यामुळे त्यांचे प्राण थोडक्यात वाचते. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओने हे सिद्ध केले आहे की, तुम्ही रस्त्यावर जितके सावध राहाल तितके कमी आहे. अपघात दरम्यान आलेले अनुभव कधी जीवनाचा चांगलाच धडा देतात. आता ही क्लिपच बघा, एक कार ऑटोला धडकते आणि मध्येच एक महिला येते. हा अपघात पाहून महिलेचा जीव वाचेल असे वाटत नाही, मात्र नशीब या अपघातातून महिलेला वाचवते. अवघ्या १४ सेकंदांच्या या व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता की, एक महिला रस्त्यावरून जात आहे, त्याचवेळी एक बेकायदेशीर कार येऊन तिथे उभ्या असलेल्या ऑटोला धडकते.
या अपघातात कार आणि ऑटो या दोन्हीच्या मधोमध एक महिला असून ती दोन्ही वेगवेगळ्या बाजूने पडल्याने महिला त्या दोघांमधून बाहेर पडते आणि तिचा जीव थोडक्यात वाचतो. ही धक्कादायक क्लिप तेलंगणाचे एडीजीपी व्हीसी सज्जनार यांनी ट्विटर हँडलवर शेअर केली आहे. या व्हिडीओला ३५ हजारांहून अधिक लोकांनी पाहिलं असून कमेंट करुन प्रतिक्रिया दिल्या जात आहेत.
व्हिडीओवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, ‘एका महिलेचा जीव थोडक्यात वाचला.’ तर दुसऱ्या युजरने लिहिले की, ‘या कारवाल्यावर कडक कारवाई व्हायला हवी.’ दुसऱ्या यूजरने लिहिले की, ‘अशा लोकांना ड्रायव्हिंग लायसन्स देऊ नये.’ याशिवाय इतर अनेक युजर्सनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
शिंदोडी (तेजस फडके) शिंदोडी, ता. शिंदोडी येथील घोड धरणाच्या पात्रातुन शेतीच्या नावाखाली काळ्या मातीचा उपसा…
शिंदोडी (तेजस फडके) निमोणे (ता. शिरुर) येथे घोडनदीच्या पात्रातील पाण्याच्या बांधावरुन झालेल्या वादाचे रुपांतर थेट…
मुंबई: राज्यातील शिक्षकांना कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि डिजिटल तंत्रज्ञानाचे आधुनिक प्रशिक्षण देण्यासाठी शालेय शिक्षण विभाग…
मुंबई: महाराष्ट्रात मान्सूनच्या प्रगतीला झालेल्या विलंबाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे युवानेते जय पवार यांनी मुंबईतील प्रादेशिक…
शिवसेनेच्या हिरक महोत्सवी वर्धापन दिन सोहळ्यात शिंदेंचा विरोधकांवर हल्लाबोल; विधान परिषदेत महायुती सर्व १७ जागा…
नाशिक: केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी नाशिक–पुणे सरळ रेल्वेमार्ग रद्द करून तो नाशिक–शिर्डी–अहिल्यानगर मार्गे नेण्याची…