आळंदी (प्रतिनिधी) भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी रविवार (दि 24) एका कार्यक्रमात पत्रकारांना चहा पाजा, ढाब्यावर जेवायला न्या असा भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्ते यांना संवाद बैठकीत सल्ला दिला. त्यांच्या या वक्तव्याचा हुतात्मा राजगुरू पत्रकार संघ यांच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला. तसेच राजगुरुनगर (खेड) तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. तहसीलदार प्रशांत बेडसे यांचे वतीने अप्पर तहसीलदार स्नेहा सिंदे व महसूल नायब तहसीलदार आर बि बिजे यांनी हुतात्मा राजगुरु पत्रकार संघ खेड अध्यक्ष अर्जुन मेदनकर यांचे हस्ते निवेदन स्वीकारले.
यावेळी संघाचे उपाध्यक्ष एम डी पाखरे, खजिनदार सुनील बटवाल, सदस्य अनिल जोगदंड, बद्रीनारायण घुगे, खेड तहसीलदार कार्यालयातील शैलेश कुऱ्हाडे आदी उपस्थित होते. यावेळी देण्यात असलेल्या निवेदनात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या बेताल वक्तव्याचा जाहीर निषेध करुन त्यांनी या प्रकरणी माफी मागावी अशी मागणी करण्यात आली असल्याचे हुतात्मा राजगुरू पत्रकार संघाचे अध्यक्ष अर्जुन मेदनकर यांनी सांगितले.
संवेदनशीलता आणि मानवतेचे दर्शन घडवणारी घटना जेजुरी: जेजुरी येथे दर्शनासाठी आलेली तीन वर्षांची चिमुकली हरवल्याने काही…
शिक्रापूर (ओमकार भोरडे): पारोडी हद्दीतील एनएच-५४८ महामार्गालगत उभारण्यात आलेला जिओ कंपनीचा मोबाईल टॉवर वारंवार बंद…
नवनियुक्त पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांची प्रत्यक्ष बाजारात भेट; साध्या वेशातील पथके तैनात होणार शिक्रापूर…
शिरूर (अरुणकुमार मोटे): महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाच्या शिरूर तालुका कार्यकारिणीची बैठक नुकतीच शिरूर येथे उत्साहात…
सामान्यपणे एक्सपर्ट दिवसातून ७-८ तास झोप घेण्याचा सल्ला देत असतात. कारण इतकी झोप शरीरासाठी गरजेची…
रुद्राक्षाला हिंदू धर्मात फार धार्मिक महत्व आहे. रुद्राक्षाला भगवान शिवाचा आशीर्वाद मानलं जातं. त्यामुळे जास्तीत…