कान्हूर मेसाई (सुनिल जिते): मलठण (ता. शिरूर) येथे चोरट्यांनी गणपती माळ येथील विद्युत रोहित्र फोडून तांब्याच्या तारा लंपास केल्याची घटना शनिवारी (ता. २७) उघडकीस आली. त्यामुळे परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला असून शेतकरी दुहेरी संकटात सापडले आहेत.
परिसरातील शेतीसाठी कृषीपंप सुरू असणे आवश्यक असताना वीजपुरवठा खंडित झाल्याने पिके आणि जनावरांचा चारा वाळण्याचा धोका निर्माण झाला आहे. चालू रब्बी हंगामात रोहित्र चोरी गेल्याने परिसरातील पिकांना जास्त प्रमाणात फटका बसणार आहे. त्यामुळे महावितरणने तातडीने नवीन रोहित्र बसवावे, अशी मागणी शेतकरी करत आहेत.
‘महावितरण’ ची डोकेदुखी वाढली
बेट भागातील गावांमध्ये विद्युत रोहित्र चोरीच्या अनेक घटना घडल्या असून, आता पुन्हा चोरीच्या घटना सुरू झाल्याने शेतकऱ्यांची व महावितरणची डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे पोलिसांनी रात्रीच्या सुमारास गस्त वाढवून ग्राम सुरक्षा दल व ग्राम सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
मुंबई: राज्य शासनाच्या चौथ्या महिला धोरणाच्या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रात महिला सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या…
मुंबई: विधिमंडळाचे कामकाज प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी नीता मुकेश अंबानी शाळेतील सुमारे ६० विद्यार्थ्यांनी विधानभवनाला दिलेली अभ्यासक…
नवी दिल्ली: तब्बल ३० वर्षे रखडलेल्या महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसनेच विरोध केला होता, असा आरोप…
इन्फ्रा, मेट्रो आणि परवडणाऱ्या घरांवर सरकारचा भर; ‘ठाणे पॅटर्न’ देशासाठी आदर्श – उपमुख्यमंत्री Eknath Shinde…
मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य असतानाही काही शाळांकडून नियमांचे…
नवी दिल्ली: देशात महिला सक्षमीकरण आणि ३३ टक्के आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, राजकीय…