कान्हूर मेसाई (सुनिल जिते): मलठण (ता. शिरूर) येथे चोरट्यांनी गणपती माळ येथील विद्युत रोहित्र फोडून तांब्याच्या तारा लंपास केल्याची घटना शनिवारी (ता. २७) उघडकीस आली. त्यामुळे परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला असून शेतकरी दुहेरी संकटात सापडले आहेत.
परिसरातील शेतीसाठी कृषीपंप सुरू असणे आवश्यक असताना वीजपुरवठा खंडित झाल्याने पिके आणि जनावरांचा चारा वाळण्याचा धोका निर्माण झाला आहे. चालू रब्बी हंगामात रोहित्र चोरी गेल्याने परिसरातील पिकांना जास्त प्रमाणात फटका बसणार आहे. त्यामुळे महावितरणने तातडीने नवीन रोहित्र बसवावे, अशी मागणी शेतकरी करत आहेत.
‘महावितरण’ ची डोकेदुखी वाढली
बेट भागातील गावांमध्ये विद्युत रोहित्र चोरीच्या अनेक घटना घडल्या असून, आता पुन्हा चोरीच्या घटना सुरू झाल्याने शेतकऱ्यांची व महावितरणची डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे पोलिसांनी रात्रीच्या सुमारास गस्त वाढवून ग्राम सुरक्षा दल व ग्राम सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
शिंदोडी (तेजस फडके) शिंदोडी (ता.शिरुर) येथे 11 के व्ही ए विद्युत तार अचानक तुटून ऊसाच्या…
पाबळ (सुनील जिते) : शिरूर तालुक्यातील कान्हूर मेसाई परिसरातील गारकोलवाडी हे गाव अत्यंत दुष्काळी व…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील मांडवगण फराटा येथे क्रिकेट स्पर्धेदरम्यान झालेल्या फायरींग प्रकरणातील दोन मुख्य…
संवेदनशीलता आणि मानवतेचे दर्शन घडवणारी घटना जेजुरी: जेजुरी येथे दर्शनासाठी आलेली तीन वर्षांची चिमुकली हरवल्याने काही…
शिक्रापूर (ओमकार भोरडे): पारोडी हद्दीतील एनएच-५४८ महामार्गालगत उभारण्यात आलेला जिओ कंपनीचा मोबाईल टॉवर वारंवार बंद…
नवनियुक्त पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांची प्रत्यक्ष बाजारात भेट; साध्या वेशातील पथके तैनात होणार शिक्रापूर…